शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

दिल्ली भाजपाच्या दारुण पराभवामागची त्रिसूत्री

By admin | Updated: February 11, 2015 06:29 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मिळालेला ऐतिहासिक विजय हा भाजपाचे सर्वांत मोठे रणनीतीकार मानले जाणारे

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मिळालेला ऐतिहासिक विजय हा भाजपाचे सर्वांत मोठे रणनीतीकार मानले जाणारे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा पराभव आहे. पक्षासाठी सतत ४१ निवडणुका जिंकणाऱ्या शहा यांच्या रणनीतीत अशी कोणती चूक झाली की भाजपाला दिल्लीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला? यामागची काही प्रमुख प्राथमिक कारणे...> प्रचारात विकासाकडे दुर्लक्ष लोकसभेची निवडणूक आणि काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच भाजपा श्रेष्ठींनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही आक्रमक प्रचार मोहीम राबविली. पक्ष नेतृत्वाने अनेक दिग्गज नेत्यांसह पक्षाच्या १२० खासदारांची फौज प्रचारात उतरविली. सोशल मीडियासोबतच प्रिंट मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला. वर्तमानपत्रात मोठमोठ्या जाहिराती देऊन केजरीवाल यांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला. नकारात्मक प्रचार केला. त्यामुळे भाजपा लोकांना आपला विकासाचा अजेंडा समजावून सांगण्यात अपयशी ठरली. दिल्लीच्या सुशिक्षित व सभ्य लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले स्थानिक मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात आले नाहीत. या लोकांनी भाजपाचा हा नकारात्मक प्रचार नाकारला.> मोदी लाटेचा फायदा नाही निवडणुका उशिरा जाहीर झाल्यामुळे प्रदेश भाजपाला मोदी लाटेचा फायदा करून घेण्यात अपयश आले. दिल्लीत उशिराने निवडणुका जाहीर करणे हा भाजपाच्या विशेष रणनीतीचा भाग होता, असे सांगितले जाते. रा.स्व. संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांना तयारी करण्याची पूर्ण संधी मिळावी हा त्यामागचा हेतू होता. परंतु स्थानिक पातळीवर नेतृत्वाचा अभाव असल्याने कार्यकर्त्यांत कमालीचा संभ्रम निर्माण झाला. शिवाय मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यातही विलंब झाला आणि शेवटी किरण बेदींचे नाव पुढे आल्याने भाजपात गटबाजी निर्माण झाली.> व्हिजन डॉक्युमेंट अपयशी भाजपाने आम आदमी पार्टीचे डावपेच हाणून पाडण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणी आपले डावपेच बदलले आणि निवडणूक जाहीरनामा देण्याऐवजी व्हिजन डॉक्युमेंट सादर केले. त्यात दिल्लीच्या विकासासाठी एक रोडमॅप सादर करण्यात आला. व्हिजन डॉक्युमेंट जारी करण्यात विलंब झाल्याने हे व्हिजन डॉक्युमेंट नेमके काय आहे, हे लोकांना समजावून सांगण्यासाठी वेळच मिळाला नाही. भाजपाने निवडणूक प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीला दररोज पाच प्रश्न विचारले. हे प्रश्न फारसे प्रभावी नसल्याने आणि त्यात नकारात्मकताच असल्याने ते लोकांच्या गळी उतरले नाहीत.