शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

तिसऱ्यांदा भूसंपादन वटहुकूम

By admin | Updated: May 30, 2015 23:37 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाने वादग्रस्त भूसंपादन वटहुकूम पुन्हा लागू करण्याची शिफारस शनिवारी केली. त्यामुळे मोदी सरकारच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा या वटहुकमाचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने वादग्रस्त भूसंपादन वटहुकूम पुन्हा लागू करण्याची शिफारस शनिवारी केली. त्यामुळे मोदी सरकारच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा या वटहुकमाचा मार्ग मोकळा झाला आहे. सातत्य कायम राखणे आणि ज्यांची जमीन संपादित केली जाते त्यांना मोबदला देण्यासाठी एक ठोस आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने हे आवश्यक असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.२०१३ च्या भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भूसंपादन वटहुकूम आणण्यात आला होता. या वटहुकूमाऐवजी संबंधित विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतरही राज्यसभेत संख्याबळाअभावी सरकारला ते मांडता आले नाही. यावर्षी मार्च महिन्यात दुसऱ्यांदा हा वटहुकूम लागू करण्यात आला असून, येत्या जून महिन्यात त्याची मुदत संपणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची शिफारस मंजुरीसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविण्यात येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)भूसंपादनावर संसदीय संयुक्त समितीच्या शुक्रवारी झालेल्या पहिल्या बैठकीत विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी २०१३ च्या भूसंपादन कायद्यातील तरतुदींमध्ये बदल करण्याबाबत सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भूसंपादन विधेयक जीवन-मरणाचा प्रश्न नाही - मोदी४केंद्रीय मंत्रिमंडळाने भूसंपादन वटहुकूम तिसऱ्यांदा लागू करण्याचा निर्णय घेतला असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक म्हणजे माझ्या जीवन-मरणाचा प्रश्न नसून यासंदर्भात कुठल्याही सूचनांवर विचार करण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.ही तर न्यायाची खिल्ली - काँग्रेस४भूसंपादन वटहुकूम तिसऱ्यांदा लागू करण्याची शिफारस करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणजे ‘न्यायाची खिल्ली’आणि ‘संसदेचा अवमान’ असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.