शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

संघर्षाने नव्हे, तर जागृतीने ट्रिपल तलाक बंद व्हावा - मोदी

By admin | Updated: April 17, 2017 03:26 IST

मुस्लीम समाजात संघर्ष निर्माण करून नव्हे, तर जागृती करून ट्रिपल तलाकची कुप्रथा बंद करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले.

भुवनेश्वर : मुस्लीम समाजात संघर्ष निर्माण करून नव्हे, तर जागृती करून ट्रिपल तलाकची कुप्रथा बंद करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले.भाजपाच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सामाजिक न्यायावर भर देताना पंतप्रधानांनी ट्रिपल तलाकचा उल्लेख केला. एवढेच नव्हे, तर ‘सबका साथ, सबका विकास’ हे सूत्र सफल करण्यासाठी मुस्लिमांमधील मागास वर्गांकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मुस्लीम भगिनींनाही न्याय मिळायला हवा व त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, असे मोदी म्हणाले. गडकरींच्या सांगण्यानुसार, पंतप्रधान असेही म्हणाले की, कोणाचीही पिळवणूक होता कामा नये. (ट्रिपल तलाकवरून) मुस्लीम समाजात संघर्ष व्हावा, असे आम्हाला वाटत नाही. समाजात काही कुप्रथा असतील, तर त्याविषयी समाजात जागृती निर्माण करून त्यांना (मुस्लीम महिलांना) न्याय देण्याचे काम करावे लागेल.अलीकडच्या निवडणुकांमध्ये मतदानयंत्रांमध्ये गडबड केल्याचे विरोधकांनी भाजपावर केलेले आरोप साफ फेटाळून लावताना मोदी म्हणाले की, खास करून दिल्ली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हे वाद मुद्दाम निर्माण केले जात आहेत. असे वाद तयार करण्याचा त्यांच्याकडे जणू कारखानाच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी चर्चवरील हल्ल्यांचा, बिहार निवडणुकीच्या वेळी ‘पुरस्कार वापसी’चा व आता मतदानयंत्रांचा वाद निर्माण केला जात आहे. (वृत्तसंस्था)बोलताना काळजी घ्यासार्वजनिक वक्तव्ये करताना काळजी घ्या आणि भावनेच्या आहारी जाऊन अनुचित विधाने करू नका, अशी समज भाजपाच्या नेत्यांना देताना मोदी म्हणाले की, तुमच्या काही तक्रारी व गाऱ्हाणी असतील तर तो विषय पक्षात मांडा व पक्षातूनच तो माझ्यापर्यंत पोहोचेल.यशाने हुरळून जाऊ नकाअलिकडेच झालेल्या राज्य विधानसभांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाने हुरळून न जाता पक्षाने असाच जोर कायम ठेवायला हवा, असे सांगून मोदी म्हणाले की, लोकसभेच्या ज्या १२० जागा सध्या भाजपाकडे नाहीत त्याही जिंकण्यासाठी पक्ष विशेष मोहीम हाती घेणार आहे. पक्षाच्या यशात पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा मोठा वाटा आहे. निष्णात व्यूहरचनाकार म्हणून ते एक आदर्श आहेत, अशी त्यांनी स्तुती केली.विनाकारण तलाक देणाऱ्यांवर बहिष्कारनवी दिल्ली: मुस्लिम धर्मशास्त्रात दिलेल्या कारणांखेरीज अन्य कारणांसाठी पत्नीला तलाक देणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात यावा, असे अ.भा. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ठरविले आहे.तलाक हा मुस्लिमांच्या धर्मशास्त्राशी निगडित विषय असल्याने तो त्यांचा मुलभूत हक्क आहे. त्यामुळे यात बाहेरच्या कोणालाही हस्तक्षेप करू दिला जाणार नाही, असे बोर्डाच्या कार्यकारिणी बैठकीत ठरविण्यात आले.मात्र ट्रिपल तलाकचा पर्याय अगदीच अपवादात्मक प्रकरणांंमध्ये वापरला जाईल, याची खात्री करण्यासाठी समाजाच्या पातळीवर काही व़्यवस्था केली जाईल. ट्रिपल तलाकचा जे दुरुपयोग करतील त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांना दंड करण्याचेही कार्यकारिणीने ठरविले, असे बोर्डाचे सदस्य मौलाना खालिद आर. फिरंगी यांनी सांगितले.राम जन्मभूमी वादात कोर्टबाह्य तडजोड नाहीअयोध्येतील बाबरी मशीद-राम जन्मभूमी वादात आपसात चर्चा करण्याची सर्वोच्च न्यायालयाने केलेली सूचना आम्हाला मान्य नाही. आम्ही फक्त न्यायालय देईल तोच निर्णय मान्य करू, असा ठरावही बोर्डाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आला.