शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

रायपूर हॉस्पिटलमध्ये तीन मुलांचा मृत्यू;ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 13:17 IST

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याची गोरखपूरमधील घटना ताजी असतानाच तशीच एक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे

ठळक मुद्दे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याची गोरखपूरमधील घटना ताजी असतानाच तशीच एक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे रायपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असणाऱ्या तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. हॉस्पिटलमधील स्पेशल केअर युनिटमध्ये ऑक्सिजनचा दबाव कमी झाल्याने या तीन मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातो आहे.

रायपूर, दि. 21- ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याची गोरखपूरमधील घटना ताजी असतानाच तशीच एक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. रायपूरमधील भीमराव आंबेडकर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असणाऱ्या तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. हॉस्पिटलमधील स्पेशल केअर युनिटमध्ये ऑक्सिजनचा दबाव कमी झाल्याने या तीन मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातो आहे. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनी दिले आहेत

आरोग्य सेवेचे संचालक आर प्रसन्न यांच्या माहितीनुसार, जेव्हा ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाला तेव्हा लगेचच ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टरांना अलार्म दिला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. रविवारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याचा फोन आला होता. त्या फोननंतर सीएमओ आणि अधिक्षकांना तात्काळ यामध्ये हस्तक्षेप करत उपाय केले. असं प्रसन्न यांनी सांगितलं आहे. 

बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा असून यासाठी एक ऑपरेटर नेमण्यात आला आहे. मात्र रविवारी रात्री मद्यधुंद अवस्थेतील ऑपरेटर झोपला आणि त्याचा हा निष्काळजीपणा तीन बालकांच्या जिवावर बेतल्याची प्रतिक्रिया उमटते आहे.‘ऑपरेटरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत’ अशी प्रतिक्रिया  मुख्यमंत्री रमण सिंह यांनी सोमवारी सकाळी दिली. हॉस्पिटसमध्ये प्राणवायूचा तुटवडा नव्हता, ऑपरेटरमुळे ही घटना घडली असं हॉस्पिटल प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

गोरखपूर बालमृत्यू प्रकरण : मृतांची संख्या १0५ वर गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील मृतांची संख्या १0५ वर गेली असली तरी उत्तर प्रदेश सरकार त्याकडे फारशा गंभीरपणे पाहताना दिसत नसल्याचे जाणवत आहे. गुरुवार व शुक्रवारी १0 जणांचे मृत्यू झाल्याने हॉस्पिटल प्रशासनानेही मान्य केले. ऑगस्टरच्या दुसऱ्या आठवड्यात ३0 बालकांचा मृत्यू झाल्यावर असं घडलं नाही, असं सरकार सांगत होतं. नंतर आकडा ७ आहे, अस मान्य केलं. नंतर संख्या ६३ वरून वाढत गेली आणि आता ती १0५ झाली.हॉस्पिटलमधील बालमृत्यूवरून राज्यात राजकारण सुरू झाले असून, विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी केल्यानंतर, हे आधीच्या सरकारचे पाप आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी अखिलेश यादव सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. समाजवादी पक्षाने मात्र नव्या सरकारच्या भ्रष्ट व गैरकारभाराचा हा नमुना असल्याचा आरोप केला आहे.