शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

जंगलांवर आदिवासींचा अधिकार!

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

भूसंपादन कायद्यावरून राहुल गांधी यांचा केंद्रावर हल्लाबोल

भूसंपादन कायद्यावरून राहुल गांधी यांचा केंद्रावर हल्लाबोल
कोरबा : जंगलांवर आदिवासींचा अधिकार आहे. कें द्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि छत्तीसगडमधील रमणसिंग सरकार केवळ दोन-तीन उद्योगपतींसाठीच काम करीत आहे आणि विकासाचा लाभ स्थानिक लोकांपर्यंत अजिबात पोहोचत नाही, असा स्पष्ट आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला.
छत्तीसगडच्या कोरबा येथील खाण क्षेत्रात भूसंपादनाचा मुद्दा उपस्थित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या विकास मॉडेलवर प्रश्नचिन्ह लावले. मोदींच्या या विकास मॉडेलमुळे आदिवासींचा कोणताही फायदा होणार नाही, असे ते म्हणाले. त्यांनी कोळसा खाणींमुळे होणारे लोकांचे विस्थापन आणि भूसंपादनाच्या नुकसानभरपाईचा मुद्दा उपस्थित करून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला.
आपण शेतकर्‍यांप्रमाणेच आदिवासींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. राष्ट्रीय मीडिया आदिवासींच्या प्रश्नांना फारसे महत्त्व देत नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले, मोदी हे विकासावर केवळ व्याख्यान देतात. विकास झालाच पाहिजे; पण या प्रक्रियेत आदिवासींचा काय वाटा आहे, हा माझा प्रश्न आहे. विकास सर्वांसाठी व्हायला पाहिजे. विकास केवळ दोन-तीन उद्योगपतींचाच होऊ नये. त्यांचे उद्योग उभे व्हावेत आणि त्यांनी कोट्यवधी रुपयांचा नफा कमवावा आणि दुसरीकडे आदिवासी मुलांचे कसलेही भविष्य नसावे, असे मात्र होऊ नये. भारताच्या आदिवासींचे असे भविष्य आम्हाला नको आहे. (वृत्तसंस्था)