शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

त्या सर्वांची चांगल्या आयुष्याची स्वप्ने भंगली!

By admin | Updated: October 2, 2016 00:38 IST

घरची अतिशय गरिबी. इथे एक तर नोकरी मिळणे अवघड. मिळालीच तर पगारही तुटपुंजा. त्यामुळे परदेशात जाउन खूप पैसा मिळवू, घरच्यांना आनंदात ठेवू, या आशेने

नवी दिल्ली : घरची अतिशय गरिबी. इथे एक तर नोकरी मिळणे अवघड. मिळालीच तर पगारही तुटपुंजा. त्यामुळे परदेशात जाउन खूप पैसा मिळवू, घरच्यांना आनंदात ठेवू, या आशेने बिहारमधील ४0 जण आपल्या कुटुंबियांना सोडून सौदी अरबमध्ये रोजगारासाठी गेले खरे: पण त्यांना तिथून अक्षरश: रिकाम्या हातानेच यावे लागले आहे. ही कहाणी केवळ भारतातील कामगारांची नाही. पाकिस्तान, बांगला देश आणि फिलिपाइन्समधील मजुरांचीही हीच स्थिती झाली.भारतातील कामगार तिथे रोजगारासाठी गेले, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रुड तेलाचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे त्यांना केवळ रोजगारच मिळाला असे नाही, तर हातात पैसाही बऱ्यापैकी खुळखुळू लागला. त्यामुळे ते आनंदात होते. काही महिने त्यांनी बऱ्यापैकी रकमा भारतातील कुटुंबियांना पाठवल्या. त्यामुळे त्यांच्या भारतातील नातेवाईकांमध्येही खुशीचे वातावरण होते. कोणाचा मुलगा, कोणाचा नवरा, कोणाचा दीर, कोणाचा भाउ असे बिहारमधील किमान ४0 जण याप्रकारे मस्त मजेत जगत होते. लेबनानचे माजी पंतप्रधान आणि कोट्यधीश असलेले साद हरीरी यांच्या तेल कंपनीत त्यांना रोजगार मिळाला होता. तिथे ५0 हजार कामगार काम करीत होते. पण अचानक तेलाच्या किंमतींमध्ये घसरण सुरू झाली. घसरणही इतकी मोठी की व्यवस्थापनाने तेथील कँटीन बंद करून टाकले. त्यामुळे जेवण मिळेनासे झाले. मग प्यायला पाणीही मिळेना. वीजपुरवठाही थांबवण्यात आला. रोजगारही गेलाच. अनेकांना महिन्याचा पगारही मिळाला नाही.त्यातच परत येण्यासाठी पैसा नाही. काहींच्या हातात थोडे पैसे होते. पण त्यांचे पासपोर्ट, वर्किंग व्हिासाची कागदपत्रे एक तर कंपन्या, व्यवस्थापन वा दलाल यांनी त्यांच्याकडून काढून घेतले होते. त्यामुळे भारतात परतणेही शक्य नव्हते. माझ्या मालकाने माझ्या कागदपत्रांचे नुतनीकरणच केले नव्हते. त्यामुळे मला अटक करण्यात आली... २७ वर्षांच्या हुसेन सांगत होता. तो सौदी राजाच्या रियाधमधील राजवाड्याच्या नुतनीकरणात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होता. अर्थात कंत्राटी कामगार म्हणून. तेथील नियमाप्रमाणे त्याला दुसरे काम शोधायची संमती नव्हती. संतोष या बांधकाम मजुराचीही हीच स्थिती होती. पगारही इथे सांगितला, त्यापेक्षा प्रत्यक्षात कमी दिला गेला. सिवान जिल्ह्यातील झाकीर हुसेन म्हणाला की, आमच्या गावात दवंडी पिटून नोकरीसाठी नेण्यात आले. दरमहा ३0 हजार रुपये पगार मिळेल, असे सांगितले गेले. पण माझी आताची स्थिती पाहा. मला डिसेंबरपासून पगारच मिळाला नाही. भारत सरकारने आम्हाला इथे आणले, म्हणून दिल्लीपर्यंत तरी आम्ही पोहोचलो. आमच्यापैकी एकाच्याही खिशात दमडी नाही. सरकारच्या खर्चानेच आता येथून घरी जाणार आहोत. रेल्वेची वाट पाहतोय आम्ही सारे...हुसेन म्हणाला. बाकीच्यांनी त्याच्या म्हणण्यावर नुसती मान डोलावली. त्या सर्र्वाची अवस्था अशीच होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)