शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

...या गावात 200 वर्षांपासून अक्षय्य तृतीया साजरी न करण्याची परंपरा

By admin | Updated: May 9, 2016 13:23 IST

संपुर्ण देश अक्षय्य तृतीया साजरी करत असताना उत्तर प्रदेशमधील एक गाव मात्र गेली 200 वर्ष झाले तरी अक्षय्य तृतीया साजरी करत नाह

ऑनलाइन लोकमत - 
लखनऊ, दि. 09 - आज संपुर्ण देश अक्षय्य तृतीया साजरी करत असताना उत्तर प्रदेशमधील एक गाव मात्र गेली 200 वर्ष झाले तरी अक्षय्य तृतीया साजरी करत नाही. 
 
झाशी आणि ललितपूर यांच्यामध्ये स्थित असलेल्या तलबेहटमधील ग्रामस्थ मोर प्रल्हाद (1802-42) यांच्या कार्यकाळापासून सुरु असलेल्या या परंपरेचं अजूनही पालन करत आहेत. त्याकाळी अक्षय्य तृतीया साजरी करण्यासाठी पाने गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांचं अपहरण करुन त्यांना तलबेहटमधील किल्ल्यात नेण्यात आलं होतं. आणि त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला होता. बलात्कार करणारे राज्यकर्त्यांचीच लोक होती. या घटनेनंतर अक्षय्य तृतीया साजरी करणं बंद झालं. 
 
घटनेनंतर ग्रामस्थांनी, लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला. अक्षय्य तृतीया साजरी करण्याची परंपरा तर बंद झाली मात्र यानंतर महिलांना आदर देण्याची परंपरा सुरु झाली. महिलांचा सन्मान करण्यासाठी पुरुषांनी महिलांच्या पाया पडण्याची परंपरा सुरु करण्यात आली. या नव्या परंपरेत जात, धर्म, उच्च, कनिष्ठ या गोष्टींना लांब ठेवण्यात आलं. जर एखादा पुरुष एखाद्या महिलेच्या पाया पडत असेल तर तिची जात, धर्म कोणता आहे या गोष्टीचा त्याच्याशी काही संबंध नाही.
तलबेहटमध्ये आता उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत. ज्यामध्ये तलबेहट किल्ला झाकला जात आहे. मुख्य रस्त्यावरुन किल्ला दूर केला जात आहे.