शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन होणार स्वस्त; अमेरिकेसोबतच्या ‘व्यापार युद्धा’मुळे चिनी उत्पादकांकडून भारतास ५ टक्के सूट देण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 09:51 IST

मागणी वाढवण्यासाठी चिनी कंपन्या भारतास किमतीत ५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा उदारपणा दाखवत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नई दिल्ली  : ‘व्यापार युद्धा’मुळे इलेक्ट्रॉनिक्स सुटे भाग उत्पादन करणाऱ्या चिनी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना ५ टक्क्यांपर्यंत सवलतीच्या दरात माल पुरवठा करण्याचे प्रस्ताव दिले आहेत. त्यामुळे भारतात टीव्ही, फ्रिज आणि स्मार्टफोन यांसारख्या वस्तू स्वस्त होऊ शकतात.  मागणी वाढविण्यासाठी भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक सवलती ग्राहकांना देतील. त्यातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे स्वस्त होऊ शकतात. 

अमेरिकेने १२५ टक्के टॅरिफ लावल्यामुळे चिनी कंपन्यांच्या वस्तू महाग होतील. टॅरिफमुळे चीनने अमेरिकेत निर्यात केलेल्या १०० डॉलरच्या वस्तूंची किंमत २२५ डॉलर होईल. त्यामुळे मागणी घटणार आहे. मागणी वाढविण्यासाठी चिनी कंपन्या भारतास किमतीत ५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा उदारपणा दाखवित आहेत. याचा थेट फायदा भारतीयांना होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाटाघाटींचा मार्ग झाला मोकळाअमेरिकेने आयात करास ९० दिवसांची स्थगिती दिल्यामुळे वाटाघाटींचा मार्ग मोकळा झाला आहे, असे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे (फियो) अध्यक्ष एस. सी. रल्हन यांनी सांगितले. तोडग्यासाठी मार्ग निर्माण व्हावा म्हणून आयात करांस स्थगिती दिली गेली आहे, असे दिसते, असे ते म्हणाले.

अमेरिका-चीन व्यापार तणावामुळे जगाला फटकाअमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे जागाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असा इशारा जागतिक व्यापार संघटनेने दिला आहे. या जागतिक व्यापार अनिश्चिततेचे नकारात्मक परिणाम केवळ अमेरिका आणि चीनपुरते मर्यादित राहणार नाहीत तर इतर अर्थव्यवस्थांवर, विशेषतः कमी विकसित देशांवरही त्याचा परिणाम होईल, असे संघटनेने म्हटले आहे.

चीनमधून कशाची होते सर्वाधिक आयात?चीनमधून भारतात सर्वाधिक आयात इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची होते. यात स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, पाॅवर सप्लायज् आणि इलेक्ट्रॉनिक सुटेभाग यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक उपकरण आयात ३०.६३ अब्ज डॉलर इतकी होती.

टॅग्स :chinaचीन