शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा आज महामार्च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2016 02:02 IST

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आज शुक्रवारी जंतरमंतरहून संसदेपर्यंत मार्च काढत, मोदी सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणाचा जोरदार निषेध करणार आहेत. मोदी सरकारला घेरण्याच्या

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आज शुक्रवारी जंतरमंतरहून संसदेपर्यंत मार्च काढत, मोदी सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणाचा जोरदार निषेध करणार आहेत. मोदी सरकारला घेरण्याच्या उद्देशाने काढल्या जाणाऱ्या या रॅलीत उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह कार्यकारिणीचे सदस्य, सर्व खासदार आणि प्रादेशिक नेते सहभागी होणार असून, या प्रसंगी सोनिया गांधी सरकारविरुद्ध मोठी घोषणा करतील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.मोदी सरकार न्यायालयांना धमकी देत असून, या संस्थांवर सुनियोजितरीत्या हल्ला करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावरून रालोआ सरकार लोकशाही मूल्यांचा गळा घोटत आहे. निवडून निवडून संवैधानिक संस्था संपविल्या जात आहेत. लोकशाही मार्गाने स्थापन झालेल्या काँग्रेसच्या सरकारांना फूट पाडत खाली खेचले जात आहे. सर्वात आधी अरुणाचल प्रदेशमधील सरकार पाडल्यानंतर उत्तराखंडमध्ये तोच प्रयोग करण्यात आला. हिमाचलचे सरकार पाडण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. विद्यापीठांच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करीत, त्यांची स्वायत्तता संपुष्टात आणण्याचा सरकारने खटाटोप चालविला आहे, विद्यार्थ्यांवर विचारधारा लादण्याचा त्यामागे मूळ उद्देश आहे, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले. विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेएनयू, अलाहाबाद, हैदराबाद विद्यापीठे उदाहरणांच्या रूपाने समोर आहेत. या सर्व मुद्द्यांवर सरकारविरुद्ध या रॅलीत लढ्याची घोषणा केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.विरोधकांची एकजूट; रॅली मात्र काँग्रेसचीच..!विरोधक संसदेत व बाहेर एकजूट होत मोदी सरकारविरुद्ध लढणार असले, तरी शुक्रवारच्या रॅलीत केवळ काँग्रेसचा सहभाग राहील. संसदेकडे डोळेझाक होत असल्याचे इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. जंतरमंतरवर सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेते भाषणही करतील. अगुस्ताप्रकरणी सत्य समोर आणण्याचा प्रयत्नही काँग्रेस करणार आहे.काँग्रेसच्या सरकारांना खाली खेचले जात आहे. आधी अरुणाचलमधील सरकार पाडल्यानंतर उत्तराखंडमध्ये तोच प्रयोग करण्यात आला. आता हिमाचलचे सरकार पाडण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप कॉँग्रेसने केला आहे.