शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

वाहता नळ दिसल्यास कनेक्शन बंद

By admin | Updated: May 6, 2016 01:18 IST

अभिजित वायकोस : तासगावात पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन

तासगाव : तासगाव शहरातील प्रत्येक नागरिकाने पाण्याचा वापर काटकसरीने करून वाया जाणारे पाणी थांबविण्यासाठी पाऊल उचलावे, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी केले. पाण्याचे पैसे भरत आहे म्हणून पाणी वाया घालविण्याचा अधिकार नाही, असे सांगतानाच ज्या नळधारकांच्या नळातून पाणी वाहून वाया जाताना दिसेल व ज्यांच्या नळातील पाण्याचा गैरवापर होताना दिसेल, त्यांचे नळ कनेक्शन सक्तीने बंद करण्यात येईल, असा इशाराही वायकोस यांनी दिला आहे. तसेच पाण्याच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपरिषदेने पाणी पाहणी पथक तयार केले असल्याचेही सांगण्यात आले.अन्य शहरांच्या तुलनेत तासगाव शहरात समाधानकारक, सुरळीत व नियमितपणे पाणी पुरवठा सुरू आहे. याहूनही अधिक चांगला पाणी पुरवठा व्हावा यासाठी नगरपरिषदेच्यावतीने होत असलेल्या टप्पा क्रमांक - ३ योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असेही वायकोस यांनी सांगितले.तासगाव शहरात मागणीनुसार नळपाणी कनेक्शन देण्यात येत असून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न नगरपरिषद पदाधिकारी व प्रशासन करत आहे. असे असताना, पुरेसे पाणी येऊनही काही नागरिक नळ वाहता ठेवत आहेत. त्यामुळे काही नागरिकांना अपुरा पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्रात दुष्काळाचा मोठा फटका बसताना असताना सांगली जिल्हाही यापासून सुटला नाही. जिल्ह्यात अनेक भागात पाण्याची तीव्र समस्या जाणवत आहे. ही समस्या दूर करण्यासाठीच प्रशासनाकडून असे पाऊल उचलले गेलेल्याचे सांगण्यात आले. तालुक््यातील प्रत्येक नागरिकाने पाणी बचत होण्यासाठी बचत करणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले. यापुढील काळात पाण्याबाबत कु ठे हलगर्जीपणा दिसत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला.तासगावातील प्रत्येक नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून वाया जाणारे पाणी थांबविण्यासाठी पाऊल उचलावे. पाणी हा आपला हक्क नसून गरज म्हणून ते पुरविण्यात येते. त्याचा वापर प्रत्येकाने जबाबदारीने व गरज म्हणून करावा. केवळ पाण्याचे पैसे भरत आहे, म्हणून पाणी वाया घालविण्याचा अधिकार नाही. पाण्याचे महत्त्व सर्वांनी जाणून त्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन करून, यापुढे ज्या नळधारकांच्या नळातून पाणी वाहून वाया जाताना दिसेल, त्याचे व्हिडीओ शूटिंग करून जागेवर पंचनामा करून, त्याचे नळ कनेक्शन सक्तीने बंद करण्यात येईल, असा इशाराही मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी दिला आहे. (वार्ताहर)तक्रारींची दखल : प्रशासन कडक नगरपरिषदेकडे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन नगरपरिषदेत नव्याने तयार करण्यात आलेल्या पाणी पाहणी पथकाने व्हिडीओ कॅमेऱ्यासह गुरुवार पेठ भागात प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यावेळी काही नागरिकांच्या नळांना पाण्यासाठी लावण्यात येणाऱ्या तोट्या नव्हत्या. यावेळी त्यांना पाणी बचतीविषयी समज देण्यात आली आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्याची सूचनाही करण्यात आली आहे. यापुढील काळात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासन कडक धोरण राबवणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.तपासणीसाठी पाणी पाहणी पथकाची नेमणूकशहरातील पाणी पुरवठ्यावर नियंत्रण व देखरेख करण्यासाठी नगरपरिषदेने पाणी पाहणी पथक तयार केले आहे. यामध्ये प्रताप घाटगे, प्रकाश भोसले, रमाकांत शितोळे, संजय सूर्यवंशी, कैलास खटावकर, प्रवीण धाबुगडे, वैभव गेजगे, दीपक स्वामी यांचा समावेश आहे.