शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली भाजपाच्या दारुण पराभवामागची त्रिसूत्री

By admin | Updated: February 11, 2015 06:29 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मिळालेला ऐतिहासिक विजय हा भाजपाचे सर्वांत मोठे रणनीतीकार मानले जाणारे

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मिळालेला ऐतिहासिक विजय हा भाजपाचे सर्वांत मोठे रणनीतीकार मानले जाणारे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा पराभव आहे. पक्षासाठी सतत ४१ निवडणुका जिंकणाऱ्या शहा यांच्या रणनीतीत अशी कोणती चूक झाली की भाजपाला दिल्लीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला? यामागची काही प्रमुख प्राथमिक कारणे...> प्रचारात विकासाकडे दुर्लक्ष लोकसभेची निवडणूक आणि काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच भाजपा श्रेष्ठींनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही आक्रमक प्रचार मोहीम राबविली. पक्ष नेतृत्वाने अनेक दिग्गज नेत्यांसह पक्षाच्या १२० खासदारांची फौज प्रचारात उतरविली. सोशल मीडियासोबतच प्रिंट मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला. वर्तमानपत्रात मोठमोठ्या जाहिराती देऊन केजरीवाल यांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला. नकारात्मक प्रचार केला. त्यामुळे भाजपा लोकांना आपला विकासाचा अजेंडा समजावून सांगण्यात अपयशी ठरली. दिल्लीच्या सुशिक्षित व सभ्य लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले स्थानिक मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात आले नाहीत. या लोकांनी भाजपाचा हा नकारात्मक प्रचार नाकारला.> मोदी लाटेचा फायदा नाही निवडणुका उशिरा जाहीर झाल्यामुळे प्रदेश भाजपाला मोदी लाटेचा फायदा करून घेण्यात अपयश आले. दिल्लीत उशिराने निवडणुका जाहीर करणे हा भाजपाच्या विशेष रणनीतीचा भाग होता, असे सांगितले जाते. रा.स्व. संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांना तयारी करण्याची पूर्ण संधी मिळावी हा त्यामागचा हेतू होता. परंतु स्थानिक पातळीवर नेतृत्वाचा अभाव असल्याने कार्यकर्त्यांत कमालीचा संभ्रम निर्माण झाला. शिवाय मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यातही विलंब झाला आणि शेवटी किरण बेदींचे नाव पुढे आल्याने भाजपात गटबाजी निर्माण झाली.> व्हिजन डॉक्युमेंट अपयशी भाजपाने आम आदमी पार्टीचे डावपेच हाणून पाडण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणी आपले डावपेच बदलले आणि निवडणूक जाहीरनामा देण्याऐवजी व्हिजन डॉक्युमेंट सादर केले. त्यात दिल्लीच्या विकासासाठी एक रोडमॅप सादर करण्यात आला. व्हिजन डॉक्युमेंट जारी करण्यात विलंब झाल्याने हे व्हिजन डॉक्युमेंट नेमके काय आहे, हे लोकांना समजावून सांगण्यासाठी वेळच मिळाला नाही. भाजपाने निवडणूक प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीला दररोज पाच प्रश्न विचारले. हे प्रश्न फारसे प्रभावी नसल्याने आणि त्यात नकारात्मकताच असल्याने ते लोकांच्या गळी उतरले नाहीत.