शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
4
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
5
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
6
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
7
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
8
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
9
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
10
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
11
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
12
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
13
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
14
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
15
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
16
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
17
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
18
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
19
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
20
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!

पर्यटकांना ‘पोलिसी टोल’

By admin | Updated: August 5, 2014 23:37 IST

नाराजीचा सूर : सुरक्षिततेच्या नावाखाली केवळ त्रास

प्रसन्न राणे - सावंतवाड.. वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात टोल भरून आंबोली येथे जावे लागते. यामुळे याचा आर्थिक फटका पर्यटकांना बसत असल्याने पर्यटकांमध्ये नैराश्य निर्माण होत आहे. पर्यटनाच्या वाढीच्या दृष्टीकोनातून पर्यटकांना होणारा त्रास कमी होण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी मागणी जोर धरत आहे.राज्यात जास्त पावसाचे आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून आंबोलीला ओळखले जाते. आंबोलीमध्ये पावसाळ्यात अनेक छोेटे मोठे धबधबे निर्माण होतात. दाट धुके असल्याने पर्यटक वाट काढत काढत आंबोलीत जाण्यायेण्याचा प्रवास करतात. वर्षभरातून पावसाळी हंगामामध्ये लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देऊन जात असतात. मात्र, या पर्यटकांना आंबोली पर्यटकांसाठी कोणतीच सुरक्षा या हंगामात नसते. याउलट तिठ्यातिठ्यांवर उभे राहून पोलीस या पर्यटकांकडून कागदपत्रांची मागणी करत बराच पैसा वसूल करतानाचे चित्र दिसून येत आहे. बावळाट तिठ्यावर वाहतूक पोलीस व अन्य पोलिसांची बरीच गस्त असते. बावळाट तिठ्यावर गोव्याच्या दिशेने येणाऱ्या गाड्या या आंबोली हंगामात मोठ्या प्रमाणात असतात. याबरोबरच सावंतवाडीच्याही दिशेने येणाऱ्या काही गाड्या येत असतात. मात्र, यावेळी पोलीस जास्तीत जास्त वाहने अडवून सर्व कागदपत्रे तसेच अन्य गोष्टींची तपासणी करत असतात. मात्र, यावेळी कागदपत्रे असूनही कोणते ना कोणते कारण सांगून पैसा उकळण्याचे काम मोठ्या प्रमाणात याठिकाणी सुरू असते. पावसानेही यावर्षी जून महिना पूर्णपणे कोरडाच घालवून जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जोर धरला. यामुळे धबधबे सुरू होईपर्यंत पर्यटकांना दिवसही कमी मिळाले आहेत. यामुळे आंबोली येथील अनेक हॉटेल व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे. आंबोली येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी बाचाबाची होत असते. हाणामारीचे प्रकारही घडतात. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचे पोलीस संरक्षण मिळत नाही. महिलांनाही छेडछाडीसारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. मद्यधुंद अवस्थेत काही पर्यटक महिलांची छेडछाड काढतात. आंबोली घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही होते. अशावेळी पोलीस नागरिकांच्या संरक्षणाच्या नावाखाली बावळाट तिठा, बोर्डी पूूल अशा ठिकाणांवर उभे राहून पर्यटकांकडून पैसे वसूल करत असतात. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. यावर योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा पर्यटकांमधून व्यक्त केली जात आहे.