शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तीन राज्यांत मुसळधार : आसामात दरडी कोसळून १० ठार

By admin | Updated: May 19, 2016 04:26 IST

उष्मालाटेने देश होरपळून निघाला असताना, किमान तीन राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावत अन्य भागाच्या आशा पल्लवित केल्या आहे.

गुवाहाटी/ चेन्नई/ भुवनेश्वर : उष्मालाटेने देश होरपळून निघाला असताना, किमान तीन राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावत अन्य भागाच्या आशा पल्लवित केल्या आहे. हवामान विभागाने येत्या ४८ तासांत आणखी एक-दोन राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.आसामच्या बराक खोऱ्यातील करीमगंज आणि हैलाकांडी जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळून १० जण ठार झाले. अरुणाचलमध्ये गेल्या काही दिवसांपासूनच्या जोरदार पावसामुळे नोआ-देहलिंग नदीला पूर आल्यामुळे हाहाकार उडाला. हवामान विभागाने तामिळनाडू आणि ओडिशा, आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात पश्चिम-मध्य भागात केंद्रित झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिशात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूच्या काही भागांमध्ये बुधवारी तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळ सक्रिय होण्याची शक्यता असून, उत्तर किनारपट्टीसह पुद्दुचेरीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)>ओडिशामध्ये चक्रीवादळाबाबत सतर्कता...ओडिशाच्या गोपालपूरपासून आग्नेयेकडे ७८० किमी. अंतरावर बंगालच्या उपसागरालगत कमी दाबाचा पट्टा केंद्रित झाला असून, हवामान विभागाने प्रथमच चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून उत्तर आणि ईशान्येकडे सरकत जाणार असून, २४ तासांत वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल. पुढील ४८ तासांत ते उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाकडे सरकलेले असेल. चेन्नईत एनडीआरएफच्या चार चमू ... तामिळनाडूत चेन्नईच्या पश्चिमेकडे ९० किमी, तर पूर्वेकडे ७० किमी. अंतरावर कमी दाबाचा पट्टा सरकलेला राहील. त्याची परिणती तामिळनाडूची उत्तर किनारपट्टी आणि लगतच्या पुद्दुचेरीमध्ये येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्यात होऊ शकते. चेन्नईच्या सखल भागात एनडीआरएफचे चार चमू दाखल झाले आहेत.अरुणाचलमध्ये तीन गावे पुराखाली... गेल्या काही दिवसांपासून अरुणाचलमध्ये संततधार पावसामुळे नोआ-देहलिंग नदीला पूर आला असून, नामसाई जिल्ह्यांतील महादेवपूर-१, महादेवपूर-४ आणि काकोनी ही गावे पाण्याखाली आली आहेत. धानाची पिकेही बुडाली आहेत. १० मे रोजी बाबूंची पाच घरे वाहून गेली होती. आंध्र किनाऱ्यावर चक्रीवादळाची शक्यता आंध्र प्रदेशच्या दक्षिण आणि उत्तर भागांतील किनाऱ्यांवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली असून, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि त्याची अंमलबजावणी सर्व ठिकाणी होईल, हे जिल्हा प्रशासनाने पाहायचे आहे, असे सांगून नायडू म्हणाले की, ‘परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार जिल्हा प्रशासनांना सूचना आणि मदत देण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.’