शहरं
Join us  
Trending Stories
1
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
2
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
3
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
4
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
5
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
6
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
7
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
8
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
9
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
10
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
11
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
12
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
13
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
14
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं
15
सौदीत जाऊन योगी आदित्यनाथांबद्दल आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट, अखेर तावडीत सापडलाच
16
म्हणून त्याला किंग खान म्हणतात! 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला ड्रेसमुळे चालताच येईना, शाहरुखची 'ती' कृती प्रेक्षकांना भावली
17
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
18
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
19
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...

तीन राज्यांत मुसळधार : आसामात दरडी कोसळून १० ठार

By admin | Updated: May 19, 2016 04:26 IST

उष्मालाटेने देश होरपळून निघाला असताना, किमान तीन राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावत अन्य भागाच्या आशा पल्लवित केल्या आहे.

गुवाहाटी/ चेन्नई/ भुवनेश्वर : उष्मालाटेने देश होरपळून निघाला असताना, किमान तीन राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावत अन्य भागाच्या आशा पल्लवित केल्या आहे. हवामान विभागाने येत्या ४८ तासांत आणखी एक-दोन राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.आसामच्या बराक खोऱ्यातील करीमगंज आणि हैलाकांडी जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळून १० जण ठार झाले. अरुणाचलमध्ये गेल्या काही दिवसांपासूनच्या जोरदार पावसामुळे नोआ-देहलिंग नदीला पूर आल्यामुळे हाहाकार उडाला. हवामान विभागाने तामिळनाडू आणि ओडिशा, आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात पश्चिम-मध्य भागात केंद्रित झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिशात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूच्या काही भागांमध्ये बुधवारी तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळ सक्रिय होण्याची शक्यता असून, उत्तर किनारपट्टीसह पुद्दुचेरीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)>ओडिशामध्ये चक्रीवादळाबाबत सतर्कता...ओडिशाच्या गोपालपूरपासून आग्नेयेकडे ७८० किमी. अंतरावर बंगालच्या उपसागरालगत कमी दाबाचा पट्टा केंद्रित झाला असून, हवामान विभागाने प्रथमच चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून उत्तर आणि ईशान्येकडे सरकत जाणार असून, २४ तासांत वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल. पुढील ४८ तासांत ते उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाकडे सरकलेले असेल. चेन्नईत एनडीआरएफच्या चार चमू ... तामिळनाडूत चेन्नईच्या पश्चिमेकडे ९० किमी, तर पूर्वेकडे ७० किमी. अंतरावर कमी दाबाचा पट्टा सरकलेला राहील. त्याची परिणती तामिळनाडूची उत्तर किनारपट्टी आणि लगतच्या पुद्दुचेरीमध्ये येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्यात होऊ शकते. चेन्नईच्या सखल भागात एनडीआरएफचे चार चमू दाखल झाले आहेत.अरुणाचलमध्ये तीन गावे पुराखाली... गेल्या काही दिवसांपासून अरुणाचलमध्ये संततधार पावसामुळे नोआ-देहलिंग नदीला पूर आला असून, नामसाई जिल्ह्यांतील महादेवपूर-१, महादेवपूर-४ आणि काकोनी ही गावे पाण्याखाली आली आहेत. धानाची पिकेही बुडाली आहेत. १० मे रोजी बाबूंची पाच घरे वाहून गेली होती. आंध्र किनाऱ्यावर चक्रीवादळाची शक्यता आंध्र प्रदेशच्या दक्षिण आणि उत्तर भागांतील किनाऱ्यांवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली असून, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि त्याची अंमलबजावणी सर्व ठिकाणी होईल, हे जिल्हा प्रशासनाने पाहायचे आहे, असे सांगून नायडू म्हणाले की, ‘परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार जिल्हा प्रशासनांना सूचना आणि मदत देण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.’