कापसाला सात हजार भाव देऊ असे म्हटलेच नव्हते
By admin | Updated: October 31, 2015 22:44 IST
जळगाव- भाजपाच्या नेत्यांनी कापसाला अधिक भाव मिळावा यासाठी आंदोलन केले हे योग्य असले तरी आम्ही सत्तेत आल्यावर कापसाला सात हजार रुपये भाव देऊ, असे म्हटलेच नव्हते, असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी पत्रपकारांशी वार्तालाप करताना सांगितले. अर्थातच कापसाला सात हजार भाव देण्याच्या मागणीच्या मुद्यावरून भाजपाने घूमजाव केले.
कापसाला सात हजार भाव देऊ असे म्हटलेच नव्हते
जळगाव- भाजपाच्या नेत्यांनी कापसाला अधिक भाव मिळावा यासाठी आंदोलन केले हे योग्य असले तरी आम्ही सत्तेत आल्यावर कापसाला सात हजार रुपये भाव देऊ, असे म्हटलेच नव्हते, असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी पत्रपकारांशी वार्तालाप करताना सांगितले. अर्थातच कापसाला सात हजार भाव देण्याच्या मागणीच्या मुद्यावरून भाजपाने घूमजाव केले. भंडारी म्हणाले, सरकारने अनेक कामे केली आहेत. ती दिसतील. सरकारबाबत विश्वासार्हता कायम आहे, असेही ते म्हणाले. शेतकर्यांच्या सवलतींचा विचार करावा लागेलहमीभावाची मागणी केली जाते. पण हमीभाव देऊन प्रश्न मीटतील असे नाही. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याचे ठरले तर शेतकर्यांना खते, विजबिल इतर कार्यक्रमाद्वारे दिल्या जाणार्या सवलतींचाही अंतर्भाव करावा लागेल, असेही ते म्हणाले. हमीभाव हा किचकट विषय आहे, असेही भंडारी म्हणाले. शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे, सरकार पाच वर्षे चालेलशिवसेना व भाजपातील वादांचा मुद्दा उपस्थित केला असता भंडारी म्हणाले, शिवसेनेने शांत, सोज्वळ स्वभावाच्या मुख्यमंत्र्यांना जोरदार पलटवार करण्याची वेळ आणली. सेनेतील नेत्यांना कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत पराभव समोर दिसत आहे. या पराभवाचे खापर आपल्यावर फुटेल, त्याचे पाप घेऊन फिरावे लागेल यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊ केला. भाजपावर आरोप करणार्या शिवसेनेने आधी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देत युतीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वासही भंडारी यांनी व्यक्त केला. घराणेशाहीवर बोलणे टाळलेपक्षात घराणेशाही सुरू झाली आहे. घराणेशाहीला विरोध करणार्या भाजपाचे धोरण बदलले की काय, असा मुद्दा छेडला असता हा मुद्दा आपण पुढे नेऊ, असे म्हणत भंडारी या मुद्द्यावर स्पष्टपणे बोलले नाहीत. आम्ही आंदोलन करायचो तेव्हा शौरी लवासातील बंगल्यात चैनेत राहायचेविरोधात असताना आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्या वेळी अरूण शौरी हे लवासामधील आपल्या बंगल्यात चैनेत राहायचे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार गेल्यानंतर शौरी पक्षापासून दूर झाले. शौरी यांचा भाजपाशी कोणताही संबंध नाही, असा दावा भंडारी यांनी केला.