शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

तृणमूलने जिंकल्या ९२७० जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:26 IST

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची राज्यावरची पकड अजिबात ढिली झालेली नाही हे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या गुरुवारी लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची राज्यावरची पकड अजिबात ढिली झालेली नाही हे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या गुरुवारी लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले. तृणमूल काँग्रेसने ग्राम पंचायतींच्या ९२७० जागांवर विजय मिळविला आहे. या निवडणुकांत भाजपा हाच तृणमूल काँग्रेसचा प्रतिस्पर्धी ठरला आहे.भाजपाने ग्राम पंचायतींच्या २०७९ जागा जिंकल्या असून तो २०० जागांवर आघाडीवर आहे. माकपची पिछेहाट झाली असून त्याला ५६२ जागा जिंकता आल्या व तो ११३ जागांवर आघाडीवर आहे. सर्वात वाईट अवस्था काँग्रेसची आहे. या पक्षाने ग्राम पंचायतींच्या ३१५ जागा जिंकल्या असून तो ६१ जागांवर आघाडीवर आहे. ग्रामपंचायतींच्या ४८६५० जागांपैकी १६८१४ जागांसाठी, पंचायत समित्यांच्या ९२१७ जागांपैकी ३०५९ जागांसाठी व जिल्हा परिषदांच्या ८२५ जागांपैकी२०३ जागांसाठी निवडणुका झाल्या नाहीत. (वृत्तसंस्था)>पंचायत समित्यांतही तृणमूल आघाडीवरया निवडणुकांत अपक्षांपैकी ७०८ उमेदवार निवडून आले, १२० जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकांतही तृणमूलच पुढे असून तिथे या पक्षाने ९५ जागा जिंकल्या असून ६५ जागांवर आघाडीवर आहे. जिल्हा परिषदेच्या तृणमूलने १० जागा जिंकल्या असून २५ जागांवर आघाडी घेतली. दक्षिण २४ परगणा, पूर्व मिदनापूर येथे तृणमूलने अन्य पक्षांना मागे टाकले. मुर्शिदाबाद व माल्दा वगळता तृणमूल काँग्रेसला भाजपानेच टक्कर दिली. मुर्शिदाबादमध्ये तृणमूलने ग्रामपंचायतींच्या ४६६ जागा जिंकल्या असून, काँग्रेसने ८३ जागा, माकपने ४८ व भाजपाने २४ जागा जिंकल्या. पुरुलियात मात्र भाजपा तृणमूल काँग्रेसच्या काहीसा पुढे आहे.