शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

दिल्ली भाजपाच्या दारुण पराभवामागची त्रिसूत्री

By admin | Updated: February 11, 2015 06:29 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मिळालेला ऐतिहासिक विजय हा भाजपाचे सर्वांत मोठे रणनीतीकार मानले जाणारे

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मिळालेला ऐतिहासिक विजय हा भाजपाचे सर्वांत मोठे रणनीतीकार मानले जाणारे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा पराभव आहे. पक्षासाठी सतत ४१ निवडणुका जिंकणाऱ्या शहा यांच्या रणनीतीत अशी कोणती चूक झाली की भाजपाला दिल्लीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला? यामागची काही प्रमुख प्राथमिक कारणे...> प्रचारात विकासाकडे दुर्लक्ष लोकसभेची निवडणूक आणि काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच भाजपा श्रेष्ठींनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही आक्रमक प्रचार मोहीम राबविली. पक्ष नेतृत्वाने अनेक दिग्गज नेत्यांसह पक्षाच्या १२० खासदारांची फौज प्रचारात उतरविली. सोशल मीडियासोबतच प्रिंट मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला. वर्तमानपत्रात मोठमोठ्या जाहिराती देऊन केजरीवाल यांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला. नकारात्मक प्रचार केला. त्यामुळे भाजपा लोकांना आपला विकासाचा अजेंडा समजावून सांगण्यात अपयशी ठरली. दिल्लीच्या सुशिक्षित व सभ्य लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले स्थानिक मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात आले नाहीत. या लोकांनी भाजपाचा हा नकारात्मक प्रचार नाकारला.> मोदी लाटेचा फायदा नाही निवडणुका उशिरा जाहीर झाल्यामुळे प्रदेश भाजपाला मोदी लाटेचा फायदा करून घेण्यात अपयश आले. दिल्लीत उशिराने निवडणुका जाहीर करणे हा भाजपाच्या विशेष रणनीतीचा भाग होता, असे सांगितले जाते. रा.स्व. संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांना तयारी करण्याची पूर्ण संधी मिळावी हा त्यामागचा हेतू होता. परंतु स्थानिक पातळीवर नेतृत्वाचा अभाव असल्याने कार्यकर्त्यांत कमालीचा संभ्रम निर्माण झाला. शिवाय मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यातही विलंब झाला आणि शेवटी किरण बेदींचे नाव पुढे आल्याने भाजपात गटबाजी निर्माण झाली.> व्हिजन डॉक्युमेंट अपयशी भाजपाने आम आदमी पार्टीचे डावपेच हाणून पाडण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणी आपले डावपेच बदलले आणि निवडणूक जाहीरनामा देण्याऐवजी व्हिजन डॉक्युमेंट सादर केले. त्यात दिल्लीच्या विकासासाठी एक रोडमॅप सादर करण्यात आला. व्हिजन डॉक्युमेंट जारी करण्यात विलंब झाल्याने हे व्हिजन डॉक्युमेंट नेमके काय आहे, हे लोकांना समजावून सांगण्यासाठी वेळच मिळाला नाही. भाजपाने निवडणूक प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीला दररोज पाच प्रश्न विचारले. हे प्रश्न फारसे प्रभावी नसल्याने आणि त्यात नकारात्मकताच असल्याने ते लोकांच्या गळी उतरले नाहीत.