शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

‘टुकार’ कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ रोखा

By admin | Updated: November 23, 2015 03:03 IST

सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा बोनस न देता त्यांना कामगिरीशी निगडित पगार दिला जावा, असे सुचवत असतानाच ७व्या वेतन आयोगाने २० वर्षांच्या सेवेनंतरही कामाचा अपेक्षित दर्जा

नवी दिल्ली : सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा बोनस न देता त्यांना कामगिरीशी निगडित पगार दिला जावा, असे सुचवत असतानाच ७व्या वेतन आयोगाने २० वर्षांच्या सेवेनंतरही कामाचा अपेक्षित दर्जा गाठू न शकणाऱ्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढही बंद करण्याची शिफारस केली आहे.कामकाजाचे मूल्यांकनही ‘चांगल्या’वरून ‘अतिशय चांगले’ अशा पद्धतीने केले जावे, असे ७व्या वेतन आयोगाने केंद्राला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. नोकरीच्या कारकिर्दीतील प्रगती (मॉडिफाईड अस्यूर्ड करीअर प्रोगे्रसन - एमएसीपी) अतिशय सामान्यपणे घेतली जाते. त्याचा संबंध कर्मचाऱ्यांशी कामकाजाची जोडलेला असावा. कामकाजाचे मापदंड पूर्ण करू शकत नसलेल्या कर्मचाऱ्याला भविष्यात वार्षिक वेतनवाढ दिली जाऊ नये, असेही न्या. ए.के. माथूर यांच्या नेतृत्वातील आयोगाने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)घरभाड्याची ‘डीए’शी सांगडघरभाडे भत्त्याची महागाई भत्त्याशी (डीए) सांगड घालण्याची शिफारसही आयोगाने केली आहे. ‘डीए’ ५० टक्क्यांच्या पुढे गेला की, घरभाडे भत्ता ‘एक्स’, ‘वाय’ व ‘झेड’ दर्जाच्या शहरांसाठी अनुक्रमे ३, २ व १ टक्क्याने वाढवावा आणि ‘डीए’ १०० टक्क्यांच्या पुढे गेला की घरभाडे भत्त्यातीलही वाढ अनुक्रमे ६, ४ व २ टक्के असावी, असे आयोगाने म्हटले आहे.शिफारशींचा अभ्यास - जितेंद्रसिंगवेतन आयोगाच्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतरच पुढील प्रक्रिया अवलंबली जाईल, असे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी रविवारी स्पष्ट केले. अहवाल सादर झाल्यानंतर काही निश्चित प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. अहवालाचा अभ्यास केल्यानंतरच पुढील पाऊल टाकण्यात येईल, असे ते म्हणाले. आयोगाने गुरुवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांना अहवाल सादर केला. त्यात वेतन, भत्ते व निवृत्तिवेतनात सरासरी २३.५५ टक्के वाढ सुचविली आहे. ४७ लाख केंद्रीय कर्मचारी व ५२ लाख पेन्शनर्सना त्याचा लाभ मिळणार आहे.केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून सरकारने स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाने केली आहे. केंद्राच्या कर्मचाऱ्यांनंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होतात. मात्र त्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकीची रक्कम शिल्लक राहते. केंद्राप्रमाणे राज्याने तत्काळ शिफारशी लागू केल्या, तर थकबाकीचा प्रश्नच उद्भवणार नाही, असा दावा संघटनेचे सरचिटणीस रमेश सरकटे यांनी केला आहे.