शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पि›त रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

By admin | Updated: July 12, 2016 00:09 IST

पि›त रेल्वे मार्गावरील नंदुरबार-सुरत रेल्वेमार्ग खचल्याने सुरतकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत.

पि›त रेल्वे मार्गावरील नंदुरबार-सुरत रेल्वेमार्ग खचल्याने सुरतकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत.

रद्द गाड्या
५९०७८ भुसावळ-सुरत पॅसेंजर, ५९०७५ सुरत-भुसावळ पॅसेंजर, ५९०७६ भुसावळ-सुरत पॅसेंजर.

सुरत-जळगाव रेल्वे मार्गावरील वळविलेल्या गाड्या
- भोपाळ-रतलाम-गोध्रा-वडोदरा-अहमदाबाद मार्गे वळविलेल्या..
१२८३४ हावडा-अहमदाबाद, १२६५६, चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस, १२९०६ , हावडा-पोरबंदर, १२८३३ अहमदाबाद-हावडा, १२९३७ राजकोट-रेवा.

- सुरत-वसई रोड-कल्याण-नाशिक-जळगाव मार्गे वळविलेल्या गाड्या...
११४५३ अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्सप्रेस, १२८४४ अहमदाबाद पुरी, १८५०२ गांधीधाम-विशाखाप˜नम, १९०४५ सुरत-छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस, १२६५५ अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्सप्रेस, १७०३८ बिकानेर-सिकंदराबाद, १९०५८ वाराणसी-उधना.
रविवारी संध्याकाळी जळगाव कडून गेलेली सुरत पॅसेंजर नंदुरबार येथूनच सोमवारी सकाळी परत आली.

प्रवाशांचे हाल....
जळगाव येथून नंदुरबार, सुरतकडे जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी असते. रविवारी रात्री अचानक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. सोमवारी सकाळीदेखील अनेक प्रवासी रेल्वे स्थानकावर गेले, मात्र तेथे गेल्यावर रेल्वे गाड्या रद्द असल्याची माहिती मिळाल्याने अनेक जण माघारी परतले.

बसेस्ची सोय...
रविवारी रात्री रेल्वे रद्द झाल्याने जळगाव आगारातून जादा बस सोडण्यात येऊन प्रवाशांना रवाना करण्यात आले. यासाठी मध्यरात्री दोन वाजता निवासी उप जिल्हाधिकारी राहुल मुंडके, आगार प्रमुख एस.बी. खडसे यांनी तातडीने उपाययोजना करून रात्रीच एका बसची व्यवस्था केली. या शिवाय सोमवारी जळगाव, अमळनेर आगारातून प्रत्येकी एक व भुसावळ येथून तीन जादा बसेस् सोडण्यात आल्या.

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष वार्‍यावर....
जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार सुरू असताना आपत्ती नियंत्रण कक्षाने सतर्क राहणे गरजेचे आहे, मात्र जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात आलबेल स्थिती दिसून आली. २४ तास कर्मचारी नियुक्त असावे, असे असतानाही सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजेपासून आठ वाजे पर्यंत येथे कोणीच नव्हते. याबाबत माहिती घेतली असता संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत कार्यालयीन कर्मचारी होते. त्यानंतर येणारे कर्मचारी येण्यापूर्वीच ते निघून गेल्याचा गंभीर प्रकार येथे दिसून आला. रात्री येणारे कर्मचारी सव्वा आठ- साडे आठ वाजता येतील अशी माहिती मिळाली. मात्र या दोन तासात कोणीच नसल्याने जिल्ह्यात काही आपत्ती ओढावल्यास कोठे संपर्क साधावा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला. दूरध्वनी करुनही अधिकारी, कर्मचारी येथे नव्हते.