शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उद्या शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 02:14 IST

सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळणार

पुणे : येत्या पौर्णिमेला म्हणजेच २७ जुलै रोजी रात्री या शतकातील ( २००१ ते २१०० ) सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण पहायला मिळणार आहे. सध्या आपल्याकडे पावसाळी व ढगाळ वातावरण असल्याने आपण या संधीला मुकतो की काय असे वाटत आहे. या वेळेस होणाऱ्या ग्रहणाचा कालावधी सुमारे चार तास ( ३ तास ५५ मिनिटे ) असल्याने हे सर्वात मोठ्या कालावधीचे ठरणार आहे व याच दिवशी सूर्यमालेतील क्रमांक चारचा तांबडा ग्रह मंगळ ही प्रतियुती मध्ये येत असून तो २००३ नंतर प्रथमच इतक्या कमी अंतरावर येत आहे.भौतिकशास्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले की, २७ जुलै रोजी सूर्य - पृथ्वी - चंद्र व मंगळ ग्रह हे सर्व एकच रेषेत येत आहेत. या वेळेस खग्रास स्थितीतील तांबडा चंद्रव तेजस्वी तांबडा ग्रह मंगळ हे दोन्हीही आकाशात लक्ष वेधून घेणार आहेत. २७ जुलै २०१८ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण हे सोरास चक्रातील १२९ वे ग्रहण आहे. या आधीचे सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० या दिवशी झाले होते. योगायोग म्हणजे दोन्हीही ग्रहणे एकाच सारोस चक्रातील आहेत. पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील जवळपास सर्वच खंडातून (युरोप, आफ्रिका, आशिया, आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड व दक्षिण अमेरिका ) हे ग्रहण पाहायला मिळणार आहे. संपूर्ण भारतात यावेळी ग्रहणाच्या सर्व स्थिती पाहायला मिळणार आहे.भारतीय प्रमाण वेळेनुसार २७ जुलै रोजी २३़५४ वाजता चंद्र पृथ्वीच्या पश्चिमेकडील बाजूने विरळ छायेमध्ये प्रवेश करणार आहे़ खग्रास स्थिती वेळ २८ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता सुरू होणार आहे. ग्रहण मध्य २८ जुलै रोजी १ वाजून ५२ मिनिटांनी होणार आहे, तर पहाटे २.४३ वाजता ग्रहणाची खग्रास स्थिती संपेल व चंद्र विरळ छायेतून दिसायला सुरुवात होईल व ३.४९ वाजता ग्रहण समाप्ती होणार आहे.या खग्रास चंद्रग्रहणाच्या सर्व स्थिती (स्पर्श, संमिलन, उन्मिलन व मोक्ष) या भारतातील सर्व ठिकाणांतून दिसणार आहे, केवळ पावसाळ्याचे दिवस असल्याने ढगाळ वातावरण असेल, तर या मोठ्या खगोलीय घटनेला मुकावे लागणार आहे.चंद्र पृथ्वी भोवती फिरताना दीर्घ वर्तुळाकार कक्षेत फेरी मारतो. वर्षभरातील दुरस्थ अंतर हे जुलै महिन्यात असते़ तसेच, जुलै महिन्यातील दुरस्थ अंतरही दिनांक २७ जुलै रोजीच आले आहे. चंद्र आकाशात आकाराने वर्षातील सर्वांत लहान आकारात दिसणार असून ग्रहण काळात पृथ्वीच्या दाट छायेतून प्रवास करताना जास्त वेळ घेणार आहे. यामुळेच हे खग्रास चंद्रग्रहण सर्वाधिक कालावधीचे असणार आहे.२७ जुलै रोजी दुपारी ०१.२० वाजता सूर्यमालेतील चौथा गृह मंगळ सूर्याशी प्रतीयुतीमध्ये येत आहे. या दिवशी सायंकाळी सूर्य पश्चिम आकाशात मावळला की पूर्व आकाशात पौर्णिमेचा चंद्र व त्या जवळच तेजस्वी तांबडा मंगळ ग्रह दिसणार आहे. या वेळेस पृथ्वी मंगळ अंतर हे ५.७६ कोटी किमी असणार आहे.सन २००३ च्या २७ आॅगस्ट रोजी हाच मंगळ आपल्या ६० हजार वर्षांतील सर्वांत कमी अंतरावर म्हणजेच, ५.५६ कोटी किमी अंतरावर होता. या वेळेस आकाश निरभ्र असल्यास दुर्बिणीतून निरीक्षण केले असता मंगळ ग्रहाच्या उत्तर ध्रुवावरील असलेला बर्फाच्छादित प्रदेश पाहायला मिळू शकतो, असे जोहरे यांनी सांगितले़

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र