शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

टुरिझम हवाय की टेररिझम ?

By admin | Updated: April 3, 2017 06:56 IST

टुरिझम हवाय की टेररिझम, याचा निर्णय काश्मिरी तरुणांनी घ्यायचा आहे

सुरेश भटेवरा,उधमपूर- टुरिझम हवाय की टेररिझम, याचा निर्णय काश्मिरी तरुणांनी घ्यायचा आहे. पहिला मार्ग आर्थिक सुबत्ता वाढवणारा आहे, तर दुसरा मार्ग जम्मू काश्मीरचे भवितव्य उद्ध्वस्त करणारा. तरुणांनी साथ दिली, तर काश्मीरचे भाग्य बदलल्याशिवाय राहाणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले.चेनानी-नाशिर या सर्वात लांब बोगद्याचे लोकार्पण केल्यानंतर, विराट जाहीर सभेत पंतप्रधानांनी अनेक नाजूक विषयांना स्पर्श करीत उपस्थितांची मने जिंकली. व्यासपीठावर मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंग उपस्थित होते.काश्मीरमध्ये वारंवार होणाऱ्या दगडफेकीचा उल्लेख करीत, मोदी म्हणाले की, दगडाची किंमत मला माहीत आहे. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बोगदा निर्माण करण्यासाठी जम्मू काश्मिरातले ९0 टक्के तरुण तीन वर्षे दिवस-रात्र दगड फोडीत होते. हा बोगदा जम्मू आणि श्रीनगरमधील भौगोलिक अंतरच नाही, तर दोन भागांतल्या जनतेच्या मनातले अंतरही दूर करणारा आहे. दुसरीकडे हातात दगड घेऊ न काश्मीरचे भवितव्य उद्ध्वस्त करण्याचे काम काही तरुण करीत आहेत. त्यांच्या दहशतीमुळेच येथील पर्यटन व्यवसाय त्यांच्या दहशतीमुळेच थंडावला आहे. मुख्यमंत्री महेबुबा यांनी श्रीनगर खोऱ्यात पर्यटन किती सुरक्षित व आल्हाददायक आहे, हे जगाला पटवून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी वारंवार या भागाचा दौरा करावा अशी इच्छा व्यक्त केली. राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांचेही या प्रसंगी भाषण झाले. मोदींची आजची ही सभा विराट म्हणता येईल, इतकी मोठी होती.राज्यात आणखी ९ बोगदे - गडकरी२0१८ पर्यंत जम्मू-श्रीनगर हे २८९ किलोमीटरचे अंतर २३१ पर्यंत कमी करण्याचे काम सुरू आहे. येथे रस्ते सर्वोत्तम बनवण्यासाठी ६0 हजार कोटींचा खर्च दोन वर्षांत करू. राज्यात आणखी ९ बोगदे तयार होतील.. त्यात लेहजवळ ६ हजार कोटी खर्चाच्या जोजी ला पास बोगद्याचाही समावेश आहे. बोगद्याची संख्या १३ पर्यंत नेण्याचा इरादा आहे जम्मूमध्ये ३१00 कोटी आणि श्रीनगरमधे २२00 कोटी रिंग रोडसाठी खर्च होणार आहेत. त्यामुळे येथील पर्यटन आणि रोजगार वाढेल व राज्याचा विकासही वेगाने होईल. >केंद्र सरकार तुमच्या पाठिशी पर्यटकांना एकदा तरी काश्मीरला जावे, असे वाटते. त्यांची भीती दूर करण्याची जबाबदारी इथल्या तरुणांवर आहे. गेली ४0 वर्षे दहशतवादाने राज्याला ग्रासले. त्यातून पदरात काही पडले नाही. भूतकाळात जे घडले, ते बदलण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल. त्यासाठी केंद्र सरकार तुमच्या पाठिशी आहे. राज्याच्या विकास योजनांसाठी केंद्र सरकारने ८0 हजार कोटींचे आर्थिक पॅकेज देऊ केले. त्यातली निम्मी अधिक रक्कम कामांवर खर्च झाली आहे, असे ते म्हणाले. मोबाइलचे फ्लॅश चमकवून... भाषणाच्या सुरुवातीलाच मोबाइलचे फ्लॅश चमकवून जनतेनेच बोगद्याचे उद्घाटन करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. या वेळी हजारो तरुण ‘मोदी मोदी’ घोषणांचा गजर करीत मोबाइलचे फ्लॅश चमकवीत होते. आंतरराष्ट्रीय मानदंडांच्या एक पाऊ ल पुढे जात, अत्याधुनिक सुविधांनी युक्त बोगद्याचे शिल्प घडवल्याबद्दल नितीन गडकरी व त्यांच्या साऱ्या टीमची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.