शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

कापसाला सात हजार भाव देऊ असे म्हटलेच नव्हते

By admin | Updated: October 31, 2015 22:44 IST

जळगाव- भाजपाच्या नेत्यांनी कापसाला अधिक भाव मिळावा यासाठी आंदोलन केले हे योग्य असले तरी आम्ही सत्तेत आल्यावर कापसाला सात हजार रुपये भाव देऊ, असे म्हटलेच नव्हते, असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी पत्रपकारांशी वार्तालाप करताना सांगितले. अर्थातच कापसाला सात हजार भाव देण्याच्या मागणीच्या मुद्यावरून भाजपाने घूमजाव केले.

जळगाव- भाजपाच्या नेत्यांनी कापसाला अधिक भाव मिळावा यासाठी आंदोलन केले हे योग्य असले तरी आम्ही सत्तेत आल्यावर कापसाला सात हजार रुपये भाव देऊ, असे म्हटलेच नव्हते, असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी पत्रपकारांशी वार्तालाप करताना सांगितले. अर्थातच कापसाला सात हजार भाव देण्याच्या मागणीच्या मुद्यावरून भाजपाने घूमजाव केले.
भंडारी म्हणाले, सरकारने अनेक कामे केली आहेत. ती दिसतील. सरकारबाबत विश्वासार्हता कायम आहे, असेही ते म्हणाले.
शेतकर्‍यांच्या सवलतींचा विचार करावा लागेल
हमीभावाची मागणी केली जाते. पण हमीभाव देऊन प्रश्न मीटतील असे नाही. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याचे ठरले तर शेतकर्‍यांना खते, विजबिल इतर कार्यक्रमाद्वारे दिल्या जाणार्‍या सवलतींचाही अंतर्भाव करावा लागेल, असेही ते म्हणाले. हमीभाव हा किचकट विषय आहे, असेही भंडारी म्हणाले.

शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे, सरकार पाच वर्षे चालेल
शिवसेना व भाजपातील वादांचा मुद्दा उपस्थित केला असता भंडारी म्हणाले, शिवसेनेने शांत, सोज्वळ स्वभावाच्या मुख्यमंत्र्यांना जोरदार पलटवार करण्याची वेळ आणली. सेनेतील नेत्यांना कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत पराभव समोर दिसत आहे. या पराभवाचे खापर आपल्यावर फुटेल, त्याचे पाप घेऊन फिरावे लागेल यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊ केला. भाजपावर आरोप करणार्‍या शिवसेनेने आधी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देत युतीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वासही भंडारी यांनी व्यक्त केला.

घराणेशाहीवर बोलणे टाळले
पक्षात घराणेशाही सुरू झाली आहे. घराणेशाहीला विरोध करणार्‍या भाजपाचे धोरण बदलले की काय, असा मुद्दा छेडला असता हा मुद्दा आपण पुढे नेऊ, असे म्हणत भंडारी या मुद्द्यावर स्पष्टपणे बोलले नाहीत.

आम्ही आंदोलन करायचो तेव्हा शौरी लवासातील बंगल्यात चैनेत राहायचे
विरोधात असताना आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्या वेळी अरूण शौरी हे लवासामधील आपल्या बंगल्यात चैनेत राहायचे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार गेल्यानंतर शौरी पक्षापासून दूर झाले. शौरी यांचा भाजपाशी कोणताही संबंध नाही, असा दावा भंडारी यांनी केला.