शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

मानवतेचा खरा विकास साहित्यातून होत असतो

By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST

* चंद्रकुमार नलगे : कुद्रेमनी येथे ११ वे साहित्य संमेलन

* चंद्रकुमार नलगे : कुद्रेमनी येथे ११ वे साहित्य संमेलन
* कुद्रेमनी (ता. बेळगाव) येथील साहित्य संमेलनात बोलताना प्रा. चंद्रकुमार नलगे.
क्रमांक : २२०१२०१७-गड-०८
चंदगड : प्रलंबित असलेला सीमाप्रश्न महाराष्ट्र व कर्नाटक सरकारने सामंजस्याने विचार करून सोडवायला हवे. सीमेवरच्या लढाईत मराठी माणसांनाच अत्याचार सहन करावा लागला आहे. ९ व्या शतकापासून संपूर्ण कर्नाटकात मराठीचा जागर घुमतोय. त्यामुळे संकुचितवृत्तीने मराठी भाषेला विरोध करणे चुकीचे आहे. लोकजागर, प्रबोधन, समाज बदलण्यासाठी साहित्य संमेलन व्हावीत. नवसमाज निर्मिती व मानवता जिवंत ठेवायची असेल तर साहित्याचा विकास झाला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष प्रा. चंद्रकमार नलगे यांनी केले.
कुद्रेमनी (ता. बेळगाव) येथे बलभीम साहित्य संघ आयोजित ११ व्या साहित्य संमेलनात बोलत होते.
प्रास्ताविक महादेव गुरव यांनी करून साहित्य चळवळीतूनच मराठीचा जागर करणे व मराठी भाषिकांमध्ये एकजूट ठेवणे हाच या संमेलनाचा उद्देश आहे.
नलगे म्हणाले, त्यागावर आधारलेली भारतीय संस्कृती आहे. पण, स्वैराचार वाढलेल्या युगात सृजनशील संस्कृतीलाच धोका निर्माण झाला आहे. माता व मातीचे ऋण मोठं आहे. ते जपण्याचे काम आजच्या साहित्यकांनी केले पाहिजे, असे सांगून मराठी मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी कर्नाटक सरकारने मोठं मन दाखवायला हवं.
संमेलनाच्या उद्घाटक जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी साहित्य संमेलने ही सीमाभागातील चळवळ बनली पाहिजे, असे मत व्यक्त करून सीमाभागातील मराठी भाषा आणि भाषिक यांना या साहित्य संमेलनातून बळ मिळत असल्याचे सांगितले.
प्रारंभी सकाळी गावातून गं्रथदिंडी काढण्यात आली. दुसर्‍या सत्रात प्रा. राजू पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवीसंमेलनात लता ऐहोळे, अनिल दीक्षित, पूजा भंडांगे यांनी कविता सादर केल्या. त्यानंतर मराठी संत साहित्यातील सामाजिक विचार या विषयावर प्रा. शिवाजीराव भुकेले यांचे व्याख्यान झाले. तिसर्‍या सत्रात मारुती कंगोरे यांनी कथाकथन सादर केले.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, आर. आय. पाटील, एन. बी. खांडेकर, माधुरी हेगडे, अशिता सुतार, आर. के. सुतार, शामला मारुती पाटील, अर्जून जांबोटकर, रघुनाथ गुडेकर, दीपक दळवी, डॉ. विजय क˜ीमणी, डॉ. व्ही. एस. सातेरी, प्रा. एम. बी. मापटे, प्रा. राजेश घोरपडे, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, रामचंद्र पाटील, पी. डी. कांबळे, महंेद्र पाटील आदीसह चंदगड, खानापूर, बेळगावमधील साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. वंदना गुरव यांनी स्वागत केले. जी. जी. पाटील व शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचलन केले. अमित मोहिते यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
चौकट
* १९८१ मध्ये दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा स्थापन करण्याला तत्कालीन प्रस्तावित साहित्यकराकडून प्रचंड विरोध झाला. यावेळी तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी मदत केल्यामुळे ग्रामीण भागात साहित्य संमेलने होऊ लागल्याचे प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी सांगितले.
* १९८२ मध्ये बेळगाव येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संस्थेतर्फे बेळगाव येथील साहित्य संमेलनाला परवानगी नाकारली होती. भाई दाजिबा देसाई यांच्यामुळेच ते संमेलन ज्योती कॉलेजमध्ये होऊ शकले, याची आठवणही नलगेंनी यावेळी करून दिली.