शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

बनावट दाखल्यांचा गुंता सोडवण्याचे पोलिसांसमोर आव्हान तिघे फरारच : महाभागांनी संगनमताने केला प्रकार, रॅकेट असण्याची शक्यता

By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST

जळगाव : महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात बनावट दाखले तयार होत असल्याचा प्रकार वरिष्ठ लिपिकाच्या सतर्कतेने उजेडात आल्यावर पाचोरा येथील दोघे व जळगावातील तिघे अशा एकूण पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणात महापालिकेच्या लिपिकासह दोघांना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरित आरोपींना अद्यापही अटक नसल्याने या प्रकरणाचा गुंता कायम आहे.

जळगाव : महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात बनावट दाखले तयार होत असल्याचा प्रकार वरिष्ठ लिपिकाच्या सतर्कतेने उजेडात आल्यावर पाचोरा येथील दोघे व जळगावातील तिघे अशा एकूण पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणात महापालिकेच्या लिपिकासह दोघांना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरित आरोपींना अद्यापही अटक नसल्याने या प्रकरणाचा गुंता कायम आहे.
पाचोरा येथील अहमद मुसाजी बोहरी (वय ५५) याचा मुलगा अझिज याला पासपोर्ट बनवण्यासाठी नावाचा दाखला हवा होता. त्यासाठी अहमदने त्याच्या नावाचा बनावट दाखला तयार केला. त्यावर जळगाव महापालिकेचा शिक्का मारून इतर बनावट दस्तावेज जोडून ते दुरुस्तीसाठी जन्म-मृत्यू नोंदणी विभागात जमा केले. हा प्रकार जन्म व मृत्यू नोंदणी विभागातील वरिष्ठ लिपिक राजेंद्र पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी ही बाब वरिष्ठ निबंधकांच्या निदर्शनास आणून दिली. हा प्रकार गंभीर असल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिका आयुक्तांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यानंतर राजेंद्र पांडुरंग पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पाच जणांविरुद्ध गुन्हा
प्राथमिक तपासात हा प्रकार संगनमताने झाल्याने उघड झाल्याने अहमद मुसाजी बोहरी (५५, रा.पाचोरा), पवन विलास मोराणकर (२५, रा.पाचोरा), संजय विक्रम पाटील (५१, रा.जळगाव), सोमनाथ नारायण वाणी (३५, रा.इंद्रप्रस्थनगर, जळगाव) व महापालिकेचा लिपिक संदीप मिलिंद तायडे (३६, रा.इंद्रप्रस्थनगर, जळगाव) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात सुरुवातीला संदीप तायडेला ४ मार्चला रात्री ९.५२ वाजता तर सोमनाथ वाणी याला ८ मार्चला रात्री १० वाजता पोलिसांनी अटक केली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.
तपासकामात अडथळे
गुन्हा दाखल झाल्यावर तपास कामादरम्यान, ६ व ७ मार्चला शासकीय सुटी आल्याने आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करता आले नाहीत. नंतर संदीपची प्रकृती बिघडल्याने त्याला विचारपूस करता आली नाही. तो पोलीस कोठडीत असताना शहर पोलीस ठाण्यात दुसरा गंभीर गुन्हा दाखल झाला. त्याचाही तपास या प्रकरणातील तपासाधिकार्‍यांकडे आल्याने एकाच वेळी दोन्ही गुन्‘ांचा तपास करता येणे शक्य नव्हते. म्हणून या प्रकरणाचा तपास मंदावला होता.