शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

ट्रिपल तलाक संपवा, गर्भवती महिलेचं मोदींना पत्र

By admin | Updated: March 29, 2017 15:34 IST

ट्रिपल तलाकवरुन वाद - विवाद सुरु असताना एका गर्भवती महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मदत मागितली आहे

ऑनलाइन लोकमत
सहारनपूर, दि. 29 - ट्रिपल तलाकवरुन वाद - विवाद सुरु असताना एका गर्भवती महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मदत मागितली आहे. सहारनपूरची राहणारी शगुफ्ता शाह यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून ट्रिपल तलाकची ही प्रथा रद्द करण्याची मागणी केली आहे. शगुफ्ता शाह गर्भवती असून तीन वेळा तलाकचा उच्चार करत त्यांच्या पतीने त्यांना घराबाहेर काढलं आहे. आपण गर्भपात करण्यास नकार दिल्याने घराबाहेर काढल्याचा आरोप शगुफ्ता शाह यांनी केला आहे. 
 
शगुफ्ता शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदांनी पत्र लिहून ही प्रथा पुर्णपणे बंद करण्यात आली पाहिजे असं म्हटलं आहे. 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत दिलं आहे. मला त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे', असं शगुफ्ता शाह बोलल्या आहते. दुसरीकडे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं म्हणणं आहे की, 'जर ट्रिपल तलाकला बेकायदेशीर सिद्ध करण्यासाठी कायदा बनवण्यात आला तर तो अल्लाच्या कायद्याला आव्हान दिल्यासारखं असेल'.
 
शगुफ्ता शाह यांना दोन मुली असून तिसरीदेखील मुलगीच जन्माला येईल असं तिच्या सासरच्यांना वाटत होतं. यामुळे गर्भपात करण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करण्यात येत होती. शगुफ्ता शाह यांचं म्हणणं आहे की आपण पोलिसांत तक्रार केली होती, पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पीडित महिलेने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून ही प्रथा रद्द करण्यात आपल्या जन्माला येणा-या मुलाचं रक्षण करावं अशी मागणी केली आहे. 
 
शगुफ्ता शाह यांनी पंतप्रधान मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे. '24 मार्च रोजी आपला पती आणि सासरच्यांनी गर्भपात करण्यासाठी आपल्यावर जबरदस्ती केली. आपण नकार दिल्यानंतर मारहाण करण्यात आली. यावेळीच आपल्या पतीने तलाक तीन वेळा म्हणत आपल्याला घराबाहेर काढल्याचं', शगुफ्ता शाह यांनी सांगितलं आहे.
 
कुराणानुसार आधी तलाक दिल्यानंतर व्यक्तीला आपल्या या निर्णयावर विचार करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात येतो. यानंतरही जर तो आपल्या निर्णयावर कायम असेल तर अजून दोन वेळा तलाक बोलल्यास तलाक दिला असं मानलं जातं. अनेक इस्लामिक देशांमध्ये ही परंपरा बंद करण्यात आली आहे. मात्र भारतात अद्यापही या प्रथेचं पालन केलं जातं.  
 
सामाजिक सुधारणांच्या नावाखाली वैयक्तिक कायद्यांचे पुनर्लेखन केले जाऊ शकत नाही. हा धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित मुद्दा असल्याने न्यायालय त्यात ढवळाढवळ करू शकत नाही, असे सांगून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तीन तलाक (या शब्दाचा तीनदा उच्चार करून घटस्फोट देणे) प्रथेचे सर्वोच्च न्यायालयात जोरदार समर्थन केले होते. मुस्लिम महिलेने सर्वोच्च न्यायालयात या प्रथेला आव्हान दिले. ही प्रथा घटनाविरोधी असल्याचा तिचा दावा आहे. या याचिकेवर २७ ऑगस्टला झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुस्लिम वैयक्तिक कायदेमंडळाला नोटीस पाठवून म्हणणे मांडण्यास सांगितले होते. 
 
हत्या होण्यापेक्षा, तीन शब्द बरे...
‘वैयक्तिक कायदे हे घटनेचे उल्लंघन करणारे आहेत असे म्हणून त्यांना आव्हान देता येत नाही. जेव्हा वैवाहिक संबंधांत बेबनाव निर्माण होतो आणि पतीला पत्नीपासून विभक्त व्हावे वाटू लागते, तेव्हा वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रियेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि पती विभक्त होण्यासाठी पत्नीची हत्याही करू शकतो. अशा स्थितीत तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार करून पत्नीला तलाक देणे हा उत्तम मार्ग आहे,’ असे या मुस्लिम बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.