लोणारा शिवारात वाघाचा धुमाकूळ
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
लोणारा शिवारात वाघाचा धुमाकूळ
लोणारा शिवारात वाघाचा धुमाकूळ
लोणारा शिवारात वाघाचा धुमाकूळ१५ शेळ्या केल्या फस्त : नागरिकांत भीतीचे वातावरणनांद : परिसरातील लोणारा शिवारात आठवडाभरापासून वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास लोणारा येथे गोठ्यात बांधून असलेल्या शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला चढवून १५ बकऱ्या फस्त केल्या. यात शेतकऱ्याचे जवळपास एक लाखाचे नुकसान झाले.लोणारा गाव हे जंगल परिसरात वसले आहे. लोणारा गावालगत असलेल्या आलेसूर येथील माणिक मोतीराम गायकवाड या शेतकऱ्याच्या गोठ्यात शिरून वाघाने चार शेळ्या ठार केल्या. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. त्यानंतर वाघाने लोणारा येथील शेतकरी दीपक आनंदराव ढोणे यांच्या गावालगत असलेल्या गोठ्यातील ६० शेळ्यांच्या कळपावर हल्ला चढविला. यात वाघाने १५ शेळ्यांना जागीच ठार केले. पहाटेच्या सुमारास ग्रामस्थांच्या आवाजामुळे वाघ जंगलात जाताना आढळला. दरम्यान, ग्रामस्थांनी गोठ्यात पाहणी केली असता, १५ शेळ्या मृतावस्थेत आढळल्या.या घटनेबाबत वन विभागाला सूचना देण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी किरपाने व वनरक्षक प्रमोद जळीत यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सदर मृत शेळ्यांमध्ये चार बोकडांचा समावेश आहे. या घटनेमुळे ढोणे यांचे जवळपास एक लाखाचे नुकसान झाले आहे.अशा घटनांमुळे परिसरात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. दररोज गुराखी जनावरे चारण्यासाठी जातात. त्यांनाही वाघाच्या डरकाळ्या कानी पडत असून त्यांच्यातही भीतीचे वातावरण आहे. सध्या वाघाने जनावरांवर हल्ला करणे सुरू केले आहे. एखाद्या व्यक्तीवर वाघाने हल्ला चढविल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने या वाघाचा तातडीने बंदोबस्त लावावा. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)