शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

विश्वासार्ह सरकार

By admin | Updated: May 27, 2017 02:47 IST

नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचे विश्लेषण करताना देशभरातील जनताही प्रथम श्रेणीचे गुण म्हणजे ६0 टक्क्यांहून अधिक गुण निश्चितच देईल.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचे विश्लेषण करताना देशभरातील जनताही प्रथम श्रेणीचे गुण म्हणजे ६0 टक्क्यांहून अधिक गुण निश्चितच देईल. अतिशय आत्मविश्वासाने काम करणारा, जे करायचे आहे, ते वेळोवेळी जनतेला स्वत:हून सांगणारा, भ्रष्टाचाराला थारा न देणारा आणि सरकारी कामकाजात पारदर्शकता आणणारा नेता असेच मोदी यांच्या तीन वर्षांच्या कामकाजाचे वर्णन करता येईल. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अनेकदा सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे नेते सत्तेत मश्गुल होताना दिसतात. पण मोदी यांनी मात्र तसे स्वत:च्या बाबतीत होऊ दिलेले नाही आणि पक्षाच्या नेत्यांवरही वचक ठेवल्याने तेही तसे वागताना दिसलेले नाहीत. मंत्र्यांच्या वाहनांवरील लाल दिवे काढण्याचा निर्णय, अधिकाऱ्यांच्या निष्कारण होणाऱ्या परदेश दौऱ्यांतील कपात, अकार्यक्षम मंत्री वा अधिकाऱ्यांना प्रसंगी सुनावण्याचे प्रकार अशी अनेक उदाहरणे मोदी यांनी सरकारी कामात शिस्त आणण्यासंदर्भात सांगता येतील. त्यामुळेच जनतेच्या मोदी व त्यांच्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. मुळात अनेक वर्षांनी बिगरकाँग्रेसचे सरकार केंद्रात आल्याने जनतेच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या. त्या सर्व पूर्ण करणे शक्य नसले तरी त्या दृष्टीने सरकार किमान पावले टाकताना या काळात दिसले आहे. मोदी सरकारच्या काळात गरिबी कमी झाली, रोजगार वाढले, भ्रष्टाचार पूर्णत: थांबला, शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला असे काहीच घडलेले नाही. नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला पूर्णत: आळा बसला वा सर्जिकल स्ट्राइकमुळे पाकिस्तान शांत झाला, असेही या काळात दिसलेले नाही. वास्तविक, गेल्या तीन वर्षांत रोजगार सातत्याने कमी होत असून, आयटी क्षेत्रातील नोकऱ्या ज्या वेगाने जात आहेत, त्यामुळे तरुणांमध्ये घबराटच आहे. शेतकऱ्यांची आंदोलने हमीभावासाठी सुरूच आहेत, कर्जबाजारीपणामुळे त्यांच्या आत्महत्या वाढतच चालल्या आहेत. काश्मीर प्रश्न सोडविणे अवघडच आहे. पण तो सुटावा, यासाठीही पुरेसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. धार्मिक तेढ, जातीय विद्वेष, असहिष्णुता यानिमित्ताने सरकारवर सातत्याने टीका होत आहे. विद्यापीठांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हे सारे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातूनही दिसून आले. तरीही आजच्या स्थितीत देशातील जनतेला खात्री वाटत आहे ती केवळ नरेंद्र मोदी यांची. त्यांना केवळ मोदी हेच आश्वासक नेते वाटतात. ते जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, यावर जनतेचा विश्वास आहे. मोदी सरकारचे तीन वर्षांतील यशाचे नेमके हेच गमक आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये सहमती घडवून जीएसटीचा कायदा संमत करवून घेण्यात हे सरकार यशस्वी ठरले, याचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. तसेच देशाचा विकास साधायचा असेल, तर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेत मोदी सरकारने वीज, रस्ते, सागरी वाहतूक, रेल्वे वाहतूक यांत सुधारणा सुरू केल्या. त्या लोकांना भावल्या आहेत. भारताचे परराष्ट्र धोरण मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत: यशस्वी झाले, असे म्हणता येत नसले तरी मोदी नावाची जादू जगभरातील सर्व राष्ट्रांच्या नेत्यांवर आहे. त्यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे जगभरातील देशांना भारताचे सतत नाव घ्यावे लागत आहे. स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया यासारख्या योजना प्रत्यक्षात यायला वेळ लागेल. पण या योजना यशस्वी झाल्याचा फायदा देशालाच होईल. बहुधा यामुळेच गेल्या तीन वर्षांत झालेल्या बहुसंख्य राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने भाजपालाच निवडून दिले. अगदी ईशान्येकडील राज्यांत जिथे भाजपा हे नावही नव्हते, तेथील राज्येही त्या पक्षाच्या हातात आली. आपणच देशाचे प्रश्न सोडवू शकतो, हे जनतेच्या मनावर बिंबवण्यात मोदी आणि त्यांचे सरकार यशस्वी ठरले आहे. त्यामुळे काँग्रेससारख्या अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या राष्ट्रीय पक्षाला अद्यापही सावरणे अवघड झाले आहे. मात्र आपल्या निर्णयांची फळे पुढील दोन वर्षांत जनतेपर्यंत पोहोचवणे, हे महत्कार्य मोदी सरकारला करावे लागणार आहे. तोपर्यंत अन्य विरोधक सावरणे अवघड असले तरी जनतेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत आहेत, याची खात्री पटणे गरजेचे आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला दीड महिना शिल्लक आहे. त्यासाठी उमेदवार सहमतीने निवडला जावा, ही अपेक्षा आहे. निवडणुकांमध्ये यशाच्या अश्वमेधावर स्वार असलेल्या मोदी यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे हीच खरी कसोटी असेल.