शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

टॅँकरचा खर्च कमी करण्यावर भर थकीत बिल भरणार

By admin | Updated: May 30, 2014 01:02 IST

नाशिक : उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी टंचाई कृती आराखड्यात सुचविलेल्या उपाययोजनांऐवजी सरसकट टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून ठेकेदाराचे हित जोपासणार्‍या सरकारी यंत्रणेला शासनाने चांगलीच चपराक दिली असून, टॅँकरवर होणार्‍या खर्चात बचत व कपात करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक : उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी टंचाई कृती आराखड्यात सुचविलेल्या उपाययोजनांऐवजी सरसकट टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून ठेकेदाराचे हित जोपासणार्‍या सरकारी यंत्रणेला शासनाने चांगलीच चपराक दिली असून, टॅँकरवर होणार्‍या खर्चात बचत व कपात करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणार्‍या पाणीटंचाईचा सामना करण्यापूर्वी ऑक्टोबरपासूनच पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविल्या जाव्यात असे शासनाचे धोरण असून, जिल्हा परिषदेने त्याबाबतचा टंचाई कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी तीन टप्प्यांत करावी, असे ठरविण्यात आले आहे. परंतु पहिल्या दोन टप्प्यात या आराखड्याची अंमलबजावणीच होत नसल्याने शेवटच्या तिसर्‍या टप्प्यात उन्हाचा वाढलेला तडाखा पाहून सरकारी यंत्रणेकडून फक्त टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर दिला जातो. दरवर्षी कोट्यवधी रुपये निव्वळ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावरच उधळले जातात. त्यापेक्षा टंचाई दूर करण्यासाठी या निधीचा वापर व्हावा, अशी सूचना वारंवार केली जाते. यंदाही राज्यात सर्वत्र टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे पाहून टॅँकरवर होणारा खर्च कमी करण्यासाठी शासनानेच पावले उचलली आहेत. विशेष करून टंचाईग्रस्त गावांमधील हंगामी पाणीपुरवठा योजना वा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वीज देयक थकल्याने बंद पडली असेल व त्यामुळे संबंधित गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असेल तर अशा योजना सुरू करण्यासाठी टंचाई निधीतून वीज देयके अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या विहिरींना पाइपलाइन व विद्युत मोटारी बसविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या विहिरीच्या पाण्याचा वापर पेयजलाकरिताच केला जावा, असेही शासनाने नमूद केले आहे. या उपाययोजनांमुळे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर होणार्‍या खर्चात बचत होईल, असे शासनाचे म्हणणे आहे. टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांनामे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी अधिक प्रमाणात होऊ लागल्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने पाणीपुरवठा करता यावा यासाठी टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ३० जूनपर्यंत हे अधिकार कायम राहतील.