शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

मजीप्राच्या जलवाहिनीला गळती; रस्त्यावर पाण्याचे डबके

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

खानापूर: पातूर ते खानापूर मार्गावरील मुल्तारामनगरालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीवरील दोन व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, या पाण्याचे डबके रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे मुल्तारामनगरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

खानापूर: पातूर ते खानापूर मार्गावरील मुल्तारामनगरालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीवरील दोन व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, या पाण्याचे डबके रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे मुल्तारामनगरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
खानापूर मार्गावरील नाल्यापासून काही मीटर अंतरावर जैन यांच्या घरासमोर पातूर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीवर असलेल्या दोन व्हॉल्वमधून पाण्याची गळती होत आहे. यामुळे रस्त्यावर घाण पाण्याचे डबके साचले आहे. याचा रस्त्यावरून जाणार्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याच्या डबक्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरातील लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मुल्तारामनगरातील श्यामराव कवले, वैभव परमाळे, महेश वाडेकर आदींनी मजीप्राच्या पातूर येथील शाखा अभियंत्यांना १ डिसेंबर रोजी जलवाहिनीची गळती बंद करण्याबाबतचे निवेदन सादर केले होते; परंतु त्याची दखल घेतल्या गेली नाही. त्यानंतर १३ डिसेंबर रोजी या लोकांनी त्यांना पुन्हा एक स्मरणपत्र दिले. त्यानंतरही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. दोन दिवसांपूर्वी या डबक्याच्या ठिकाणी माती टाकण्यात आली; परंतु पाण्यामुळे ही माती वाहून गेली. त्यामुळे संबंधित विभागाने पाण्याची गळती बंद करून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर) 21 सीटीसीएल