शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

त्रिपुरात सरकारी कर्मचाऱ्यालाच ठेचून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 05:08 IST

मुले पळवणा-या टोळीच्या अफवांमुळे शहानिशा न करता कोणालाही मारहाण करण्याचे आणि प्रसंगी ठेचून मारून टाकण्याचे सत्र देशाच्या विविध भागांत सुरू असून

आगरतळा : मुले पळवणाºया टोळीच्या अफवांमुळे शहानिशा न करता कोणालाही मारहाण करण्याचे आणि प्रसंगी ठेचून मारून टाकण्याचे सत्र देशाच्या विविध भागांत सुरू असून, त्रिपुरातील आगरतळामध्ये अशाच संशयातून जमावाने एका फेरीवाल्याला बेदम मारहाण केली. त्यात तो मरण पावला आणि तीन जण जखमी झाले.अफवांमुळे निरपराध लोकांना होणाºया मारहाणीची प्रकरणे वाढत असल्याने संपूर्ण त्रिपुरात एसएमएस व इंटरनेट सेवा २४ तासांसाठी बंद ्रकेल्याचे पोलीस महासंचालक ए. के. शुक्ला यांनी सांगितले.अफवांवर विश्वास ठेवू नका, असे लोकांना पटवून सांगण्यासाठी सरकारने नेमलेल्या एका कर्मचाºयाचीही जमावाने याचपद्धतीने ठेचून हत्या केली. सुकांता चक्रवर्ती असे त्याचे नाव असून, तो सरकारच्या माहिती विभागातील अफवाविरोधी मोहिमेचा सदस्य होता. हा कर्मचारी सबरूम येथून परतत असताना,तोही मुले पळवणाºया टोळीचा भाग असल्याची शंका तेथील रहिवाशांना आली. आपण मुले पळवत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सांगण्यासाठी माझी नेमणूक झाली आहे, असे तो जमावातील लोकांना वारंवार सांगत होता. पण त्याचे न ऐकता जमावाने त्याला ठार मारले.त्याआधी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधून रोजगारासाठी आगरतळ्याला आलेल्या झाहीर खान (वय ३०) याला गुरुवारी रात्री जमावान इतके मारले की तोही मरण पावला. तो फेरीवाला आहे. झाहीरखान गुरुवारी रात्री अन्य तिघांसह कारमधून आगरतळा येथे निघाला होता. त्याच्यासोबतचे तिघे इलेक्ट्रिक वस्तू विकणारे आहेत. (वृत्तसंस्था)या प्रकारानंतर पोलीस व सरकारी यंत्रणेमार्फत लगेच उपाययोजना करण्याऐवजी राज्य सरकारने याचे खापर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर फोडले आहे. आमच्या सरकारला बदनाम करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असे प्रकार करीत आहे, असा आरोप मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी केला. माकपने याचा लगेचच इन्कार केला. असले हास्यास्पद व न पटणारे आरोप केवळ भाजपाच्या लोकांनाच सुचतात, अशी टीका माकपतर्फे करण्यात आली आहे.