शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
3
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
4
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
5
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
6
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
7
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
8
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
9
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
10
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
11
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
12
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
13
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
14
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
15
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
16
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
17
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
18
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
19
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
20
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर केरळमध्ये आज सर्वपक्षीय बैठक

By admin | Updated: July 8, 2015 23:43 IST

केरळमध्ये भटक्या कुत्र्यांनी लोकांना एवढे ‘सळो की पळो’ करून सोडले आहे की, राज्य सरकारला या समस्येवर चर्चा करण्यासाठी चक्क सर्वपक्षीय बैठक बोलवावी लागली आहे.

थिरुअनंतपूरम : केरळमध्ये भटक्या कुत्र्यांनी लोकांना एवढे ‘सळो की पळो’ करून सोडले आहे की, राज्य सरकारला या समस्येवर चर्चा करण्यासाठी चक्क सर्वपक्षीय बैठक बोलवावी लागली आहे. ही अनोखी बैठक गुरुवारी होईल. केरळमध्ये भटक्या कुत्र्यांनी गेल्या सहा महिन्यांत ७५,००० लोकांना चावा घेतला असून त्यांचा हा उच्छाद असाच सुरू राहिल्यास पीडितांची संख्या यावर्षी दीड लाखापर्यंत जाऊ शकते. २०१४ मध्ये भटक्या कुत्र्यांनी ९० हजार जणांना चावा घेतला होता. भटक्या कुत्र्यांचा उच्छाद ही राज्यातील गंभीर समस्या बनली आहे, असे सूत्राने सांगितले. दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या मुद्यावर चर्चेसाठी गुरुवारी (९ जुलै) आपण सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, असे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले होते. एका विधानसभा सदस्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चंडी बोलत होते. भटक्या कुत्र्यांना कायद्याचे संरक्षण आहे. त्यामुळे त्यांना ठार मारता येत नाही, असे प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे; मात्र ते तितकेसे खरे नाही, असे या आमदारांनी सांगितले. (वृत्तसंस्था)