शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आज युती तुटली तरी पुन्हा जुळेल

By admin | Updated: October 3, 2014 02:03 IST

शिवसेना-भाजपाची युती तुटल्याचे दु:ख आहेच, पण शिवसेना आणि उद्धव ठाकरें यांच्याबद्दल आमच्या मनात कोणतीही कटुता नाही. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्न येण्याचा विचार करता येईल.

रघुनाथ पांडे
शिवसेना-भाजपाची युती तुटल्याचे दु:ख आहेच, पण शिवसेना आणि उद्धव ठाकरें यांच्याबद्दल आमच्या मनात कोणतीही कटुता नाही. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्न येण्याचा विचार करता येईल. आज युती तुटली म्हणजे नेहमीसाठी तुटली असे होत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  
 
प्रश्न: महायुती का तुटली ?
गडकरी-महायुतीच्या वाटाघाटीपासून मी फार लांब होतो. पण युती व्हावी म्हणून  खूप आग्रही होतो. शिवसेनेने 151 जागांचा आग्रह कायम ठेवला. मुळात ज्यांच्या जागा अधिक त्यांचा मुख्यमंत्री असे सूत्र ठरले आहे. ते पद घ्यायला आमचीही हरकत नाही, पण निवडणुकीआधीच मुख्यमंत्नीपदाचा उमेदवार जाहीर करून 25 वर्षांची प्रथा त्यांनी मोडीत काढली. वाटाघाटीत 135 जागा भाजपाला मिळतील अशी अपेक्षा होती. पण सेना नेते शेवटपर्यंत ऐकतच नव्हते. 13क् ही आमची अखेरची संख्या होती. शिवसेनेने मोठ्या भावाच्या भूमिकेतून चांगले वागावे अशी अपेक्षा होती. नेहमीच त्यांची ताठर भूमिका असायची.
- तुम्ही वाटाघाटीमध्ये का नव्हते ?
राज्य व तेथील भाजपा नेते आणि पक्षाने चर्चेसाठी नेमलेले नेते तसेच पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यात चर्चा करायची असेच ठरले होते. मी केंद्रीय समितीमध्ये होतो.
- संवाद नसल्याने युती तुटली का ?
आम्ही संवाद ठेवला, तो वाढवला. पण त्यांनी आम्हाला चांगली वागणूक नाही दिली. बाळासाहेब म्हणाले होते लोकसभा तुम्ही लढा, पण विधानसभेत आमचा शेयर ठेवा. लोकसभेच्या जागा आम्ही सेनेसाठी सोडत होतो, पण विधानसभेच्या जागा नाही वाढल्या. काही जागांवर फेरबदल करण्याची विनंती केली. उपयोग होत नव्हता.
- पुन्हा एकत्न येणार ?
आमच्या मनात शिवसेना किवा उद्धव ठाकरें यांच्या बद्दल कोणतीही कटुता नाही. अनंत गीते यांनी राजीनामा देण्याची घाई करण्याची काहीच गरज नाही. कारणही नाही. भाजपाला राज्यात बहुमत मिळेल. निवडणुकीनंतर पुन्हा एकत्न येण्याचा विचार करता येईल. 
- सेनेला तुम्ही आता काय मानता ?
आम्ही विरोधक मानत नाही. विरोधी पक्ष मानत नाही. प्रचाराचा आमचा संपूर्ण रोख कॉंग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांविरोधात असेल. आम्हाला कटुता वाढवायची नाही . भविष्यात युती होऊ शकली तर आनंदच आहे.
- राज ठाकरेंची मैत्नी आड आली का ?
राजकारण हा खेळ आहे. जो जिता वही सिकन्दर. राजकारणातील संघर्ष केवळ निवडणुकीपुरता असतो.  त्यामुळे राजकारणात विरोधक आहोत दुश्मन नाही. राजकारणाचा  हिशोब लावून मी मैत्नी करत नाही.  राज ठाकरेंशी माझी वैयिक्तक मैत्नी आहे. ते लपविण्याचे कारण नाही. शरद पवार, नारायण राणो यांच्याशी माझी मैत्नी आहे. कशाला लपवू! पण राज यांची लोकसभा निवडणुकी दरम्यान घेतलेली भेट युती करावी म्हणून घेतली नव्हती. मात्न ती नेहमी उकरून काढली जाते, ते अयोग्य आहे.
- भाजपाची राष्ट्रवादीसोबत छुपी युती आहे?
खोटा प्रचार आहे. राजकारणासाठी आम्ही एकत्न येणार नाही, कोणतीच छुपी युती नाही. राजकारणात अश्या खूप चर्चा असतात.
- पण हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असे म्हटले जाते. खरे काय?
माङयाही कानावर अशा बिनबुडाच्या चर्चा येतात. 
- मुख्यमंत्नीपदात तुम्हाला रस आहे ?
माङो मन आता दिल्लीमध्ये रमले . ते  महाराष्ट्रात सध्या तरी यायला तयार नाही. त्यामुळे मुख्यमंत्नी पदाची चर्चा असली तरी इथे मी कशाला येऊ ? दिल्लीत महाराष्ट्राचा मी राजदूत आहे, तिथेच मला राहायचे आहे. एक मात्न सांगतो, महाराष्ट्रच्या विकासासाठी मी बांधील आहे. प्रगतीसाठी जे होईल ते सारे करेल. देशात  महाराष्ट्र क्र मांक एक चे राज्य व्हावे यासाठी वाटेल ते करेन. 
 
चौकशी करणार
तीन वर्षे जी कामे ज्या फायली रखडल्या त्यावर शेवटच्या तीन महिन्यात  सरकारने निकाली काढल्या, तेव्हा धोरण लकवा कुठे गेला. त्या फायलीची चौकशी करणार. निर्णय तपासू नाहीतर फेरनिर्णय घेऊ .