शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

त्या मुस्लिमांना पाकिस्तानची वाट मोकळी

By admin | Updated: November 23, 2015 09:44 IST

भारतात आपला छळ होत आहे असे ज्यांना वाटते ते भारतीय मुस्लीम पाकिस्तानात जाण्यास मोकळे आहेत, असे वक्तव्य आसामचे राज्यपाला आचार्य यांनी केले

गुवाहाटी : ‘हिंदुस्तान फक्त हिंदूंचाच’ असे वक्तव्य करून नव्या वादाला जन्म देणारे आसामचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांनी; ‘भारतीय मुस्लीम पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी मोकळे आहेत,’ असे दुसरे वादग्रस्त वक्तव्य करीत हा वाद अधिकच चिघळवला आहे. या ‘विभाजनकारी’ वक्तव्याबद्दल आचार्य यांना राज्यपालपदावरून हटविण्यात यावे, अशी जोरदार मागणी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली.आचार्य हे एका राज्याचे संवैधानिक प्रमुख म्हणून काम करण्यापेक्षा ‘आरएसएसचे प्रचारक’ म्हणूनच जास्त काम करीत आहेत, असा आरोप गोगोई यांनी केला. तर आचार्य यांचे हे वक्तव्य आरएसएस आणि भाजपाच्या दादरी हत्याकांडसारख्या घटनांना जन्म देणाऱ्या विभाजनवादी विचारधारेचे निदर्शक असल्याची टीका काँग्रेसने केली.शनिवारी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना आचार्य यांनी ‘हिंदुस्तानात फक्त हिंदूच राहू शकतात’ असे वक्तव्य केले होते. रविवारी त्यावर स्पष्टीकरण देतानाही त्यांनी दुसरे वादग्रस्त वक्तव्य करून वाद अधिक चिघळविला. ‘देशात आपला छळ होतो आहे असे ज्यांना वाटते ते भारतीय मुस्लीम कुठेही जाण्यास मोकळे आहेत. पाकिस्तान अथवा बांगला देशात जाण्याची त्यांची इच्छा असेल तर ते तेथे जाण्यास मोकळे आहेत. त्यांच्यापैकी बरेच पाकिस्तानमध्ये गेले आहेत,’ असे आचार्य म्हणाले.

 
‘हिंदुस्तान केवळ हिंदुंचाच आहे. त्यात गैर असे काही नाही. विविध देशांमधील हिंदू येथे भारतात येऊन राहू शकतात. ते परके नाहीत,’ असेही आचार्य यांनी स्पष्ट केले. आपल्या शनिवारच्या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्याचे पाहून आचार्य यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला आणि आपले स्पष्टीकरण दिले. 
ते म्हणाले, ‘हिंदुस्तान केवळ हिंदूंसाठीच आहे असे मला म्हणायचे नव्हते. तर जगात कुठेही छळल्या जाणा:या हिंदूंना भारतात आश्रय घेण्याचा हक्क आहे, असा माङया म्हणण्याचा अर्थ होता. परदेशात छळ होत असलेल्या मुस्लिमांसह सर्व भारतीय वंशाच्या लोकांचे येथे स्वागत आहे. जगात भारत सर्वात सहिष्णू देश आहे. येथे आम्ही सर्वाना सुरक्षित स्थळ उपलब्ध करून देतो. भारताचे मन मोठे आहे.’
‘बांगला देश आणि अन्य देशात छळ होत असलेल्या कोणत्याही भारतीय वंशाच्या लोकांना भारतात येण्याचा कायदेशीर अधिकार आहे आणि त्यांचे स्वागत करणो हे आमचे कर्तव्य आहे. मुस्लिमांसह सर्व धर्माच्या लोकांना भारतात येण्याचा अधिकार आहे,’असे आचार्य यांनी सांगितले. 
(वृत्तसंस्था)
————————-