शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
2
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
3
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
5
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
6
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
7
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
8
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
9
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
10
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
11
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
12
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
13
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
14
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
15
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
16
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
17
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
18
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
19
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
20
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांनंतरही मोदींचे गारुड कायम

By admin | Updated: May 26, 2017 03:14 IST

मोदी सरकारच्या कामगिरीचे ‘लोकमत’च्या लाखो वाचकांनी केलेले मूल्यमापन...

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 26 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसभेत संपूर्ण बहुमत लाभलेल्या कोणत्याही सरकारसाठी पहिले तीन वर्ष तसे आव्हानात्मक, आश्वासक आणि दिशादर्शक असतात. या तीन कसोट्यांवर मोदी सरकारच्या कामगिरीचे लोकमतच्या लाखो वाचकांनी केलेले मूल्यमापन लक्षात घेतले, तर जनतेच्या मनावर आजही मोदींचे गारूड कायम असल्याचे दिसून येते. नोटाबंदीच्या निर्णयावर कितीही टीका झाली असली तरी, लोकांनी याच निर्णयावर पसंतीची मोहोर उमटवली आहे. विकासाचा अजेंडा, गतिमान प्रशासन, भ्रष्टाचारावर अंकुश या मुद्यांवर सरकाराची कामगिरी उत्कृष्ट श्रेणीत असली तरी बेरोजगारी, महिलांना सुरक्षा, दारिद्रयनिर्मुलन आदी विषयांवर अजून बरेच काम बाकी आहे.शिवाय, मोदींच्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी वगळता इतर मंत्र्यांची कामगिरी तितकी सरस असल्याचे दिसून येत नाही. संरक्षणासारखे महत्वाचे खाते, मंत्र्याविना ठेवणे देशाच्या संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने चांगले नाही. सध्या या खात्याचा अतिरिक्त पदभार अर्थमंत्री अरुण जेटली सांभाळत आहेत.काश्मीरच्या प्रश्नावरही आणखी कठोर भूमिका हवी, अशी अपेक्षा वाचकांनी व्यक्त केली आहे. मोदी सरकार आल्यापासून जातीयवादी शक्तिंना खतपाणी मिळत असल्याची भावना वाढीस लागली आहे. असहिष्णुतेच्या नावाने उठलेले वादळ शमले असले तरी दादरी, सहारणपूरसारख्या घटनांची पुनर्रावृत्ती होत राहिली तर या सरकारच्या प्रतिमेवर तो कलंक असेल.  राष्ट्रवादाच्या उन्मादातून सामाजिक हिंसा घडवून आणणाऱ्या शक्तींना वेळीच आवर घातला गेला नाही, तर विकासाच्या अजेंड्यांवर पाणी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘अच्छे दिना’चे स्वप्न अजून प्रत्यक्षात साकारले गेले नसले, तरी सरकारची वाटचाल आश्वासक असल्याचा निष्कर्ष या सर्व्हेतून समोर येतो.

1)मोदी सरकारकडून तीन वर्षांमध्ये तुमच्या अपेक्षांची पूर्तता होतेय का?

2)पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचार संपेल, असे म्हटले होते. भ्रष्टाचार थांबला आहे का?

3)मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या काळात विकास झाला, असे वाटते का ?

 

4) सरकारने घेतलेल्या या निर्णयांपैकी तुम्हाला आवडलेला निर्णय कोणता?

5) मोदी सरकारच्या काळात देशातील गरिबी कमी झाल्याचे तुम्हाला वाटते का?

6) मोदी सरकार आल्यापासून महागाई वाढली की कमी झाली?

7)मोदी सरकारच्या काळात शासन दरबारी जलद गतीने कामं होतात का?

8) तीन वर्षांच्या काळात बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या का?

9)मोदी सरकार निर्णय घेताना यापैकी कोणाचा अधिक विचार करते असे वाटते?

10)मोदी सरकार आल्यापासून महिलांना सुरक्षेची हमी मिळाली का?

11)मोदी सत्तेत आल्यापासून गेल्या तीन वर्षांत देशात असहिष्णुता वाढली आहे का?

12)या सरकारमुळे जातीयवादी शक्तींना बळ मिळतंय, असे वाटते का?

13)दहशतवाद, नक्षलवाद याविषयी मोदी सरकारची भूमिका कशी वाटते?

14)मोदी सरकार काश्मीर प्रश्न कसा हाताळत आहे?

15)मोदी सरकारचे पाकिस्तानसंबंधीचे धोरण कसे आहे?

16) मोदी सरकारमधील मंत्री त्यांच्याकडील खात्यास न्याय देत आहेत का?

17)मोदी यांच्या मंत्रिमंडळात सर्वोत्तम मंत्री कोण?

18) तुमच्या मनात पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा कशी आहे?

19) पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची तीन वर्षांची कारकीर्द कशी वाटते?

20) लोकसभेच्या निवडणुका झाल्यास भाजपाला किती जागा मिळतील?

21) मोदी यांचा करिष्मा तीन वर्षांनंतरही कायम आहे असे वाटते का?

 

ग्राफिक्स : प्रदीप सूर्यवंशी, अमित भेरेरेखाचित्र : अमोल ठाकूर