शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
2
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
3
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
4
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
6
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
7
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
8
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
9
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
10
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
11
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
12
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
13
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
14
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
15
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
16
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
17
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
18
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
19
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
20
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू

तीन राज्यांत भरघोस मतदान!

By admin | Updated: May 17, 2016 04:34 IST

तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित पुडुच्चेरीमध्ये सोमवारी कुठलीही अनुचित घटना न घडता भरघोस मतदानाची नोंद झाली.

नवी दिल्ली/ चेन्नई/ तिरुवनंतपुरम : कडक उन्हासोबतच काही ठिकाणी मुसळधार पावसाने तडाखा दिला असताना तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित पुडुच्चेरीमध्ये सोमवारी कुठलीही अनुचित घटना न घडता भरघोस मतदानाची नोंद झाली. पुडुच्चेरीत विक्रमी ८१.९४ टक्के, तामिळनाडूत ६९.१९ तर केरळमध्ये ६५ टक्के मतदान नोंदले गेले. या तीन राज्यांमध्ये अनुक्रमे २३२, १४० आणि ३० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले.तामिळनाडूच्या सालेम आणि नमाक्कल या मतदारसंघांमध्ये वेळ संपत असतानाही लांबच लांब रांगा आढळून आल्या. तंजावूर आणि दिंडीगुल येथे सकाळी पाऊस आल्यामुळे लोकांनी तेवढा काळ घरी राहणेच पसंत केले. वेदारांयम आणि नागापट्टीणम येथे मुसळधार पावसामुळे मतदानावर परिणाम झाला. द्रमुक आणि अण्णाद्रमुकसह प्रमुख राजकीय पक्षांनी या ठिकाणी मतदानाची वेळ वाढविण्याची केलेली मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य केली नाही.केरळमध्ये संध्याकाळपर्यंत अवघ्या ४४.९३ टक्के मतदानाची नोंद झाली. केंद्रशासित पुडुच्चेरीमध्ये सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. पुडुच्चेरीमध्ये आंध्र प्रदेशच्या यानम वस्त्यांचा तसेच माहे आणि कराईकालच्या काही भागाचा समावेश आहे. एकूण ९.४१ लाख मतदार असून, महिला मतदारांची संख्या ४.९४ लाख आहे. पुडुच्चेरीमध्येही पावसाचा मतदानावर परिणाम झाला नाही. तेथे एकूण ३० मतदारसंघांमध्ये ९६ अपक्षांसह एकूण ३४४ उमेदवार रिंगणात आहेत. मोदींचे आवाहन...तामिळनाडू, केरळ आणि पुडुच्चेरीच्या मतदारांनी विक्रमी संख्येने मतदान करीत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी टिष्ट्वटरवर केले. या तीनही राज्यांमध्ये भाजपाला अद्याप प्रभाव दाखवता आलेला नाही. या वेळी विशेषत: तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपाने जोरदार प्रचार केला.।तुरा पोटनिवडणुकीत ६६ टक्क्यांवरमेघालयच्या तुरा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ६६ टक्क्यांवर मतदान झाले. प्रतिकूल वातावरणातही मतदारांनी उत्साह दाखविला. सर्व ४९५ मतदान केंद्रांवर कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. या मतदारसंघाचे नऊवेळा खासदार राहिलेले माजी लोकसभा अध्यक्ष पी.ए. संगमा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.चंडी, विजयन यांना विजयाचा विश्वास...काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफ पुन्हा विजयी होईल, असा विश्वास केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी तर या राज्यात डाव्या आघाडीची लाट असल्याचा दावा मुख्यमंत्रिपदाचे दावेदार पिनारायी विजयन यांनी केला. विरोधी पक्षनेते व्ही.एस. अच्युतानंदन यांनी अनेक मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदानाचा अंदाज घेतला.पोटनिवडणूकही शांततेत... गुजरातच्या सौराष्ट्रमधील गीर-सोमनाथ जिल्ह्यात तलाला विधानसभा मतदारसंघातील २३० मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. काँग्रेसचे आमदार जसू बारड यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक आवश्यक ठरली होती. झारखंडच्या पांकी व गोड्डा मतदारसंघांमध्ये ६५ टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली. बिदेशसिंग (पांकी) आणि रघुनंदन मंडल (गोड्डा) यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली.हृदयविकाराच्या झटक्याने चौघांचा मृत्यूतामिळनाडूत तिघांचा तर केरळमध्ये एकाचा मतदानाच्या वेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. केरळच्या कोझिकोडेजवळील पेराम्ब्रा येथील एका मतदान केंद्रावर कुन्नी अब्दुल्ला हाजी (७०) रांगेत उभे असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. तामिळनाडूच्या कांगेयाम विधानसभा मतदारसंघात ५४वर्षीय निवडणूक अधिकारी तसेच मदुराई आणि शिवगंगा येथे दोन वृद्धांना हृदयविकाराचा धक्का बसला. वैद्यकीय उपचाराआधीच ते दगावले. या राज्यात कराईकुडी येथे मुसळधार पावसानंतर मतदान केंद्राचे छप्पर कोसळून पाच जण जखमी झाले.