शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानपदाची अभिलाषा नव्हतीच

By admin | Updated: January 29, 2016 01:03 IST

पंतप्रधानपदाची अभिलाषा कधीच बाळगली नाही, असे स्पष्ट करून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी; इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर हंगामी पंतप्रधान बनण्याची त्यांची इच्छा होती, या दीर्घकाळापासून

नवी दिल्ली : पंतप्रधानपदाची अभिलाषा कधीच बाळगली नाही, असे स्पष्ट करून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी; इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर हंगामी पंतप्रधान बनण्याची त्यांची इच्छा होती, या दीर्घकाळापासून चालत असलेल्या अटकळबाजीला पूर्णविराम दिला आहे. अशाप्रकारच्या अफवा खोट्या आणि द्वेषपूर्ण असल्याचे मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.‘द टर्ब्युलंट इयर्स : १९८०-९६’ या आपल्या जीवनचरित्राच्या दुसऱ्या खंडात मुखर्जी यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. या दुसऱ्या खंडाचे प्रकाशन गुरुवारी नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपती हामिद अंसारी यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात मुखर्जी म्हणतात, ‘माझी हंगामी पंतप्रधान बनायची इच्छा होती, त्या पदासाठी मी दावा केलेला होता आणि नंतर माझे मन वळविण्यात आले होते वगैरेसारख्या अनेक खोट्या गोष्टी पसरविण्यात आल्या. अशा खोट्या गोष्टींमुळेच राजीव गांधी यांच्या मनात गैरसमज निर्माण झाले होते. अशा गोष्टी पूर्णपणे खोट्या आणि द्वेषपूर्ण आहेत.’ रूपा प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. बाथरूममध्ये राजीव गांधी यांच्यासोबत पंतप्रधानपदाबाबत झालेल्या संभाषणाचा तपशीलही मुखर्जी यांनी या पुस्तकात लिहिला आहे. ‘वेळ पुढे सरकत होती आणि मला त्यांच्याशी बोलायची घाई झाली होती. मी त्यांच्याकडे (राजीव गांधी आणि सोनिया गांधी) गेलो आणि राजीव गांधींच्या खांद्यावर हळूच हात ठेवला आणि मला काही महत्त्वाचे बोलायचे आहे, असा संकेत दिला. ते सोनियांपासून दूर केले आणि माझ्याशी बोलले. गोपनीय मुद्दा असल्याशिवाय मी त्रास देणार नाही, हे समजल्यावर ते मला बाथरूममध्ये घेऊन गेले, कारण आम्ही कुणाच्याही लक्षात न येता बोलू शकू,’ असेही मुखर्जी यांनी यात नमूद केले आहे. यावेळी मुखर्जी आणि राजीव गांधी यांच्यात राजकीय परिस्थितीवर आणि राजीव यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याबाबत पक्षाच्या अन्य नेत्यांचे काय मत आहे याबाबत चर्चा झाली. त्यानंतर राजीव पंतप्रधान बनण्यास राजी झाले. त्यांचा निर्णय सर्वांना कळविला,’ असे मुखर्जी यांनी लिहिले आहे. - राजीव गांधी मंत्रिमंडळातून आणि त्यानंतर काँग्रेस पक्षातून काढण्याला कारणीभूत असलेल्या परिस्थितीचाही ऊहापोह मुखर्जी यांनी यात केला आहे. ‘राजीव गांधींची वाढती नाराजी, त्यांच्या भोवतालच्या नेत्यांच्या मनातील वैर आणि संभाव्य कारवाईची पूर्वकल्पना आपल्याला आलेली होती. त्यांनी मला मंत्रिमंडळातून का वगळले आणि नंतर पक्षातून बडतर्फ का केले? यावर मी एवढेच सांगू शकतो की त्यांनी चूक केली. मीदेखील चुका केल्या. ते इतरांच्या प्रभावात आले आणि त्यांनी माझ्याविरुद्ध चुगली करणाऱ्यांचे ऐकले,’ असेही मुखर्जी यांनी या पुस्तकात स्पष्ट केले आहे.