शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांसाठी लढून मोदी सरकारला झुकवू

By admin | Updated: April 20, 2015 00:39 IST

काँग्रेस पक्ष आज सत्तेबाहेर आहे, पण म्हणून पक्ष दुर्बल आहे, असे नाही. काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांचा लढा लढेल आणि मोदी सरकारला झुकण्यास भाग पाडेल

नवी दिल्ली: काँग्रेस पक्ष आज सत्तेबाहेर आहे, पण म्हणून पक्ष दुर्बल आहे, असे नाही. काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांचा लढा लढेल आणि मोदी सरकारला झुकण्यास भाग पाडेल, अशी ग्वाही काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी दिली.मोदी सरकारने आणलेल्या सुधारित भूसंपादन कायद्यास विरोध करण्यासाठी पक्षातर्फे रामलिला मैदानावर आयोजित शेतकरी व शेतमजुरांच्या विराट रॅलीत बोलताना सोनिया गांधी यांनीही मोदी सरकारला थेट लक्ष्य केले. सबका साथ, सबका विकास, असा नारा मोदी सरकार देत आहे, मग शेतकरीच यातून का सुटला? असा सवाल त्यांनी केला. शेतकरी उन्मळून पडावा आणि अगतिक होऊन त्याने आपली जमीन द्यावी, असे मोदी सरकारचे षड्यंत्र आहे. बड्या कॉर्पोरेट घराण्यांना लाभ पोहोचवणे या एकाच उद्देशाने सरकार भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करू इच्छित आहे. शेतकरी मरो वा जगो, याचेशी सरकारचे काहीही देणे-घेणे नाही, असा आरोप सोनियांनी केला. राहुल गांधी म्हणाले, निवडणूक काळात मोदींनी शेतकऱ्यांना अधिक हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. आपल्या कार्यकाळात कुठल्याच शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणार नाही, असे ते म्हणाले होते. पण आजही आत्महत्या होत आहे. युरिया बाजारातून गायब आहे. खरेदीदार नसल्याने शेतकऱ्यांचा माल सडत आहे. राहुल म्हणाले की, मेक इन इंडिया व उद्योगक्षेत्राचा विकास हवाच आहे. पण जिथे शेतकऱ्यांनाच स्थान नाही, असा भारत आम्हाला नको आहे. हरितक्रांतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी देशाच्या विकासाचा पाया रचला होता. अशा शेतकऱ्यांना वगळून काहीही साध्य होणार नाही, असे ते म्हणाले. जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याच्या मोदी सरकारच्या आश्वासनाचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. रॅलीत पक्षाच्या कुरबुरीसोनिया व राहुल व्यासपीठावर येण्यापूर्वी पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना बोलण्याची संधी मिळाली. पण यादरम्यान काँग्रेसच्या अंतर्गत कुरबुरीच तेवढ्या प्रकर्षाने समोर आल्या. हरियाणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर बोलायला उभे राहिले, तोच त्यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी भूपेंद्र हुड्डा यांचे समर्थक तंवर यांच्याविरोधात नारेबाजी करू लागले. मात्र तंवर तरीही बोलले आणि भाषण पूर्ण केल्यावरच आपल्या जागी बसले. पंजाबचे प्रदेशाध्यक्ष प्रताप वाजवा यांनी आपल्या भाषणात लोकसभा खासदार अमरेंद्र सिंह यांना बंडखोर ठरवले. दोघांमधील मतभेद यानिमित्ताने समोर आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)