शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

तीन वर्षांपूर्वीच ईव्हीएममध्ये गडबड

By admin | Updated: April 15, 2017 01:15 IST

भाजपाने २०१४मधील लोकसभा निवडणुकीतही इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीन्समध्ये (ईव्हीएम) छेडछाड करून विजय मिळवला. परंतु त्याची जाणीव आम्हाला

लखनऊ : भाजपाने २०१४मधील लोकसभा निवडणुकीतही इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशीन्समध्ये (ईव्हीएम) छेडछाड करून विजय मिळवला. परंतु त्याची जाणीव आम्हाला नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर झाली. निवडणुकीत उत्तर प्रदेशात ४०३ जागांपैकी २५० जागांवर ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली, असे बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती म्हणाल्या. इतर जागा आपण तशाही जिंकणारच आहोत, असा विचार भाजपाने तेव्हा केला, असे मायावती शुक्रवारी म्हणाल्या. ईव्हीएमचा मुद्दा घेऊन बसपने दर महिन्याच्या ११ तारखेला निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. आता ईव्हीएमचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेलेला असल्यामुळे ही निदर्शने थांबवण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. ईव्हीएमचा गैरवापर करण्यात आल्याचा मुद्दा मी उपस्थित केल्यापासून भाजपाने मला लक्ष्य केले आहे, असे सांगून मायावती म्हणाल्या की, ईव्हीएमच्या मुद्द्यावर मी सुरू केलेल्या संघर्षात इतर पक्षांची मदत घ्यायलाही मी तयार आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपाने ईव्हीएमच्या केलेल्या दुरुपयोगाबद्दल मी बोलणे थांबवावे म्हणून मला लक्ष्य करण्यात आले आहे. तो एका कटाचा भाग आहे. परंतु मी लोकशाही वाचवण्यासाठी या संघर्षातून माघार घेण्यासाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बहुजन समाज पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)अन्य पक्षांची मदत घ्यायलाही मी तयार आहेभाजपने ईव्हीएमच्या केलेल्या दुरुपयोगाबद्दल आमचा पक्ष संघर्ष सुरूच ठेवील. त्यामुळे आता बसप ईव्हीएमविरोधातील लढाई लढण्यासाठी भाजपविरोधी पक्षांची मदत घ्यायलाही तयार आहे कारण आधी लोकशाही असून ती आम्ही जिवंत ठेवली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. ईव्हीएममधील छेडछाड लवकर रोखणे हे पक्षाच्या हिताचे असून त्यासाठी आम्ही विषावरील उतारा विषच वापरायला तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.