शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

बनावट दाखल्यांचा गुंता सोडवण्याचे पोलिसांसमोर आव्हान तिघे फरारच : महाभागांनी संगनमताने केला प्रकार, रॅकेट असण्याची शक्यता

By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST

जळगाव : महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात बनावट दाखले तयार होत असल्याचा प्रकार वरिष्ठ लिपिकाच्या सतर्कतेने उजेडात आल्यावर पाचोरा येथील दोघे व जळगावातील तिघे अशा एकूण पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणात महापालिकेच्या लिपिकासह दोघांना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरित आरोपींना अद्यापही अटक नसल्याने या प्रकरणाचा गुंता कायम आहे.

जळगाव : महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात बनावट दाखले तयार होत असल्याचा प्रकार वरिष्ठ लिपिकाच्या सतर्कतेने उजेडात आल्यावर पाचोरा येथील दोघे व जळगावातील तिघे अशा एकूण पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणात महापालिकेच्या लिपिकासह दोघांना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरित आरोपींना अद्यापही अटक नसल्याने या प्रकरणाचा गुंता कायम आहे.
पाचोरा येथील अहमद मुसाजी बोहरी (वय ५५) याचा मुलगा अझिज याला पासपोर्ट बनवण्यासाठी नावाचा दाखला हवा होता. त्यासाठी अहमदने त्याच्या नावाचा बनावट दाखला तयार केला. त्यावर जळगाव महापालिकेचा शिक्का मारून इतर बनावट दस्तावेज जोडून ते दुरुस्तीसाठी जन्म-मृत्यू नोंदणी विभागात जमा केले. हा प्रकार जन्म व मृत्यू नोंदणी विभागातील वरिष्ठ लिपिक राजेंद्र पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी ही बाब वरिष्ठ निबंधकांच्या निदर्शनास आणून दिली. हा प्रकार गंभीर असल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिका आयुक्तांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यानंतर राजेंद्र पांडुरंग पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पाच जणांविरुद्ध गुन्हा
प्राथमिक तपासात हा प्रकार संगनमताने झाल्याने उघड झाल्याने अहमद मुसाजी बोहरी (५५, रा.पाचोरा), पवन विलास मोराणकर (२५, रा.पाचोरा), संजय विक्रम पाटील (५१, रा.जळगाव), सोमनाथ नारायण वाणी (३५, रा.इंद्रप्रस्थनगर, जळगाव) व महापालिकेचा लिपिक संदीप मिलिंद तायडे (३६, रा.इंद्रप्रस्थनगर, जळगाव) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात सुरुवातीला संदीप तायडेला ४ मार्चला रात्री ९.५२ वाजता तर सोमनाथ वाणी याला ८ मार्चला रात्री १० वाजता पोलिसांनी अटक केली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.
तपासकामात अडथळे
गुन्हा दाखल झाल्यावर तपास कामादरम्यान, ६ व ७ मार्चला शासकीय सुटी आल्याने आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करता आले नाहीत. नंतर संदीपची प्रकृती बिघडल्याने त्याला विचारपूस करता आली नाही. तो पोलीस कोठडीत असताना शहर पोलीस ठाण्यात दुसरा गंभीर गुन्हा दाखल झाला. त्याचाही तपास या प्रकरणातील तपासाधिकार्‍यांकडे आल्याने एकाच वेळी दोन्ही गुन्‘ांचा तपास करता येणे शक्य नव्हते. म्हणून या प्रकरणाचा तपास मंदावला होता.