शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

यंदा उष्णतेची लाट

By admin | Updated: March 4, 2017 04:28 IST

येत्या दोन महिन्यांमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या लोकांनी उष्णतेच्या लाटेला तोंड द्यायची तयारी ठेवावी.

हैदराबाद : येत्या दोन महिन्यांमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या लोकांनी उष्णतेच्या लाटेला तोंड द्यायची तयारी ठेवावी. सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान यंदाच्या उन्हाळ््यात असेल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे. या दोन्ही राज्यांत आतापासूनच कडक उन्हाळा जाणवू लागला असून, त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. पुढील दोन महिने उष्णतेची लाट असेल, असे हवामान खात्याने सांगितल्यामुळे तेथील लोकांना पाण्याचीही टंचाई भासेल, असे दिसत आहे.हा उन्हाळा गेल्या वर्षीच्या उन्हाळ््यासारखाच असेल. मागच्या वर्षीही तापमान सामान्यापेक्षा जास्त नोंदले गेले. त्यामुळे यंदाही गेल्यावर्षीसारखीच परिस्थिती असेल, असे येथील आयएमडीच्या हवामानशास्त्र केंद्राचे संचालक वाय. के. रेड्डी यांनी सांगितले. पुढील दोन महिन्यांत उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती असू शकेल, असेही रेड्डी म्हणाले.तापमान एप्रिल आणि मे महिन्यात ४७ अंश सेल्सिअस एवढे असू शकेल व पारा या दोन महिन्यांत अनेक दिवस ४५ अंश सेल्सियसच्या जवळपास असेल, असे ते म्हणाले. येत्या उन्हाळ््यातील उष्णतेच्या लाटेला तोंड देण्यासाठी आमची तयारी आहे, असे राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरणने (एनडीएमए) गेल्या आठवड्यात म्हटले होते. राज्यांना कृती योजना पाठवण्यात आल्यामुळे २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये उष्णतेच्या लाटेत मरण पावणाऱ्यांची संख्या खाली आणता, असे प्राधिकरणचे सहसचिव थिरुप्पुगझ यांनी सांगितले. ते म्हणाले की, १९९२ ते २०१५ या कालावधीत देशात उष्णतेच्या लाटेशी संबंधित घटनांमध्ये अंदाजे २२ हजार लोक मरण पावले होते. या वेळी लोकांनी सावधानता बाळगावी. (वृत्तसंस्था)>अनेक भागांमध्ये भीषण पाणीटंचाई फेब्रुवारी महिना आताच संपला असून, पावसाळा सुरू व्हायला आणखी किमान तीन महिने शिल्लक आहेत. मात्र, ओडिशाच्या अनेक भागांमध्ये भीषण पाणीटंचाई आताच भासू लागली आहे. तलाव आताच कोरडे पडू लागले आहेत आणि नद्यांची पातळीही खाली आली आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंत ओडिशाला याहून अधिक पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल, असे सांगण्यात येत आहे. अनेक भागांत आताच दोन वा तीन दिवसांनी पाणी मिळत आहे. तेही पुरेसे नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.२०१५ मध्ये उष्णतेच्या लाटेत २,४०० लोक मरण पावले होते, तर २०१६ मध्ये १,१०० लोक मरण पावले होते.