शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

त्या सर्वांची चांगल्या आयुष्याची स्वप्ने भंगली!

By admin | Updated: October 2, 2016 00:38 IST

घरची अतिशय गरिबी. इथे एक तर नोकरी मिळणे अवघड. मिळालीच तर पगारही तुटपुंजा. त्यामुळे परदेशात जाउन खूप पैसा मिळवू, घरच्यांना आनंदात ठेवू, या आशेने

नवी दिल्ली : घरची अतिशय गरिबी. इथे एक तर नोकरी मिळणे अवघड. मिळालीच तर पगारही तुटपुंजा. त्यामुळे परदेशात जाउन खूप पैसा मिळवू, घरच्यांना आनंदात ठेवू, या आशेने बिहारमधील ४0 जण आपल्या कुटुंबियांना सोडून सौदी अरबमध्ये रोजगारासाठी गेले खरे: पण त्यांना तिथून अक्षरश: रिकाम्या हातानेच यावे लागले आहे. ही कहाणी केवळ भारतातील कामगारांची नाही. पाकिस्तान, बांगला देश आणि फिलिपाइन्समधील मजुरांचीही हीच स्थिती झाली.भारतातील कामगार तिथे रोजगारासाठी गेले, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रुड तेलाचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे त्यांना केवळ रोजगारच मिळाला असे नाही, तर हातात पैसाही बऱ्यापैकी खुळखुळू लागला. त्यामुळे ते आनंदात होते. काही महिने त्यांनी बऱ्यापैकी रकमा भारतातील कुटुंबियांना पाठवल्या. त्यामुळे त्यांच्या भारतातील नातेवाईकांमध्येही खुशीचे वातावरण होते. कोणाचा मुलगा, कोणाचा नवरा, कोणाचा दीर, कोणाचा भाउ असे बिहारमधील किमान ४0 जण याप्रकारे मस्त मजेत जगत होते. लेबनानचे माजी पंतप्रधान आणि कोट्यधीश असलेले साद हरीरी यांच्या तेल कंपनीत त्यांना रोजगार मिळाला होता. तिथे ५0 हजार कामगार काम करीत होते. पण अचानक तेलाच्या किंमतींमध्ये घसरण सुरू झाली. घसरणही इतकी मोठी की व्यवस्थापनाने तेथील कँटीन बंद करून टाकले. त्यामुळे जेवण मिळेनासे झाले. मग प्यायला पाणीही मिळेना. वीजपुरवठाही थांबवण्यात आला. रोजगारही गेलाच. अनेकांना महिन्याचा पगारही मिळाला नाही.त्यातच परत येण्यासाठी पैसा नाही. काहींच्या हातात थोडे पैसे होते. पण त्यांचे पासपोर्ट, वर्किंग व्हिासाची कागदपत्रे एक तर कंपन्या, व्यवस्थापन वा दलाल यांनी त्यांच्याकडून काढून घेतले होते. त्यामुळे भारतात परतणेही शक्य नव्हते. माझ्या मालकाने माझ्या कागदपत्रांचे नुतनीकरणच केले नव्हते. त्यामुळे मला अटक करण्यात आली... २७ वर्षांच्या हुसेन सांगत होता. तो सौदी राजाच्या रियाधमधील राजवाड्याच्या नुतनीकरणात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होता. अर्थात कंत्राटी कामगार म्हणून. तेथील नियमाप्रमाणे त्याला दुसरे काम शोधायची संमती नव्हती. संतोष या बांधकाम मजुराचीही हीच स्थिती होती. पगारही इथे सांगितला, त्यापेक्षा प्रत्यक्षात कमी दिला गेला. सिवान जिल्ह्यातील झाकीर हुसेन म्हणाला की, आमच्या गावात दवंडी पिटून नोकरीसाठी नेण्यात आले. दरमहा ३0 हजार रुपये पगार मिळेल, असे सांगितले गेले. पण माझी आताची स्थिती पाहा. मला डिसेंबरपासून पगारच मिळाला नाही. भारत सरकारने आम्हाला इथे आणले, म्हणून दिल्लीपर्यंत तरी आम्ही पोहोचलो. आमच्यापैकी एकाच्याही खिशात दमडी नाही. सरकारच्या खर्चानेच आता येथून घरी जाणार आहोत. रेल्वेची वाट पाहतोय आम्ही सारे...हुसेन म्हणाला. बाकीच्यांनी त्याच्या म्हणण्यावर नुसती मान डोलावली. त्या सर्र्वाची अवस्था अशीच होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)