शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

कर्ज वसुली सुरूच राहणार दुष्काळात तेरावा महिना : ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारीच्या गावांना अल्पशा सवलती

By admin | Updated: January 7, 2016 23:10 IST

सेंट्रल डेस्कसाठी

जळगाव- खरीप व रब्बी हंगामात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या राज्यातील १४ हजार ७०८ दुष्काळी गावांसाठी महसूल व वनविभागाने अल्पशा सवलती जाहीर करून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. नवीन उपाययोजनांमध्ये शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती राहणार नाही तसेच सहकारी कर्जाचे पुनर्गठणही होणार नसल्याचे शेतकर्‍यांची आणखी कोंडी होणार आहे. मागील म्हणजेच २०१४-१५ च्या हंगामात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावांसाठी ज्या उपाययोजना जाहीर झाल्या होत्या त्यात जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, कृषि पंपांच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट, १० वी, १२ वीच्या परीक्षा शुल्कात माफी, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषांत काही प्रमाणात शिथीलता, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर, शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे या उपाययोजना जाहीर झाल्या होत्या. त्या हंगामात १९ हजार ५९ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली होती. २०१५-१६ च्या हंगामात उपाययोजनांना कात्री२०१५-१६ च्या हंगामात दुष्काळी किंवा ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावांची संख्या मागील हंगामाच्या तुलनेत कमी असून उपाययोजनांनाही कात्री लावण्यात आली आहे. जमीन महसुलात सूट, कृषि पंपांच्या वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर, दुष्काळी स्थिती जाहीर असलेल्या गावात शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या उपाययोजना जाहीर झाल्या आहेत. सहकारी कर्जाचे पुनर्गठण व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती या उपाययोजना २०१५-१६ च्या हंगामातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर असलेल्या गावांसाठी लागू केलेल्या नाहीत. यामुळे शेतकर्‍यांकडून पीक कर्ज वसूल केले जाईल हे स्पष्ट होते. सर्वाधिक दुष्काळी गावे नाशिक जिल्ह्यात, कोकणात एकही गाव नाहीमहसूल व वन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक १५७७ दुष्काळी गावे नाशिक जिल्ह्यात आहेत. यापाठोपाठ नांदेडात १५६२ गावे दुष्काळी आहेत. तर कोकणात एकाही गावात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेली नाही किंवा दुष्काळ जाहीर झालेला नाही.