शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आज नरक चतुर्दशी अभ्यंगस्नानाची पर्वणी : अनन्य महत्त्व

By admin | Updated: October 29, 2016 01:07 IST

नशिराबाद-दीपोत्सवपर्वामुळे सर्वत्र चैतन्य व आनंद बहरला आहे. आज २९ शनिवार अश्विन वद्य चतुर्दशी आहे. अर्थात् नरक चतुर्दशी यास रुप चावदस किंवा काली चतुर्दशी म्हणूनही संबोधले जाते. आज पहाटे अभ्यंगस्नानाला अनन्य महत्त्व आहे.

नशिराबाद-दीपोत्सवपर्वामुळे सर्वत्र चैतन्य व आनंद बहरला आहे. आज २९ शनिवार अश्विन वद्य चतुर्दशी आहे. अर्थात् नरक चतुर्दशी यास रुप चावदस किंवा काली चतुर्दशी म्हणूनही संबोधले जाते. आज पहाटे अभ्यंगस्नानाला अनन्य महत्त्व आहे.
भगवान श्रीकृष्णांनी अत्याचारी व दुराचारी दुर्दात्त असूर नरकासुराचा वध याच दिवसाला केला होता व सोळा हजार एक कन्यांना नरकासुराच्या बंदीगृहातून मुक्त करून त्यांना सन्मान प्रदान केला होता. याबाबत अजून एक कथाभाग आहे. रंति देव नामक एक पुण्यात्मा राजा होता. त्याने पाप कर्माला स्पर्श केला नव्हता. मात्र मृत्यूसमयी त्याच्या समक्ष यमदूत आल्याने राजन् म्हणाले की, तुम्ही मला नरकात नेण्यासाठी का आले. मी कोणतेही अकर्म केले नाही. त्यावेळी यमदुतांनी त्यांचा लेखाजोखा वर्णन केला व भिक्षा न दिल्याने तो भुखी आपल्या दरबारातून गेला. त्यामुळे आपणास ही वेळ आली. त्यावेळी राजाने मला आता मृत्यूदंड देऊ नका, अशी प्रार्थना केली. राजाने आपली समस्या ऋषीमुनीला सांगितली. त्यावर त्यांनी उपाय दिला. कृष्ण चतुर्दशी व्रत सांगितले. त्यानुसार राजाने व्रत आचरण केले. विष्णुकृपेमुळे तो पापमुक्त झाला.
तसेच अनंत चतुर्दशीला खूप गर्व झाला म्हणून तिला या दिवशी नरकात टाकले. म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. पुढे तिचा उद्धार कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला झाला. असा संदर्भ आहे.
आज नरक चतुर्दशीला पहाटे- सूयार्ेदयापूर्वी उठून मंगल अभ्यंगस्नान करावे. आंघोळ करताना सुगंधित उटणे, सवासिक तेल, दिवा (मीठ, तेल व हळद घालून) तयार करावा. अर्धी आंघोळ झाल्यावर आंघोळ करणार्‍याचे औक्षण करावे. जो कोणी या दिवशी सूयार्ेदयापूर्वी अभ्यंगस्नान करत नाही तो भयंकर नरकात जातो व यातना भोगतो, अशी भावना आहे. अभ्यंगस्नानानंतर देवदर्शन कृष्णपूजन दर्शनाला अनन्य महत्त्व आहे. दीपदान ही करण्यात येते.
नरक चतुर्दशीला पहाटे अलक्ष्मीचे मर्दन करून आपल्यातील नरकरुपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल.
नरक चतुर्दशीचा महिमा व महत्त्व अनन्य आहे. (वार्ताहर)

अभ्यंगस्नान- पहाटे ४.३० ते ६ वा.