शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

तिसरे महायुद्ध गायीवरुन सुरु होईल

By admin | Updated: August 8, 2016 13:49 IST

तिसरे जागतिक महायुद्ध गायीवरुन सुरु होईल असा दावा महामंडलेश्वर स्वामी अखिलेश्वरानंद यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

इंदूर, दि. ८ - तिसरे जागतिक महायुद्ध गायीवरुन सुरु होईल असा दावा महामंडलेश्वर स्वामी अखिलेश्वरानंद गिरी यांनी केला आहे. ते मध्यप्रदेशच्या गौपालन एवम पूश संवर्धन मंडळाचे अध्यक्ष आहेत. गायींचे संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. 
 
गाय हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिली आहे. तुम्ही पुराणात पाहिले तर, १८५७ साली स्वातंत्र्याची पहिली लढाई गायीवरुन झाली होती असे स्वामी अखिलेश्वरानंद यांनी सांगितले. भगवी वस्त्र, कपाळाला अष्टगंधचा लेप, गळयात रुद्राक्षाची माळ या पेहरावामुळे स्वामी अखिलेश्वरानंद लगेच समोरच्याचे लक्ष वेधून घेतात. 
 
सरकारी कार्यालयात बसलेल्या स्वामी अखिलेश्वरानंद यांची भेट घ्यायाला येणारे पाहुणे पायापडून त्यांचा आर्शिवाद घेतात. ६१ वर्षीय स्वामींना मार्च २०१० मध्ये निरंजन अखाडयाची महामंडलेश्वर ही पदवी मिळाली. सन्यासी जीवन स्वीकारल्यानंतर १२ वर्षांनी त्यांना ही पदवी मिळाली.  
 
गाय हा गौरक्षकांसाठी भावनिक विषय आहे. त्यामुळे मृत किंवा जखमी गाय पाहिल्यानंतर गौरक्षकांना राग येणे स्वाभाविक आहे. गौरक्षकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहनही स्वामी अखिलेश्वरानंद करतात. गायींची तस्करी करणारी गाडी पकडल्यानंतर पोलिस येईपर्यंत गौरक्षकांनी वाट पहावी. 
 
कायदा आपल्या हातात घेऊ नये असे त्यांचे म्हणणे आहे. सर्व राज्यांनी गायीच्या कत्तलीविरोधात कठोर कायदा बनवला आहे. त्यामुळे राज्यांच्या सीमांवरुन पशू तस्करी अशक्य बनली आहे असे स्वामी अखिलेश्वरानंद यांनी सांगितले. 
 
दीक्षा घेण्यापूर्वी स्वामी अखिलेश्वरानंद विहिपच्या रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी होते. गायीचे दूध, मूत्र आणि शेणामध्ये वैद्यकीय गुण असण्यावर त्यांचा विश्वास आहे.