शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दार्जिलिंगमध्ये ट्युबलाइट मोर्चा

By admin | Updated: June 27, 2017 15:57 IST

गोरखा जनमुक्ती मोर्चाने आज दार्जिलिंगमध्ये "ट्युबलाईट" मोर्चा काढला.

ऑनलाइन लोकमत

दार्जिलिंग, दि. 27-  गेल्या काही दिवसांपासून दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाचं आंदोलन सुरू आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी गोरखा समितीने सुरू केलेल्या आंदोलनला हिंसक वळणही लागलं. पण आता आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी दार्जिलिंगमध्ये वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. गोरखा जनमुक्ती मोर्चाने आज दार्जिलिंगमध्ये "ट्युबलाईट" मोर्चा काढला. वेगळ्या राज्याची मागणी करणाऱ्या गोरखा जनमुक्ती मोर्चाने हा मोर्चा काढला होता. यावेळी आंदोलकांनी आपल्या पाठीवर ट्युबलाइटही फोडल्या.
 
गोरखा जनमुक्ती मोर्चाने स्वतंत्र गोरखालँड राज्याची मागणी करण्यासाठी आपलं आंदोलन आणखी तीव्र केलं आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाने दार्जिलिंगमधील इतर भागातही गोरखालँड स्वायत्ता करार जाळण्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी झालेल्या "ट्युबलाइट" मोर्चातही करार जाळण्यात आला. त्याशिवाय गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या युवा आघाडीच्यावतीने आमरण उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा या आंदोलना दरम्यान देण्यात आला. 
 
दार्जिलिंगमध्ये सुरु असलेलं हे आंदोलन दिवसेंदिवस हिंसक वळण घेतं आहे. याआधी 17 जून रोजी आंदोलनामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला भोसकल्याची घटना घडली होती. तसंच आंदोलकांनी एक पोलीस व्हॅनही जाळली. गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या आंदोलकांनी पोलिसांवर दगड, पेट्रोल बॉम्ब तसेच बाटल्या फेकल्यामुळे पोलिसांना लाठीमार तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना आवरावं लागलं. इंडिया रिझर्व्ह बटालियनचे असिस्टंट कमांडंट किरण तमांग यांना आंदोलकांनी भोसकल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. या तणावपूर्व परिस्थितीमुळे दार्जिलिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 
 
स्वतंत्र गोरखा लॅण्डच्या मागणीसाठी ८ जूनपासून आंदोलन करीत असलेल्या जीजेएम कार्यकर्त्यांनी सिंगमारी येथील पक्ष मुख्यालयापासून निषेध मोर्चा काढला होता. आपण आंदोलकांशी चर्चेला तयार आहोत. मात्र, राज्यघटनेचं उल्लंघन केलं जाऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. सरकारला बदनाम करण्यासाठी काही उपद्रवी शक्ती मुद्दाम आंदोलनास चिथावत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, सद्य:स्थितीविषयी राज्य सरकारकडून अहवाल आल्याखेरीज केंद्र सरकार सुरक्षा दलांची जादा कुमक पाठविणार नाही, अशी भूमिका केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली होती.