शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दार्जिलिंगमध्ये ट्युबलाइट मोर्चा

By admin | Updated: June 27, 2017 15:57 IST

गोरखा जनमुक्ती मोर्चाने आज दार्जिलिंगमध्ये "ट्युबलाईट" मोर्चा काढला.

ऑनलाइन लोकमत

दार्जिलिंग, दि. 27-  गेल्या काही दिवसांपासून दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाचं आंदोलन सुरू आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी गोरखा समितीने सुरू केलेल्या आंदोलनला हिंसक वळणही लागलं. पण आता आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी दार्जिलिंगमध्ये वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. गोरखा जनमुक्ती मोर्चाने आज दार्जिलिंगमध्ये "ट्युबलाईट" मोर्चा काढला. वेगळ्या राज्याची मागणी करणाऱ्या गोरखा जनमुक्ती मोर्चाने हा मोर्चा काढला होता. यावेळी आंदोलकांनी आपल्या पाठीवर ट्युबलाइटही फोडल्या.
 
गोरखा जनमुक्ती मोर्चाने स्वतंत्र गोरखालँड राज्याची मागणी करण्यासाठी आपलं आंदोलन आणखी तीव्र केलं आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाने दार्जिलिंगमधील इतर भागातही गोरखालँड स्वायत्ता करार जाळण्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी झालेल्या "ट्युबलाइट" मोर्चातही करार जाळण्यात आला. त्याशिवाय गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या युवा आघाडीच्यावतीने आमरण उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा या आंदोलना दरम्यान देण्यात आला. 
 
दार्जिलिंगमध्ये सुरु असलेलं हे आंदोलन दिवसेंदिवस हिंसक वळण घेतं आहे. याआधी 17 जून रोजी आंदोलनामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला भोसकल्याची घटना घडली होती. तसंच आंदोलकांनी एक पोलीस व्हॅनही जाळली. गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या आंदोलकांनी पोलिसांवर दगड, पेट्रोल बॉम्ब तसेच बाटल्या फेकल्यामुळे पोलिसांना लाठीमार तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना आवरावं लागलं. इंडिया रिझर्व्ह बटालियनचे असिस्टंट कमांडंट किरण तमांग यांना आंदोलकांनी भोसकल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. या तणावपूर्व परिस्थितीमुळे दार्जिलिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 
 
स्वतंत्र गोरखा लॅण्डच्या मागणीसाठी ८ जूनपासून आंदोलन करीत असलेल्या जीजेएम कार्यकर्त्यांनी सिंगमारी येथील पक्ष मुख्यालयापासून निषेध मोर्चा काढला होता. आपण आंदोलकांशी चर्चेला तयार आहोत. मात्र, राज्यघटनेचं उल्लंघन केलं जाऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. सरकारला बदनाम करण्यासाठी काही उपद्रवी शक्ती मुद्दाम आंदोलनास चिथावत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, सद्य:स्थितीविषयी राज्य सरकारकडून अहवाल आल्याखेरीज केंद्र सरकार सुरक्षा दलांची जादा कुमक पाठविणार नाही, अशी भूमिका केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली होती.