शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

सुखाचा प्रवास म्हणजे मध्य प्रदेशची यात्रा

By admin | Updated: June 29, 2015 00:38 IST

सुखाचा प्रवास म्हणजेच मध्य प्रदेशची यात्रा

सुखाचा प्रवास म्हणजेच मध्य प्रदेशची यात्रा
नागपूर : मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया म्हणाले, गुळगुळीत रस्ते, कर्जमुक्ती आणि विकासाकडे गतीने धावणारा प्रदेश म्हणून आता मध्य प्रदेशची ओळख निर्माण झाली आहे. पूर्वी लोक मध्य प्रदेशात यायचे तेव्हा प्रवासादरम्यान त्यांना रस्त्यावर धक्केच बसायचे. कारण मोठाले खड्डे रस्त्यात निर्माण झाले होते. धक्के लागल्यावर लोक समजून जायचे की, आपण मध्य प्रदेशच्या रस्त्यांवर आहोत. पण आता स्थिती वेगळी आहे. वाहन बिना धक्क्याने आणि सहजपणे चालत असेल तर लोक समजून जातात की, आपण मध्य प्रदेशात पोहोचलो आहोत.
मलैया म्हणाले, मध्य प्रदेश शासनाने मागील काही वर्षांत मूलभूत विकासासाठी परिश्रम घेतले आहेत. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. मध्य प्रदेश सरकारवर ९१ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. इतर राज्यांच्या तुलनेत हे कमी कर्ज आहे. एखाद्या विकास कार्यासाठी गरज पडल्यास अधिक कर्ज घेण्याची शासनाची क्षमता आहे. गेल्या काही वर्षांत मध्य प्रदेश शासनाच्या लाभात अधिक वृद्धी झाली आहे. शासनाच्या अर्थनीतीत आयोजन खर्च केवळ ८ ते ९ टक्के आहे. मात्र विविध योजनांवर ४० टक्के खर्च करण्यात येत आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात मध्य प्रदेशात कृषी सिंचन साडेसात लाख हेक्टर होते. आता ते ३० लाख हेक्टरपर्यंत विस्तारित झाले आहे. सरकार ग्रामीण क्षेत्रातील रोजगार वाढविण्यासाठी स्वयंरोजगारावर भर देत आहे. ग्रामीण क्षेत्रातून होणारे लोकांचे पलायन हे पलायन नसून चांगल्या रोजगाराच्या संधीचा शोध आहे, असे ते म्हणाले.