शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

त्या सर्वांची चांगल्या आयुष्याची स्वप्ने भंगली!

By admin | Updated: October 2, 2016 00:38 IST

घरची अतिशय गरिबी. इथे एक तर नोकरी मिळणे अवघड. मिळालीच तर पगारही तुटपुंजा. त्यामुळे परदेशात जाउन खूप पैसा मिळवू, घरच्यांना आनंदात ठेवू, या आशेने

नवी दिल्ली : घरची अतिशय गरिबी. इथे एक तर नोकरी मिळणे अवघड. मिळालीच तर पगारही तुटपुंजा. त्यामुळे परदेशात जाउन खूप पैसा मिळवू, घरच्यांना आनंदात ठेवू, या आशेने बिहारमधील ४0 जण आपल्या कुटुंबियांना सोडून सौदी अरबमध्ये रोजगारासाठी गेले खरे: पण त्यांना तिथून अक्षरश: रिकाम्या हातानेच यावे लागले आहे. ही कहाणी केवळ भारतातील कामगारांची नाही. पाकिस्तान, बांगला देश आणि फिलिपाइन्समधील मजुरांचीही हीच स्थिती झाली.भारतातील कामगार तिथे रोजगारासाठी गेले, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रुड तेलाचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे त्यांना केवळ रोजगारच मिळाला असे नाही, तर हातात पैसाही बऱ्यापैकी खुळखुळू लागला. त्यामुळे ते आनंदात होते. काही महिने त्यांनी बऱ्यापैकी रकमा भारतातील कुटुंबियांना पाठवल्या. त्यामुळे त्यांच्या भारतातील नातेवाईकांमध्येही खुशीचे वातावरण होते. कोणाचा मुलगा, कोणाचा नवरा, कोणाचा दीर, कोणाचा भाउ असे बिहारमधील किमान ४0 जण याप्रकारे मस्त मजेत जगत होते. लेबनानचे माजी पंतप्रधान आणि कोट्यधीश असलेले साद हरीरी यांच्या तेल कंपनीत त्यांना रोजगार मिळाला होता. तिथे ५0 हजार कामगार काम करीत होते. पण अचानक तेलाच्या किंमतींमध्ये घसरण सुरू झाली. घसरणही इतकी मोठी की व्यवस्थापनाने तेथील कँटीन बंद करून टाकले. त्यामुळे जेवण मिळेनासे झाले. मग प्यायला पाणीही मिळेना. वीजपुरवठाही थांबवण्यात आला. रोजगारही गेलाच. अनेकांना महिन्याचा पगारही मिळाला नाही.त्यातच परत येण्यासाठी पैसा नाही. काहींच्या हातात थोडे पैसे होते. पण त्यांचे पासपोर्ट, वर्किंग व्हिासाची कागदपत्रे एक तर कंपन्या, व्यवस्थापन वा दलाल यांनी त्यांच्याकडून काढून घेतले होते. त्यामुळे भारतात परतणेही शक्य नव्हते. माझ्या मालकाने माझ्या कागदपत्रांचे नुतनीकरणच केले नव्हते. त्यामुळे मला अटक करण्यात आली... २७ वर्षांच्या हुसेन सांगत होता. तो सौदी राजाच्या रियाधमधील राजवाड्याच्या नुतनीकरणात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होता. अर्थात कंत्राटी कामगार म्हणून. तेथील नियमाप्रमाणे त्याला दुसरे काम शोधायची संमती नव्हती. संतोष या बांधकाम मजुराचीही हीच स्थिती होती. पगारही इथे सांगितला, त्यापेक्षा प्रत्यक्षात कमी दिला गेला. सिवान जिल्ह्यातील झाकीर हुसेन म्हणाला की, आमच्या गावात दवंडी पिटून नोकरीसाठी नेण्यात आले. दरमहा ३0 हजार रुपये पगार मिळेल, असे सांगितले गेले. पण माझी आताची स्थिती पाहा. मला डिसेंबरपासून पगारच मिळाला नाही. भारत सरकारने आम्हाला इथे आणले, म्हणून दिल्लीपर्यंत तरी आम्ही पोहोचलो. आमच्यापैकी एकाच्याही खिशात दमडी नाही. सरकारच्या खर्चानेच आता येथून घरी जाणार आहोत. रेल्वेची वाट पाहतोय आम्ही सारे...हुसेन म्हणाला. बाकीच्यांनी त्याच्या म्हणण्यावर नुसती मान डोलावली. त्या सर्र्वाची अवस्था अशीच होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)