शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

तापमानवाढीमुळे तळमळतोय सागराचा ‘प्राण’ !

By admin | Updated: September 13, 2014 02:16 IST

समुद्र आणि समुद्र पृष्ठभागाचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे

भारत शिंदे, पणजीसमुद्र आणि समुद्र पृष्ठभागाचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे सखल भागामध्ये समुद्राचा विस्तार होण्याचा धोका ओळखून मानवाने वेळीच सतर्क होण्याची आवश्यकता असल्याचे असे मत राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. डब्ल्यू. ए. नकवी यांनी व्यक्त केले. उल्लेखनिय म्हणजे, याच विषयावर न्यूयॉर्क येथील शिखर बैठकीत चिंतनही केले जाईल.‘हवामान बदल आणि त्याचा मानवी जीवनावर परिणाम’ या संदर्भात नकवी यांनी ‘लोकमत’शी खास बातचित केली. ते म्हणाले, की समुद्राच्या पाण्यामध्ये विविध स्तर असतात. त्याचे तापमानही वेगवेगळे असते. सर्वात तळातील जलस्तराचे तापमान अत्यंत कमी म्हणजे सुमारे ३ ते ४ सेंटीग्रेड असते. त्याची घनताही जास्त असते. समुद्राच्या बहुतांश पाण्याची घनता सरासरी १.०३ ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर असते. त्याचबरोबर समुद्रातील ७५ टक्के पाण्याचे तापमान ० ते ६ डिग्री सेंटीग्रेड असते. खोल समुद्रातील पाण्याचा स्तर आणि ध्रुवीय प्रदेशातील पाणी थंड असते. त्याच्यावर वातावरणातील तापमान बदलाचाही परिणाम होतो.वाढत्या तापमानाचा माशांच्या खाद्यावर, गरम पाण्यामध्ये शेवाळावर तसेच माशांच्या शारीरिक संरचनेवर व प्रजनन क्षमतेवरही वाईट परिणाम दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले.जागतिक स्तरावर विचार केल्यास न्युझीलंडमध्ये समुद्राचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. हे जर असेच होत राहिले तर न्युझीलंड जगाच्या नकाशावर राहील काय, हा प्रश्न आहे. तेथे जमिनीच्या दरातही कमालीची घसरण झाली आहे. त्या तुलनेत नेदरलँडमध्ये समुद्राचे तापमान स्थिर आहे, असेही नकवी यांनी सांगितले.गोव्यामध्ये करंझाळेसारख्या सखल भागात समुद्राच्या वाढत्या पाण्याचा विस्तार होत आहे. गेल्या महिन्यात मुंबईच्या किनाऱ्यावरील उंच उंच लाटांनी काही परिसर जलमय झाला होता. बांगलादेशास पुराचा तडाखा बसला तर तेथील लोक जीव वाचविण्यासाठी शेजारील भागात म्हणजे भारताच्या सीमावर्ती राज्यात स्थलांतर करतात. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत, याचाही उल्लेख नकवी यांनी केला. सध्या समुद्राचा विस्तार रोखण्यासाठी कोणतेही तंत्रज्ञान विकसित झालेले नाही.