शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

तिहेरी खून प्रकरण

By admin | Updated: July 20, 2015 23:59 IST

नंदनवन तिहेरी खुनातील

नंदनवन तिहेरी खुनातील
चौघांचा जामीन फेटाळला
नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हसनबाग मखदूम अशरफ चौकातील तिहेरी खूनप्रकरणी चार आरोपींचा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे विशेष न्यायायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने चार आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
जगदीश विठ्ठल कोसूरकर (३०), त्याचा भाऊ दिलीप विठ्ठल कोसूरकर (२५) रा. जुना बगडगंज छापरूनगर, गणेश ऊर्फ गोल्डी जन्मोजय कुटे (२२) रा. व्यंकटेश कॉलनी आणि दीपक ऊर्फ मुन्ना बालकदास गिले (२५) रा. गंगाबाई घाट, स्वीपर कॉलनी, अशी आरोपींची नावे आहेत. रशीद खान, अब्दुल बेग आणि रोहित नारनवरे, अशी मृतांची नावे होती. प्रदीप भारत घोडे रा. जुना बगडगंज, असे जखमीचे नाव होते.
तिहेरी खुनाची ही घटना २० जून २०१४ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली होती. मृत इसम आणि जखमी हे हिवरीनगर येथील कुख्यात राहुल ऊर्फ चेपट्या मेश्राम याच्या टोळीतील होते. चेपट्याची टोळी आणि कोसूरकरची टोळी सक्करदरा तलावाजवळील बॉलिवूड सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये आयोजित कुख्यात बाल्या वंजारी याच्या लग्नसमारंभात सहभागी झाली होती. दोन्ही टोळ्या आमोरासमोर येऊन त्यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यामुळे चेपट्याच्या टोळीचा वचपा काढून आपले वर्चस्व निर्माण करण्याचे जगदीशच्या टोळीने ठरवले होती. प्रदीप लांडे हा एमएच ३१-बीसी-४७१ क्रमांकाच्या मोटरसायकलने रशीद, अब्दुल आणि रोहित यांना बसवून लग्नसमारंभातून पळून जात असताना जगदीश कोसूरकर आणि त्याच्या टोळीने एमएच-३१-सीआर-२११२ क्रमांकाच्या स्कॉर्पिओमधून त्यांचा पाठलाग केला होता. त्यांनी मोटरसायकलवर स्कॉर्पिओ धडकवून तिघांचा खून आणि घोडेचा खुनाचा प्रयत्न केला होता.
नंदनवन पोलीस ठाण्यात भादंविच्या ३०२, ३०७, १२० (ब), १४१, १४३, १४७, १४८, १४९, ५०६ ब, शस्त्र कायद्याच्या ४/२५ आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या कलम ३ अन्वये १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी सात आरोपी अटकेत तर तिघे अद्यापही फरार आहेत. अटक आरोपींपैकी चौघांनी जामिनासाठी अर्ज दाखल केले असता, त्यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले. न्यायालयात सरकारच्यावतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे यांनी काम पाहिले. सहायक पोलीस आयुक्त टी. डी. गौंड हे तपास अधिकारी आहेत.