शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

काश्मिरात विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी; आठ जखमी

By admin | Updated: April 19, 2016 04:27 IST

राजौरीच्या बाबा गुलाम शाह बादशाह विद्यापीठात (बीजीएसबी) सोमवारी विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारीत आठ विद्यार्थी जखमी झाले

श्रीनगर/ जम्मू : राजौरीच्या बाबा गुलाम शाह बादशाह विद्यापीठात (बीजीएसबी) सोमवारी विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारीत आठ विद्यार्थी जखमी झाले. दोन्ही गटांनी दगडफेक केली आणि चार वाहने पेटवून दिल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी लगेच विद्यापीठात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.काही मुद्यांवरून काश्मीर खोऱ्यातील विद्यार्थी आणि स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष उद्भवल्याचे राजौरीचे उपपोलीस महानिरीक्षक जॉनी विल्यम्स यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. विद्यापीठ प्रशासनाने मात्र हा वाद निकाली निघेल अशी आशा व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंग म्हणाले, काश्मीर खोऱ्यात अलीकडे उफाळलेल्या हिंसाचारामागे निश्चितच कट असून कुपवाडा आणि हंडवारातील शांतता बिघडवण्याचा डाव आहे. काश्मीर खोऱ्यात अन्यत्र हिंसक कारवाया होत असतानाही हा भाग शांत राहिलेला होता. देशविरोधी आणि जनताविरोधी घटकांना अफवा पसरविण्यात यश आल्यामुळेच ही दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली.सोमवारी सकाळी काही तासांसाठी शिथिल करण्यात आलेले संचारबंदीसारखे निर्बंध नव्याने लागू करण्यात आले आहे. काश्मीर खोऱ्यातील मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा बहाल करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या दोन जिल्ह्णांतील घटनांसाठी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देतानाच युवकांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. अन्यायासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा ठोठावली जाईल, असे त्या जम्मू येथे एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर म्हणाल्या.रविवारी स्थिती शांत राहिली मात्र सोमवारी हंडवारा, क्रालगुंड आणि त्रेहगाम भागात पुन्हा हिंसक आंदोलन झाल्यामुळे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हंडवारा शहरात सुमारे दीडशे युवकांनी दगडफेक केली.