शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

युतीच्या ४५ जागांची अदलाबदल

By admin | Updated: July 5, 2014 04:51 IST

महाराष्ट्रात भाजपा व शिवसेनेतील जवळपास ४० - ४५ जागांची अदलाबदल होणार आहे. तशी यादीही तयार होत असून, जुलैच्या शेवटी तिला दिल्लीत अंतिम रूप येईल

रघुनाथ पांडे , नवी दिल्लीमहाराष्ट्रात भाजपा व शिवसेनेतील जवळपास ४० - ४५ जागांची अदलाबदल होणार आहे. तशी यादीही तयार होत असून, जुलैच्या शेवटी तिला दिल्लीत अंतिम रूप येईल. या अदलाबदलीमुळे ज्यांचे मतदारसंघ बदलण्याची शक्यता आहे, त्यांनीच भाजपा स्वबळावर निवडणूक लढेल, अशी कोल्हेकुई सुरू केल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.मुंबईतील गुरुवारच्या घटनाक्रमानुसार, युतीची कोणतीच राजकीय बोलणी राज्यातील नेत्यांशी न करता थेट राष्ट्रीय अध्यक्षांशीच करण्याची पक्की मानसिकता शिवसेनेने बनविल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, भाजपा पदाधिकारी बैठकीतील भावना कार्यकर्त्यांच्या आहेत; पक्षीय भूमिका नाही, असे सांगून आता हा वाद आवरण्याचा प्रयत्न माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी चालविला आहे. गेल्या काही दिवसांत भाजपा मुख्यालयात स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी करणारे अनेक दूरध्वनी येत आहेत. निवेदने देऊन काहींनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीही घेतल्या आहेत. त्यामागे दबावाचे तंत्र असले तरी, राज्यातील काही बडे नेते ही मागणी रेटून नेत आहेत.मुंबईत झालेल्या भाजपा पदाधिकारी बैठकीत राजकीय प्रस्तावावरील चर्चेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत स्वबळावर लढण्याचा आग्रह झाल्याने या बैठकीचे पडसाद राजधानीत उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांची एक विशेष बैठक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात, २० जुलैच्या आधी पक्षप्रभारी राजीव प्रताप रूडी यांच्या उपस्थितीत राजधानीत घेतली जाणार आहे. कोअर टीम सदस्य, काही महत्त्वाचे खासदार व आमदारांसोबत ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. सध्यातरी भाजपा शिवसेनेच्या पूर्ण दबावाखाली असल्याचे चित्र येथील नेत्यांच्या बोलण्यातून जाणवले.