शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

शेतक-यांसाठी लढून मोदी सरकारला झुकवू

By admin | Updated: April 20, 2015 00:39 IST

काँग्रेस पक्ष आज सत्तेबाहेर आहे, पण म्हणून पक्ष दुर्बल आहे, असे नाही. काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांचा लढा लढेल आणि मोदी सरकारला झुकण्यास भाग पाडेल

नवी दिल्ली: काँग्रेस पक्ष आज सत्तेबाहेर आहे, पण म्हणून पक्ष दुर्बल आहे, असे नाही. काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांचा लढा लढेल आणि मोदी सरकारला झुकण्यास भाग पाडेल, अशी ग्वाही काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी दिली.मोदी सरकारने आणलेल्या सुधारित भूसंपादन कायद्यास विरोध करण्यासाठी पक्षातर्फे रामलिला मैदानावर आयोजित शेतकरी व शेतमजुरांच्या विराट रॅलीत बोलताना सोनिया गांधी यांनीही मोदी सरकारला थेट लक्ष्य केले. सबका साथ, सबका विकास, असा नारा मोदी सरकार देत आहे, मग शेतकरीच यातून का सुटला? असा सवाल त्यांनी केला. शेतकरी उन्मळून पडावा आणि अगतिक होऊन त्याने आपली जमीन द्यावी, असे मोदी सरकारचे षड्यंत्र आहे. बड्या कॉर्पोरेट घराण्यांना लाभ पोहोचवणे या एकाच उद्देशाने सरकार भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करू इच्छित आहे. शेतकरी मरो वा जगो, याचेशी सरकारचे काहीही देणे-घेणे नाही, असा आरोप सोनियांनी केला. राहुल गांधी म्हणाले, निवडणूक काळात मोदींनी शेतकऱ्यांना अधिक हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. आपल्या कार्यकाळात कुठल्याच शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणार नाही, असे ते म्हणाले होते. पण आजही आत्महत्या होत आहे. युरिया बाजारातून गायब आहे. खरेदीदार नसल्याने शेतकऱ्यांचा माल सडत आहे. राहुल म्हणाले की, मेक इन इंडिया व उद्योगक्षेत्राचा विकास हवाच आहे. पण जिथे शेतकऱ्यांनाच स्थान नाही, असा भारत आम्हाला नको आहे. हरितक्रांतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी देशाच्या विकासाचा पाया रचला होता. अशा शेतकऱ्यांना वगळून काहीही साध्य होणार नाही, असे ते म्हणाले. जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याच्या मोदी सरकारच्या आश्वासनाचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. रॅलीत पक्षाच्या कुरबुरीसोनिया व राहुल व्यासपीठावर येण्यापूर्वी पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना बोलण्याची संधी मिळाली. पण यादरम्यान काँग्रेसच्या अंतर्गत कुरबुरीच तेवढ्या प्रकर्षाने समोर आल्या. हरियाणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर बोलायला उभे राहिले, तोच त्यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी भूपेंद्र हुड्डा यांचे समर्थक तंवर यांच्याविरोधात नारेबाजी करू लागले. मात्र तंवर तरीही बोलले आणि भाषण पूर्ण केल्यावरच आपल्या जागी बसले. पंजाबचे प्रदेशाध्यक्ष प्रताप वाजवा यांनी आपल्या भाषणात लोकसभा खासदार अमरेंद्र सिंह यांना बंडखोर ठरवले. दोघांमधील मतभेद यानिमित्ताने समोर आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)