शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

इराक, सिरीयानंतर भारत पत्रकारांसाठी तिसरा धोकादायक देश

By admin | Updated: May 15, 2016 10:44 IST

पत्रकार राजदेव रंजन आणि झारखंडमध्ये अखिलेश प्रताप सिंह या दोन पत्रकारांच्या २४ तासात झालेल्या हत्यांमुळे पत्रकारांच्या सुरशेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - बिहारमध्ये पत्रकार राजदेव रंजन आणि झारखंडमध्ये अखिलेश प्रताप सिंह या दोन पत्रकारांच्या २४ तासात झालेल्या हत्यांमुळे पत्रकारांच्या सुरशेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. २०१५ च्या एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार पत्रकारांसाठी धोकादायक असलेल्या पहिल्या तीन देशांमध्ये  भारताचा समावेश होतो. 
 
इराक आणि सिरीयानंतर भारत पत्रकारांसाठी तिसरा धोकादायक देश आहे. १९९२ पासून आतापर्यंत भारतात एकूण ६४ पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत. भ्रष्टाचार उघड केला म्हणून यातील बहुतांश हत्या झाल्या आहेत असे  प्रोटेक्ट जर्नलिस्ट समितीने म्हटले आहे. 
 
बहुतांश हत्या या छोटया शहरातील पत्रकारांच्या झाल्या आहेत. छोटया शहरात तोंड बंद ठेवण्यासाठी मोठया प्रमाणावर लाच दिली जाते. हा व्यवहार उघड करणे म्हणजे मोठा उद्योजक किंवा राजकारण्याशी शत्रूत्व ओढवून घेणे असते. भारतात पत्रकारांच्या मोठया प्रमाणावर हत्या होतात. फक्त इराक आणि सिरीयापेक्षा हा आकडा कमी आहे. 
 
आशिया खंडात भारत पत्रकारीतेसाठी धोकादायक देश आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपेक्षाही इथे धोका आहे असे अहवालात म्हटले आहे. पीसीआयच्या अहवालानुसार मागच्या दोन दशकातील पत्रकाराच्या हत्यांची ९६ टक्के प्रकरणे कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचली नाहीत. पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी भारतातील पत्रकारांच्या विविध संघटनांनी नेहमीच कठोरात कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे.