शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

उद्या शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 02:14 IST

सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळणार

पुणे : येत्या पौर्णिमेला म्हणजेच २७ जुलै रोजी रात्री या शतकातील ( २००१ ते २१०० ) सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण पहायला मिळणार आहे. सध्या आपल्याकडे पावसाळी व ढगाळ वातावरण असल्याने आपण या संधीला मुकतो की काय असे वाटत आहे. या वेळेस होणाऱ्या ग्रहणाचा कालावधी सुमारे चार तास ( ३ तास ५५ मिनिटे ) असल्याने हे सर्वात मोठ्या कालावधीचे ठरणार आहे व याच दिवशी सूर्यमालेतील क्रमांक चारचा तांबडा ग्रह मंगळ ही प्रतियुती मध्ये येत असून तो २००३ नंतर प्रथमच इतक्या कमी अंतरावर येत आहे.भौतिकशास्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले की, २७ जुलै रोजी सूर्य - पृथ्वी - चंद्र व मंगळ ग्रह हे सर्व एकच रेषेत येत आहेत. या वेळेस खग्रास स्थितीतील तांबडा चंद्रव तेजस्वी तांबडा ग्रह मंगळ हे दोन्हीही आकाशात लक्ष वेधून घेणार आहेत. २७ जुलै २०१८ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण हे सोरास चक्रातील १२९ वे ग्रहण आहे. या आधीचे सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० या दिवशी झाले होते. योगायोग म्हणजे दोन्हीही ग्रहणे एकाच सारोस चक्रातील आहेत. पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील जवळपास सर्वच खंडातून (युरोप, आफ्रिका, आशिया, आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड व दक्षिण अमेरिका ) हे ग्रहण पाहायला मिळणार आहे. संपूर्ण भारतात यावेळी ग्रहणाच्या सर्व स्थिती पाहायला मिळणार आहे.भारतीय प्रमाण वेळेनुसार २७ जुलै रोजी २३़५४ वाजता चंद्र पृथ्वीच्या पश्चिमेकडील बाजूने विरळ छायेमध्ये प्रवेश करणार आहे़ खग्रास स्थिती वेळ २८ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता सुरू होणार आहे. ग्रहण मध्य २८ जुलै रोजी १ वाजून ५२ मिनिटांनी होणार आहे, तर पहाटे २.४३ वाजता ग्रहणाची खग्रास स्थिती संपेल व चंद्र विरळ छायेतून दिसायला सुरुवात होईल व ३.४९ वाजता ग्रहण समाप्ती होणार आहे.या खग्रास चंद्रग्रहणाच्या सर्व स्थिती (स्पर्श, संमिलन, उन्मिलन व मोक्ष) या भारतातील सर्व ठिकाणांतून दिसणार आहे, केवळ पावसाळ्याचे दिवस असल्याने ढगाळ वातावरण असेल, तर या मोठ्या खगोलीय घटनेला मुकावे लागणार आहे.चंद्र पृथ्वी भोवती फिरताना दीर्घ वर्तुळाकार कक्षेत फेरी मारतो. वर्षभरातील दुरस्थ अंतर हे जुलै महिन्यात असते़ तसेच, जुलै महिन्यातील दुरस्थ अंतरही दिनांक २७ जुलै रोजीच आले आहे. चंद्र आकाशात आकाराने वर्षातील सर्वांत लहान आकारात दिसणार असून ग्रहण काळात पृथ्वीच्या दाट छायेतून प्रवास करताना जास्त वेळ घेणार आहे. यामुळेच हे खग्रास चंद्रग्रहण सर्वाधिक कालावधीचे असणार आहे.२७ जुलै रोजी दुपारी ०१.२० वाजता सूर्यमालेतील चौथा गृह मंगळ सूर्याशी प्रतीयुतीमध्ये येत आहे. या दिवशी सायंकाळी सूर्य पश्चिम आकाशात मावळला की पूर्व आकाशात पौर्णिमेचा चंद्र व त्या जवळच तेजस्वी तांबडा मंगळ ग्रह दिसणार आहे. या वेळेस पृथ्वी मंगळ अंतर हे ५.७६ कोटी किमी असणार आहे.सन २००३ च्या २७ आॅगस्ट रोजी हाच मंगळ आपल्या ६० हजार वर्षांतील सर्वांत कमी अंतरावर म्हणजेच, ५.५६ कोटी किमी अंतरावर होता. या वेळेस आकाश निरभ्र असल्यास दुर्बिणीतून निरीक्षण केले असता मंगळ ग्रहाच्या उत्तर ध्रुवावरील असलेला बर्फाच्छादित प्रदेश पाहायला मिळू शकतो, असे जोहरे यांनी सांगितले़

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र