शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भारतावर आली रशियाला इशारा देण्याची वेळ

By admin | Updated: May 17, 2017 15:40 IST

भारताचा जवळचाच मित्र असलेल्या रशियाला भारतानं गंभीर इशारा दिला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 17 - भारताचा जवळचाच मित्र असलेल्या रशियाला भारतानं गंभीर इशारा दिला आहे. जर भारताला अणुपुरवठादार देशांच्या समूहाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळाले नाही, तर आण्विक ऊर्जा कार्यक्रमात परदेशी भागीदारांचा सहयोग घेणं भारत बंद करेल, असा इशारा भारतानं रशियाला दिला आहे. कुडानकुलम आण्विक प्रकल्पासाठी 5वी आणि 6वी अणुभट्टी विकसित करण्यासाठी भारत आणि रशियामध्ये होणा-या कराराला अडगळीत टाकण्याचे सूतोवाच भारतानं केले आहेत. चीनशी रशियाची दिवसेंदिवस जवळीक वाढत असून, भारताला एनएसजी सदस्यत्व मिळावं म्हणून रशिया पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत नसल्याचा भारताला संशय आहे. त्यामुळेच भारतानं रशियाला हा इशारा दिला आहे. जागतिक मुद्द्यावर चीनसोबत उभा राहणारा रशिया भारताला एनएसजीचं सदस्यत्व मिळवून देण्यासाठी चीनवर दबाव टाकेल, अशी भारताला आशा आहे. तसेच भारत कुडानकुलम कराराला जाणूनबुजून उशीर करत असल्याचीही रशियाला जाणीव आहे. गेल्या आठवड्यात भारताच्या दौ-यावर असलेले रशियाचे उपपंतप्रधान दमित्री रोगोजिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ भारत आणि रशियामध्ये होणा-या कुडानकुलम आण्विक प्रकल्पाच्या करारासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. भारतानंही या करारासंदर्भात रशियाला अद्याप कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. पुढच्या महिन्यात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एक बैठक होणार आहे. त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरच भारताचा रशियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. रशियासारखा मोठा देश भारताला एनएसजीचं सदस्यत्व मिळवून देण्यासाठी चीनला तयार करू शकतो, असा  भारताला विश्वास आहे. गेल्या 6 महिन्यांपासून रशिया सामंजस्य करार करण्यासाठी भारताच्या नाकदु-या काढतो आहे. मात्र रशियाला अद्यापही त्याच्यात यश मिळालं नाही. गेल्या वर्षी गोव्यात झालेल्या ब्रिक्स समीटमध्ये हा करार होणार होता. त्यानंतर 2016मध्ये या करारावर स्वाक्षरी करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं होतं. मात्र 2017 हे वर्ष उजाडलं तरी अद्यापही करार करण्यात आलेला नाही.