शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

त्या मुस्लिमांना पाकिस्तानची वाट मोकळी

By admin | Updated: November 23, 2015 09:44 IST

भारतात आपला छळ होत आहे असे ज्यांना वाटते ते भारतीय मुस्लीम पाकिस्तानात जाण्यास मोकळे आहेत, असे वक्तव्य आसामचे राज्यपाला आचार्य यांनी केले

गुवाहाटी : ‘हिंदुस्तान फक्त हिंदूंचाच’ असे वक्तव्य करून नव्या वादाला जन्म देणारे आसामचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांनी; ‘भारतीय मुस्लीम पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी मोकळे आहेत,’ असे दुसरे वादग्रस्त वक्तव्य करीत हा वाद अधिकच चिघळवला आहे. या ‘विभाजनकारी’ वक्तव्याबद्दल आचार्य यांना राज्यपालपदावरून हटविण्यात यावे, अशी जोरदार मागणी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली.आचार्य हे एका राज्याचे संवैधानिक प्रमुख म्हणून काम करण्यापेक्षा ‘आरएसएसचे प्रचारक’ म्हणूनच जास्त काम करीत आहेत, असा आरोप गोगोई यांनी केला. तर आचार्य यांचे हे वक्तव्य आरएसएस आणि भाजपाच्या दादरी हत्याकांडसारख्या घटनांना जन्म देणाऱ्या विभाजनवादी विचारधारेचे निदर्शक असल्याची टीका काँग्रेसने केली.शनिवारी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना आचार्य यांनी ‘हिंदुस्तानात फक्त हिंदूच राहू शकतात’ असे वक्तव्य केले होते. रविवारी त्यावर स्पष्टीकरण देतानाही त्यांनी दुसरे वादग्रस्त वक्तव्य करून वाद अधिक चिघळविला. ‘देशात आपला छळ होतो आहे असे ज्यांना वाटते ते भारतीय मुस्लीम कुठेही जाण्यास मोकळे आहेत. पाकिस्तान अथवा बांगला देशात जाण्याची त्यांची इच्छा असेल तर ते तेथे जाण्यास मोकळे आहेत. त्यांच्यापैकी बरेच पाकिस्तानमध्ये गेले आहेत,’ असे आचार्य म्हणाले.

 
‘हिंदुस्तान केवळ हिंदुंचाच आहे. त्यात गैर असे काही नाही. विविध देशांमधील हिंदू येथे भारतात येऊन राहू शकतात. ते परके नाहीत,’ असेही आचार्य यांनी स्पष्ट केले. आपल्या शनिवारच्या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्याचे पाहून आचार्य यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला आणि आपले स्पष्टीकरण दिले. 
ते म्हणाले, ‘हिंदुस्तान केवळ हिंदूंसाठीच आहे असे मला म्हणायचे नव्हते. तर जगात कुठेही छळल्या जाणा:या हिंदूंना भारतात आश्रय घेण्याचा हक्क आहे, असा माङया म्हणण्याचा अर्थ होता. परदेशात छळ होत असलेल्या मुस्लिमांसह सर्व भारतीय वंशाच्या लोकांचे येथे स्वागत आहे. जगात भारत सर्वात सहिष्णू देश आहे. येथे आम्ही सर्वाना सुरक्षित स्थळ उपलब्ध करून देतो. भारताचे मन मोठे आहे.’
‘बांगला देश आणि अन्य देशात छळ होत असलेल्या कोणत्याही भारतीय वंशाच्या लोकांना भारतात येण्याचा कायदेशीर अधिकार आहे आणि त्यांचे स्वागत करणो हे आमचे कर्तव्य आहे. मुस्लिमांसह सर्व धर्माच्या लोकांना भारतात येण्याचा अधिकार आहे,’असे आचार्य यांनी सांगितले. 
(वृत्तसंस्था)
————————-