शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत पर्यटनातून मिळाले ३.२२ लाख कोटी

By admin | Updated: April 27, 2015 23:05 IST

२0१२ ते २0१४ या तीन वर्षांच्या काळात भारताला पर्यटनातून विदेशी चलनाच्या रूपाने ३,२२,२४१ कोटी रुपये मिळाले. पर्यटनमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

नवी दिल्ली : २0१२ ते २0१४ या तीन वर्षांच्या काळात भारताला पर्यटनातून विदेशी चलनाच्या रूपाने ३,२२,२४१ कोटी रुपये मिळाले. पर्यटनमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी लोकसभेत ही माहिती दिली.कीर्ती आझाद आणि कमला देवी पाटले यांनी या संबंधीचा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना शर्मा यांनी सांगितले की, २0१२, २0१३ आणि २0१४ या तीन वर्षांत पर्यटनातून अनुक्रमे ९४,४८७ कोटी, १,0७,६७१ कोटी आणि १,२0,0८३ कोटी रुपयांचे विदेशी चलन मिळाले. टुरिझम सॅटेलाईट अकाउंट आॅफ इंडियाच्या अंदाजानुसार, पर्यटन क्षेत्राकडून मिळालेल्या रोजगाराचे आकडे २0१0-११, २0११-१२ आणि २0१२-१३ या वर्षांत अनुक्रमे ५.७९ कोटी, ६.२0 कोटी आणि ६.६९ कोटी असे होते. शर्मा यांनी सांगितले की, पर्यटन स्थळे आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांचे संवर्धन करण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रशासनाची आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार इनक्रेडिबल इंडिया ब्रँड लाईनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, आॅनलाईन आणि आउटडोअर मीडियात अभियान चालवीत आहे. याशिवाय ‘भारताला जाणून घ्या’ या विषयावर सेमिनार आणि कार्यशाळांचे आयोजनही केले जाते.