शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

आज नरक चतुर्दशी अभ्यंगस्नानाची पर्वणी : अनन्य महत्त्व

By admin | Updated: October 29, 2016 01:07 IST

नशिराबाद-दीपोत्सवपर्वामुळे सर्वत्र चैतन्य व आनंद बहरला आहे. आज २९ शनिवार अश्विन वद्य चतुर्दशी आहे. अर्थात् नरक चतुर्दशी यास रुप चावदस किंवा काली चतुर्दशी म्हणूनही संबोधले जाते. आज पहाटे अभ्यंगस्नानाला अनन्य महत्त्व आहे.

नशिराबाद-दीपोत्सवपर्वामुळे सर्वत्र चैतन्य व आनंद बहरला आहे. आज २९ शनिवार अश्विन वद्य चतुर्दशी आहे. अर्थात् नरक चतुर्दशी यास रुप चावदस किंवा काली चतुर्दशी म्हणूनही संबोधले जाते. आज पहाटे अभ्यंगस्नानाला अनन्य महत्त्व आहे.
भगवान श्रीकृष्णांनी अत्याचारी व दुराचारी दुर्दात्त असूर नरकासुराचा वध याच दिवसाला केला होता व सोळा हजार एक कन्यांना नरकासुराच्या बंदीगृहातून मुक्त करून त्यांना सन्मान प्रदान केला होता. याबाबत अजून एक कथाभाग आहे. रंति देव नामक एक पुण्यात्मा राजा होता. त्याने पाप कर्माला स्पर्श केला नव्हता. मात्र मृत्यूसमयी त्याच्या समक्ष यमदूत आल्याने राजन् म्हणाले की, तुम्ही मला नरकात नेण्यासाठी का आले. मी कोणतेही अकर्म केले नाही. त्यावेळी यमदुतांनी त्यांचा लेखाजोखा वर्णन केला व भिक्षा न दिल्याने तो भुखी आपल्या दरबारातून गेला. त्यामुळे आपणास ही वेळ आली. त्यावेळी राजाने मला आता मृत्यूदंड देऊ नका, अशी प्रार्थना केली. राजाने आपली समस्या ऋषीमुनीला सांगितली. त्यावर त्यांनी उपाय दिला. कृष्ण चतुर्दशी व्रत सांगितले. त्यानुसार राजाने व्रत आचरण केले. विष्णुकृपेमुळे तो पापमुक्त झाला.
तसेच अनंत चतुर्दशीला खूप गर्व झाला म्हणून तिला या दिवशी नरकात टाकले. म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. पुढे तिचा उद्धार कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला झाला. असा संदर्भ आहे.
आज नरक चतुर्दशीला पहाटे- सूयार्ेदयापूर्वी उठून मंगल अभ्यंगस्नान करावे. आंघोळ करताना सुगंधित उटणे, सवासिक तेल, दिवा (मीठ, तेल व हळद घालून) तयार करावा. अर्धी आंघोळ झाल्यावर आंघोळ करणार्‍याचे औक्षण करावे. जो कोणी या दिवशी सूयार्ेदयापूर्वी अभ्यंगस्नान करत नाही तो भयंकर नरकात जातो व यातना भोगतो, अशी भावना आहे. अभ्यंगस्नानानंतर देवदर्शन कृष्णपूजन दर्शनाला अनन्य महत्त्व आहे. दीपदान ही करण्यात येते.
नरक चतुर्दशीला पहाटे अलक्ष्मीचे मर्दन करून आपल्यातील नरकरुपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल.
नरक चतुर्दशीचा महिमा व महत्त्व अनन्य आहे. (वार्ताहर)

अभ्यंगस्नान- पहाटे ४.३० ते ६ वा.