शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

तापमानवाढीमुळे तळमळतोय सागराचा ‘प्राण’ !

By admin | Updated: September 13, 2014 02:16 IST

समुद्र आणि समुद्र पृष्ठभागाचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे

भारत शिंदे, पणजीसमुद्र आणि समुद्र पृष्ठभागाचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे सखल भागामध्ये समुद्राचा विस्तार होण्याचा धोका ओळखून मानवाने वेळीच सतर्क होण्याची आवश्यकता असल्याचे असे मत राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. डब्ल्यू. ए. नकवी यांनी व्यक्त केले. उल्लेखनिय म्हणजे, याच विषयावर न्यूयॉर्क येथील शिखर बैठकीत चिंतनही केले जाईल.‘हवामान बदल आणि त्याचा मानवी जीवनावर परिणाम’ या संदर्भात नकवी यांनी ‘लोकमत’शी खास बातचित केली. ते म्हणाले, की समुद्राच्या पाण्यामध्ये विविध स्तर असतात. त्याचे तापमानही वेगवेगळे असते. सर्वात तळातील जलस्तराचे तापमान अत्यंत कमी म्हणजे सुमारे ३ ते ४ सेंटीग्रेड असते. त्याची घनताही जास्त असते. समुद्राच्या बहुतांश पाण्याची घनता सरासरी १.०३ ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर असते. त्याचबरोबर समुद्रातील ७५ टक्के पाण्याचे तापमान ० ते ६ डिग्री सेंटीग्रेड असते. खोल समुद्रातील पाण्याचा स्तर आणि ध्रुवीय प्रदेशातील पाणी थंड असते. त्याच्यावर वातावरणातील तापमान बदलाचाही परिणाम होतो.वाढत्या तापमानाचा माशांच्या खाद्यावर, गरम पाण्यामध्ये शेवाळावर तसेच माशांच्या शारीरिक संरचनेवर व प्रजनन क्षमतेवरही वाईट परिणाम दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले.जागतिक स्तरावर विचार केल्यास न्युझीलंडमध्ये समुद्राचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. हे जर असेच होत राहिले तर न्युझीलंड जगाच्या नकाशावर राहील काय, हा प्रश्न आहे. तेथे जमिनीच्या दरातही कमालीची घसरण झाली आहे. त्या तुलनेत नेदरलँडमध्ये समुद्राचे तापमान स्थिर आहे, असेही नकवी यांनी सांगितले.गोव्यामध्ये करंझाळेसारख्या सखल भागात समुद्राच्या वाढत्या पाण्याचा विस्तार होत आहे. गेल्या महिन्यात मुंबईच्या किनाऱ्यावरील उंच उंच लाटांनी काही परिसर जलमय झाला होता. बांगलादेशास पुराचा तडाखा बसला तर तेथील लोक जीव वाचविण्यासाठी शेजारील भागात म्हणजे भारताच्या सीमावर्ती राज्यात स्थलांतर करतात. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत, याचाही उल्लेख नकवी यांनी केला. सध्या समुद्राचा विस्तार रोखण्यासाठी कोणतेही तंत्रज्ञान विकसित झालेले नाही.