शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

‘टुकार’ कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ रोखा

By admin | Updated: November 23, 2015 03:03 IST

सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा बोनस न देता त्यांना कामगिरीशी निगडित पगार दिला जावा, असे सुचवत असतानाच ७व्या वेतन आयोगाने २० वर्षांच्या सेवेनंतरही कामाचा अपेक्षित दर्जा

नवी दिल्ली : सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा बोनस न देता त्यांना कामगिरीशी निगडित पगार दिला जावा, असे सुचवत असतानाच ७व्या वेतन आयोगाने २० वर्षांच्या सेवेनंतरही कामाचा अपेक्षित दर्जा गाठू न शकणाऱ्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढही बंद करण्याची शिफारस केली आहे.कामकाजाचे मूल्यांकनही ‘चांगल्या’वरून ‘अतिशय चांगले’ अशा पद्धतीने केले जावे, असे ७व्या वेतन आयोगाने केंद्राला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. नोकरीच्या कारकिर्दीतील प्रगती (मॉडिफाईड अस्यूर्ड करीअर प्रोगे्रसन - एमएसीपी) अतिशय सामान्यपणे घेतली जाते. त्याचा संबंध कर्मचाऱ्यांशी कामकाजाची जोडलेला असावा. कामकाजाचे मापदंड पूर्ण करू शकत नसलेल्या कर्मचाऱ्याला भविष्यात वार्षिक वेतनवाढ दिली जाऊ नये, असेही न्या. ए.के. माथूर यांच्या नेतृत्वातील आयोगाने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)घरभाड्याची ‘डीए’शी सांगडघरभाडे भत्त्याची महागाई भत्त्याशी (डीए) सांगड घालण्याची शिफारसही आयोगाने केली आहे. ‘डीए’ ५० टक्क्यांच्या पुढे गेला की, घरभाडे भत्ता ‘एक्स’, ‘वाय’ व ‘झेड’ दर्जाच्या शहरांसाठी अनुक्रमे ३, २ व १ टक्क्याने वाढवावा आणि ‘डीए’ १०० टक्क्यांच्या पुढे गेला की घरभाडे भत्त्यातीलही वाढ अनुक्रमे ६, ४ व २ टक्के असावी, असे आयोगाने म्हटले आहे.शिफारशींचा अभ्यास - जितेंद्रसिंगवेतन आयोगाच्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतरच पुढील प्रक्रिया अवलंबली जाईल, असे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी रविवारी स्पष्ट केले. अहवाल सादर झाल्यानंतर काही निश्चित प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. अहवालाचा अभ्यास केल्यानंतरच पुढील पाऊल टाकण्यात येईल, असे ते म्हणाले. आयोगाने गुरुवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांना अहवाल सादर केला. त्यात वेतन, भत्ते व निवृत्तिवेतनात सरासरी २३.५५ टक्के वाढ सुचविली आहे. ४७ लाख केंद्रीय कर्मचारी व ५२ लाख पेन्शनर्सना त्याचा लाभ मिळणार आहे.केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून सरकारने स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाने केली आहे. केंद्राच्या कर्मचाऱ्यांनंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होतात. मात्र त्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकीची रक्कम शिल्लक राहते. केंद्राप्रमाणे राज्याने तत्काळ शिफारशी लागू केल्या, तर थकबाकीचा प्रश्नच उद्भवणार नाही, असा दावा संघटनेचे सरचिटणीस रमेश सरकटे यांनी केला आहे.