शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

खासगी कंपन्यांना हजारो कोटी ‘भेट’?

By admin | Updated: August 1, 2016 01:34 IST

वीज कंपन्यांना दरवर्षी हजारो कोटी रुपये देण्याच्या करारांमध्ये स्वत:ला अडकवून घेतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- महाराष्ट्र, पंजाब यासारख्या काही प्रमुख राज्यांनी वीजेची प्रत्यक्षात खरेदी न करताच खाजगी वीज कंपन्यांना दरवर्षी हजारो कोटी रुपये देण्याच्या करारांमध्ये स्वत:ला अडकवून घेतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार महाराष्ट्राने खासगी कंपन्यांना दरवर्षी चार हजार कोटी रुपये देण्याची जबाबदारी डोक्यावर घेतली आहे तर, पंजाबने दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांची. पंजाबने गेल्या दोन वर्षांचे मिळून चार हजार कोची रुपये खासगी कंपन्यांना अदा केले आहेत तर, महाराष्ट्राचे चार वर्षांचे मिळून १६ जहार कोटी रुपये द्यायचे बाकी आहेत.केंद्र सरकारमध्ये ऊर्जा, वित्त अशा खात्यांचे सचिव राहिलेले वरिष्ठ निवृत्त सनदीअधिकारी ई.एस. एस. सरमा यांनी भारताच्या नियंत्रक महालेखापरीक्षकांना (कॅग) लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. राज्याला वीजेची गरज असो वा नसो राज्य सरकारला या खाजगी कंपन्यांना प्रतिवर्षी ठराविक रक्कम अदा करावीच लागेल, असे ‘डीम्ड जनरेशनल पर्चेस’ कलम खाजगी कंपन्यांशी केलेल्या वीज खरेदी करारांमध्ये (पॉवर पर्चेस अ‍ॅग्रिमेंट /पीपीए)मधे नमूद असल्यामुळे हा खेळ सुरू आहे. वीज बीलांच्या माध्यमातून ही रक्कम अंतत: ग्राहकांकडूनच वसूल करण्यात येईल, असेही सरना यांनी पत्रात नमूद केले आहे.सरमा पत्रात म्हणतात की, सन २००३ च्या इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्टनुसार करण्यात येणाऱ्या वीज खरेदी करारात एक ‘डीम्ड पर्चेस’ कलम आहे. त्यात असे नमूद आहे की राज्यात ज्या वीज कंपन्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करतील, त्यांच्याकडून वीजेची खरेदी होवो अथवा न होवो, राज्य सरकार या करारान्वये त्यांना एक निश्चित रक्कम दरवर्षी अदा करील. या कलमाला अनुसरून महाराष्ट्राला दरवर्षी ४ हजार कोटींची तर पंजाब सरकारला २ हजार कोटींची रक्कम अदा करावी लागते.काही बातम्यांचा संदर्भ देत सरमा आपल्या पत्रात म्हणतात, पंजाब सरकारने अलीकडेच २ वर्षांचे ४ हजार कोटी रूपये खाजगी कंपन्यांना अदा केले तर महाराष्ट्र सरकारचे ४ वर्षांचे १६ हजार कोटी रूपयांचे देणे बाकी आहे. ।ही लूट कशी थांबवावी?राज्य सरकारचे माधयम वापरून वीज ग्राहकांना लुटणारा हा खेळ थांबवण्यासाठी सरमांनी काही सक्त उपायही आपल्या पत्रात सुचवले आहेत. ते म्हणतात, सर्वप्रथम राज्य सरकारने खाजगी वीज कंपन्यांशी थेट करार करणे टाळले पाहिजे. समजा एखाद्या राज्याला वीज खरेदी करार करणे अगदीच गरजेचे असेल तर किमानपक्षी त्या करारातून डिम्ड जनरेशनल पर्चेस कलम त्याने काढून टाकले पाहिजे. वीज कंपन्यांतर्फे तयार होणाऱ्या विजेच्या विक्रीची जबाबदारी संबंधित खाजगी कंपन्यानीच उचलायला हवी, अशी सक्ती त्यांच्यावर केली पाहिजे.