शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आज नरक चतुर्दशी अभ्यंगस्नानाची पर्वणी : अनन्य महत्त्व

By admin | Updated: October 29, 2016 01:07 IST

नशिराबाद-दीपोत्सवपर्वामुळे सर्वत्र चैतन्य व आनंद बहरला आहे. आज २९ शनिवार अश्विन वद्य चतुर्दशी आहे. अर्थात् नरक चतुर्दशी यास रुप चावदस किंवा काली चतुर्दशी म्हणूनही संबोधले जाते. आज पहाटे अभ्यंगस्नानाला अनन्य महत्त्व आहे.

नशिराबाद-दीपोत्सवपर्वामुळे सर्वत्र चैतन्य व आनंद बहरला आहे. आज २९ शनिवार अश्विन वद्य चतुर्दशी आहे. अर्थात् नरक चतुर्दशी यास रुप चावदस किंवा काली चतुर्दशी म्हणूनही संबोधले जाते. आज पहाटे अभ्यंगस्नानाला अनन्य महत्त्व आहे.
भगवान श्रीकृष्णांनी अत्याचारी व दुराचारी दुर्दात्त असूर नरकासुराचा वध याच दिवसाला केला होता व सोळा हजार एक कन्यांना नरकासुराच्या बंदीगृहातून मुक्त करून त्यांना सन्मान प्रदान केला होता. याबाबत अजून एक कथाभाग आहे. रंति देव नामक एक पुण्यात्मा राजा होता. त्याने पाप कर्माला स्पर्श केला नव्हता. मात्र मृत्यूसमयी त्याच्या समक्ष यमदूत आल्याने राजन् म्हणाले की, तुम्ही मला नरकात नेण्यासाठी का आले. मी कोणतेही अकर्म केले नाही. त्यावेळी यमदुतांनी त्यांचा लेखाजोखा वर्णन केला व भिक्षा न दिल्याने तो भुखी आपल्या दरबारातून गेला. त्यामुळे आपणास ही वेळ आली. त्यावेळी राजाने मला आता मृत्यूदंड देऊ नका, अशी प्रार्थना केली. राजाने आपली समस्या ऋषीमुनीला सांगितली. त्यावर त्यांनी उपाय दिला. कृष्ण चतुर्दशी व्रत सांगितले. त्यानुसार राजाने व्रत आचरण केले. विष्णुकृपेमुळे तो पापमुक्त झाला.
तसेच अनंत चतुर्दशीला खूप गर्व झाला म्हणून तिला या दिवशी नरकात टाकले. म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. पुढे तिचा उद्धार कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला झाला. असा संदर्भ आहे.
आज नरक चतुर्दशीला पहाटे- सूयार्ेदयापूर्वी उठून मंगल अभ्यंगस्नान करावे. आंघोळ करताना सुगंधित उटणे, सवासिक तेल, दिवा (मीठ, तेल व हळद घालून) तयार करावा. अर्धी आंघोळ झाल्यावर आंघोळ करणार्‍याचे औक्षण करावे. जो कोणी या दिवशी सूयार्ेदयापूर्वी अभ्यंगस्नान करत नाही तो भयंकर नरकात जातो व यातना भोगतो, अशी भावना आहे. अभ्यंगस्नानानंतर देवदर्शन कृष्णपूजन दर्शनाला अनन्य महत्त्व आहे. दीपदान ही करण्यात येते.
नरक चतुर्दशीला पहाटे अलक्ष्मीचे मर्दन करून आपल्यातील नरकरुपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल.
नरक चतुर्दशीचा महिमा व महत्त्व अनन्य आहे. (वार्ताहर)

अभ्यंगस्नान- पहाटे ४.३० ते ६ वा.