शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

पर्यटकांना ‘पोलिसी टोल’

By admin | Updated: August 5, 2014 23:37 IST

नाराजीचा सूर : सुरक्षिततेच्या नावाखाली केवळ त्रास

प्रसन्न राणे - सावंतवाड.. वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात टोल भरून आंबोली येथे जावे लागते. यामुळे याचा आर्थिक फटका पर्यटकांना बसत असल्याने पर्यटकांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे. पर्यटनाच्या वाढीच्या दृष्टीकोनातून पर्यटकांना होणारा त्रास कमी होण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी मागणी जोर धरत आहे.राज्यात जास्त पावसाचे आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून आंबोलीला ओळखले जाते. आंबोलीमध्ये पावसाळ्यात अनेक छोेटे मोठे धबधबे निर्माण होतात. दाट धुके असल्याने पर्यटक वाट काढत काढत आंबोलीत जाण्यायेण्याचा प्रवास करतात. वर्षभरातून पावसाळी हंगामामध्ये लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देऊन जात असतात. मात्र, या पर्यटकांना आंबोली पर्यटकांसाठी कोणतीच सुरक्षा या हंगामात नसते. याउलट तिठ्यातिठ्यांवर उभे राहून पोलीस या पर्यटकांकडून कागदपत्रांची मागणी करत बराच पैसा वसूल करतानाचे चित्र दिसून येत आहे. बावळाट तिठ्यावर वाहतूक पोलीस व अन्य पोलिसांची बरीच गस्त असते. बावळाट तिठ्यावर गोव्याच्या दिशेने येणाऱ्या गाड्या या आंबोली हंगामात मोठ्या प्रमाणात असतात. याबरोबरच सावंतवाडीच्याही दिशेने येणाऱ्या काही गाड्या येत असतात. मात्र, यावेळी पोलीस जास्तीत जास्त वाहने अडवून सर्व कागदपत्रे तसेच अन्य गोष्टींची तपासणी करत असतात. मात्र, यावेळी कागदपत्रे असूनही कोणते ना कोणते कारण सांगून पैसा उकळण्याचे काम मोठ्या प्रमाणात याठिकाणी सुरू असते. पावसानेही यावर्षी जून महिना पूर्णपणे कोरडाच घालवून जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जोर धरला. यामुळे धबधबे सुरू होईपर्यंत पर्यटकांना दिवसही कमी मिळाले आहेत. यामुळे आंबोली येथील अनेक हॉटेल व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे. आंबोली येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी बाचाबाची होत असते. हाणामारीचे प्रकारही घडतात. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचे पोलीस संरक्षण मिळत नाही. महिलांनाही छेडछाडीसारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. मद्यधुंद अवस्थेत काही पर्यटक महिलांची छेडछाड काढतात. आंबोली घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही होते. अशावेळी पोलीस नागरिकांच्या संरक्षणाच्या नावाखाली बावळाट तिठा, बोर्डी पूूल अशा ठिकाणांवर उभे राहून पर्यटकांकडून पैसे वसूल करत असतात. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. यावर योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा पर्यटकांमधून व्यक्त केली जात आहे.