शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला सात हजार भाव देऊ असे म्हटलेच नव्हते

By admin | Updated: October 31, 2015 22:44 IST

जळगाव- भाजपाच्या नेत्यांनी कापसाला अधिक भाव मिळावा यासाठी आंदोलन केले हे योग्य असले तरी आम्ही सत्तेत आल्यावर कापसाला सात हजार रुपये भाव देऊ, असे म्हटलेच नव्हते, असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी पत्रपकारांशी वार्तालाप करताना सांगितले. अर्थातच कापसाला सात हजार भाव देण्याच्या मागणीच्या मुद्यावरून भाजपाने घूमजाव केले.

जळगाव- भाजपाच्या नेत्यांनी कापसाला अधिक भाव मिळावा यासाठी आंदोलन केले हे योग्य असले तरी आम्ही सत्तेत आल्यावर कापसाला सात हजार रुपये भाव देऊ, असे म्हटलेच नव्हते, असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी पत्रपकारांशी वार्तालाप करताना सांगितले. अर्थातच कापसाला सात हजार भाव देण्याच्या मागणीच्या मुद्यावरून भाजपाने घूमजाव केले.
भंडारी म्हणाले, सरकारने अनेक कामे केली आहेत. ती दिसतील. सरकारबाबत विश्वासार्हता कायम आहे, असेही ते म्हणाले.
शेतकर्‍यांच्या सवलतींचा विचार करावा लागेल
हमीभावाची मागणी केली जाते. पण हमीभाव देऊन प्रश्न मीटतील असे नाही. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याचे ठरले तर शेतकर्‍यांना खते, विजबिल इतर कार्यक्रमाद्वारे दिल्या जाणार्‍या सवलतींचाही अंतर्भाव करावा लागेल, असेही ते म्हणाले. हमीभाव हा किचकट विषय आहे, असेही भंडारी म्हणाले.

शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे, सरकार पाच वर्षे चालेल
शिवसेना व भाजपातील वादांचा मुद्दा उपस्थित केला असता भंडारी म्हणाले, शिवसेनेने शांत, सोज्वळ स्वभावाच्या मुख्यमंत्र्यांना जोरदार पलटवार करण्याची वेळ आणली. सेनेतील नेत्यांना कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत पराभव समोर दिसत आहे. या पराभवाचे खापर आपल्यावर फुटेल, त्याचे पाप घेऊन फिरावे लागेल यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊ केला. भाजपावर आरोप करणार्‍या शिवसेनेने आधी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देत युतीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वासही भंडारी यांनी व्यक्त केला.

घराणेशाहीवर बोलणे टाळले
पक्षात घराणेशाही सुरू झाली आहे. घराणेशाहीला विरोध करणार्‍या भाजपाचे धोरण बदलले की काय, असा मुद्दा छेडला असता हा मुद्दा आपण पुढे नेऊ, असे म्हणत भंडारी या मुद्द्यावर स्पष्टपणे बोलले नाहीत.

आम्ही आंदोलन करायचो तेव्हा शौरी लवासातील बंगल्यात चैनेत राहायचे
विरोधात असताना आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्या वेळी अरूण शौरी हे लवासामधील आपल्या बंगल्यात चैनेत राहायचे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार गेल्यानंतर शौरी पक्षापासून दूर झाले. शौरी यांचा भाजपाशी कोणताही संबंध नाही, असा दावा भंडारी यांनी केला.