शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

संशोधन सुविधांसाठी दोन कोटींचे अनुदान

By admin | Updated: February 29, 2016 22:01 IST

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेला केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे संशोधन सुविधांसाठी दोन कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी एक कोटी ६५ लाख रुपयांचे अनुदान पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले आहे. या अनुदानातून संस्थेत संशोधन उपकरणांची खरेदी व देखभाल करण्यात येईल. डीएसटी-फिस्ट या प्रकल्पाकरीता संचालक प्रा.डॉ.आर.डी.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.जितेंद्र नारखेेडे व प्रा.पवन मेश्राम या प्रकल्पाची देखरेख करणार आहेत.

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेला केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे संशोधन सुविधांसाठी दोन कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी एक कोटी ६५ लाख रुपयांचे अनुदान पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले आहे. या अनुदानातून संस्थेत संशोधन उपकरणांची खरेदी व देखभाल करण्यात येईल. डीएसटी-फिस्ट या प्रकल्पाकरीता संचालक प्रा.डॉ.आर.डी.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.जितेंद्र नारखेेडे व प्रा.पवन मेश्राम या प्रकल्पाची देखरेख करणार आहेत.

मणियार विधी महाविद्यालयात विशेष विधी व्याख्यान
जळगाव : एस.एस.मणियार विधी महाविद्यालयात मुंबई ग्रामीणचे माजी पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी मार्गदर्शन केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेश केसवाणी, रोटरी क्लब ईस्टचे अध्यक्ष संजय गांधी, प्राचार्य डॉ.बी.युवाकुमार रेड्डी, प्रा.शमा सराफ, ॲड.भुसारी, नित्यानंद पाटील, प्रा.डी.आर.क्षीरसागर, प्रा.रेखा पाहुजा, प्रा.जी.व्ही.धुमाळे, प्रा.योगेश महाजन, डॉ.विजेता सिंग, प्रा.अंजली बोंदर, प्रा.ज्योती भोळे, प्रा.कैलास बोरसे, ग्रंथपाल प्रवीण चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ.विजेता सिंग यांनी मानले.

सुशिक्षीत बेरोजगारांना २० हजार रुपये मानधन द्या
जळगाव : शासन काही वर्षांपासून सुशिक्षीत व बेरोजगार तरुणांना शासकीय व निमशासकीय सेवेत नोकरी देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. शासनाने सुशिक्षीत बेरोजगारांना २० हजार रुपये मानधन द्यावी अशी मागणी अध्यक्ष शाम साळुंखे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. नोकर भरती दरम्यान ठिकठिकाणी अनियमितता होत असल्यामुळे पात्र व गरजवंत उमेदवारांना नोकरीपासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

अल्पसंख्याक संस्थांच्या प्रस्तावाची चौकशी व्हावी
जळगाव : केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागातंर्गत आयडीएमआय योजनेद्वारे शाळांच्या बांधकामासाठी ५० लाख रुपये प्रती संस्थेला अनुदान देण्यात येत असते. या वर्षभरात ८७ अल्पसंख्याक संस्थांचे प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठविण्यात आले होते. हे सर्व प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. या प्रकरणी संबधित अधिकार्‍यांची चौकशी करावी या आशयाची मागणी राज्य फेडरेशन ऑफ धार्मिक व अल्पभाषिक संस्थांचे अध्यक्ष पी.ए.इनामदार व सचिव करीम सालार यांनी केली आहे.