शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
4
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
8
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
9
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
10
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
11
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
12
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
13
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
14
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
15
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
17
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
18
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
19
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...

तिसऱ्यांदा भूसंपादन वटहुकूम

By admin | Updated: May 30, 2015 23:37 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाने वादग्रस्त भूसंपादन वटहुकूम पुन्हा लागू करण्याची शिफारस शनिवारी केली. त्यामुळे मोदी सरकारच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा या वटहुकमाचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने वादग्रस्त भूसंपादन वटहुकूम पुन्हा लागू करण्याची शिफारस शनिवारी केली. त्यामुळे मोदी सरकारच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा या वटहुकमाचा मार्ग मोकळा झाला आहे. सातत्य कायम राखणे आणि ज्यांची जमीन संपादित केली जाते त्यांना मोबदला देण्यासाठी एक ठोस आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने हे आवश्यक असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.२०१३ च्या भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भूसंपादन वटहुकूम आणण्यात आला होता. या वटहुकूमाऐवजी संबंधित विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतरही राज्यसभेत संख्याबळाअभावी सरकारला ते मांडता आले नाही. यावर्षी मार्च महिन्यात दुसऱ्यांदा हा वटहुकूम लागू करण्यात आला असून, येत्या जून महिन्यात त्याची मुदत संपणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची शिफारस मंजुरीसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविण्यात येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)भूसंपादनावर संसदीय संयुक्त समितीच्या शुक्रवारी झालेल्या पहिल्या बैठकीत विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी २०१३ च्या भूसंपादन कायद्यातील तरतुदींमध्ये बदल करण्याबाबत सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भूसंपादन विधेयक जीवन-मरणाचा प्रश्न नाही - मोदी४केंद्रीय मंत्रिमंडळाने भूसंपादन वटहुकूम तिसऱ्यांदा लागू करण्याचा निर्णय घेतला असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक म्हणजे माझ्या जीवन-मरणाचा प्रश्न नसून यासंदर्भात कुठल्याही सूचनांवर विचार करण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.ही तर न्यायाची खिल्ली - काँग्रेस४भूसंपादन वटहुकूम तिसऱ्यांदा लागू करण्याची शिफारस करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणजे ‘न्यायाची खिल्ली’आणि ‘संसदेचा अवमान’ असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.