शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘ट्रिपल तलाक’ ही देखील रामजन्मभूमीप्रमाणे धार्मिक श्रद्धा!

By admin | Updated: May 17, 2017 00:23 IST

अयोध्येतील रामजन्मभूमी हा जसा हिंदूंच्या श्रद्धेचा भाग आहे तसाच मुस्लिमांमधील ‘ट्रिपल तलाक’च्या प्रथेला धार्मिक श्रद्धेचा आधार आहे. त्यामुळे या प्रथेची न्यायोचितता

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी हा जसा हिंदूंच्या श्रद्धेचा भाग आहे तसाच मुस्लिमांमधील ‘ट्रिपल तलाक’च्या प्रथेला धार्मिक श्रद्धेचा आधार आहे. त्यामुळे या प्रथेची न्यायोचितता घटनात्मक मूल्यांच्या निकषांवर तपासली जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद अखिल भारतीय मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केला.‘ट्रिपल तलाक’च्या घटनात्मक वैधतेवर सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहर यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठापुढील विशेष सुनावणीच्या चौथ्या दिवशी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद केला.‘ट्रिपल तलाक’ची प्रथा इस्लामविरोधी आहे, हे केंद्र सरकारचे म्हणणे खोडून काढताना सिब्बल म्हणाले की, ‘ट्रिपल तलाक’ची प्रथा सन ६३७ पासून रुढ आहे. त्यामुळे तिला इस्लामला अनुसरून नाही, असे म्हणणारे आपण कोण? गेली १,४०० वर्षे मुस्लिम ही प्रथा पाळत आले आहेत. त्यामुळे यात घटनात्मक नितीमत्ता व न्यायोचिततेचा प्रश्नच येत नाही.सिब्बल असेही म्हणाले की, ‘ट्रिपल तलाक’चे मूळ हादिथमध्ये असून प्रेषित मुहम्मदानंतर ती रुढ झाली. रामजन्मभूमीचा संदर्भ देत ते म्हणाले की, प्रभू रामचंद्रांचा जन्म अयोध्येत झाला अशी जर माझी श्रद्धा असेल तर तो श्रद्धचा विषय होतो व मगत्यात घटनात्मक नितीमत्तेचा प्रश्न येत नाही. ‘ट्रिपल तलाक’चेही तसेच आहे. असे असेल तर मग आम्ही यात काहीच करू शकत नाही, असे तुन्हाला म्हणायचे आहे का, असे न्या. रोहिंग्टन नरिमन यांनी विचारल्यावर सिब्बल यांनी त्यास ‘हो नक्कीच’, असे उत्तर दिले.तुम्ही १,४०० वर्षांच्या परंपरेचा दाखला देता, मग त्यात ‘ई-तलाक’सुद्धा येतो का? या न्या. कुरियन जोसेफ यांच्या प्रश्नावर सिब्बल यांनी ‘हली तर लोक व्हॉट््सअ‍ॅपरवही तलाक देतात’, असे समर्थन केले.मुस्लिमांमध्ये दोन प्रौढ व्यक्ती राजीखुशीने निकाह करून लग्नबंधनाचा करार करतात. तसाच तलाक हाही दोघांमधील करार आहे. विवाह व घटस्फोट हे दोन्ही जर राजीखुशीने होणारे करार असतील तर इतरांचा त्याला आक्षेप असण्याचे कारण काय?-अ‍ॅड. कपिल सिब्बल, मुस्लिम कायदा मंडळाचे वकील